शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

कूळ कायद्यात दुरुस्ती करू!

By admin | Updated: March 24, 2017 02:39 IST

पणजी : १९६४ सालच्या गोवा, दमण आणि दीव कृषी कूळ कायद्यातील अलीकडील दुरुस्त्यांमुळे कुळांना अडचणींना सामोरे जावे लागते,

पणजी : १९६४ सालच्या गोवा, दमण आणि दीव कृषी कूळ कायद्यातील अलीकडील दुरुस्त्यांमुळे कुळांना अडचणींना सामोरे जावे लागते, याची सरकारला कल्पना आहे. विद्यमान सरकार कुळांचे हितरक्षण करण्यासाठी बांधील आहे व याच हेतूने लवकरच योग्य प्रकारे कूळ कायद्यात दुरुस्त्या केल्या जातील, असे राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी गुरुवारी विधानसभेत अभिभाषणावेळी जाहीर केले.कुळांच्या हक्कांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाईल, असे राज्यपाल म्हणाल्या. आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणातून राज्यपालांनी भाजपप्रणीत आघाडीची यापुढील दिशा स्पष्ट केली व सरकारची धोरणेही अधोरेखित केली. गोवा आणि गोंयकारपण हा सरकारच्या प्रत्येक धोरणाचा आत्मा असेल, असेही राज्यपालांनी नमूद केले. सर्वांना घर हा सरकारचा मंत्र असेल. राज्यातील प्रत्येकाला निवारा प्राप्त व्हावा या हेतूने सरकार धोरण तयार करील व ते अमलात आणील. पर्यटन क्षेत्रात जागतिक दर्जाच्या साधनसुविधा निर्माण केल्या जातील. वार्षिक २८ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करण्याची मोपा येथील नियोजित विमानतळाची क्षमता असेल. मोपा सुरू झाल्यानंतरही दाबोळी विमानतळ सुरूच ठेवला जाईल. राज्यासाठी परिपूर्ण असा वाहतूक आराखडा अमलात आणला जाईल. जल वाहतुकीचाही वापर केला जाईल. पर्यटक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वाहतूक सुविधा उपलब्ध केली जाईल, असे राज्यपालांनी नमूद केले. कदंब वाहतूक महामंडळाच्या पास योजनेचा ८१ हजार प्रवाशांनी लाभ घेतला. सरकारने त्यासाठी अनुदानावर ७ कोटी ८० लाख रुपये आतापर्यंत खर्च केले, अशी माहिती राज्यपालांनी दिली.रोजगार संधी निर्माण करण्यासाठी पर्यावरणपूरक असे उद्योगधंदे गोव्यात आणले जातील. अमृत मिशन व स्मार्ट सिटी या योजनांसाठी पणजी शहराची निवड झाली आहे. या योजनांखाली काही कामे मार्गी लागली असून काही प्रकल्पांची कामे २०१७-१८ मध्ये सुरू होतील. केरी-पेडणे येथे किनारपट्टी खचू नये म्हणून उपाययोजना करणे व सौंदर्यीकरण यावर सरकारने १७ कोटी रुपये खर्च केले. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने अतापर्यंत ८२ प्रकल्प मंजूर केले असून त्याद्वारे ४ हजार ६२३ कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. प्राथमिक शिक्षण कोकणी किंवा मराठीतून देणाऱ्या शळांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे ४00 रुपयांचे अर्थसाह्य देण्याची योजना सरकारने आणली. आतापर्यंत १२७ विद्यालयांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यासाठी एकूण ३ कोटी ६ लाख रुपयांचा खर्च झाला, असे राज्यपालांनी नमूद केले.दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींची संख्या १ लाख ४१ हजार ३५२ झाली असून त्यावर वार्षिक ३२० कोटींचा खर्च होत आहे. जानेवारी २०१७ पर्यंत ४८ हजार ६०० व्यक्तींना लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ मिळाला व त्यावर ४८६ कोटी रुपये खर्च झाले. गृह आधार योजनेखाली एकूण १ लाख ५१ हजार महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. त्यावर आतापर्यंत ५२० कोटींचा खर्च झाल्याचे राज्यपालांनी नमूद केले. (खास प्रतिनिधी)