शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

कूळ कायद्यात दुरुस्ती करू!

By admin | Updated: March 24, 2017 02:39 IST

पणजी : १९६४ सालच्या गोवा, दमण आणि दीव कृषी कूळ कायद्यातील अलीकडील दुरुस्त्यांमुळे कुळांना अडचणींना सामोरे जावे लागते,

पणजी : १९६४ सालच्या गोवा, दमण आणि दीव कृषी कूळ कायद्यातील अलीकडील दुरुस्त्यांमुळे कुळांना अडचणींना सामोरे जावे लागते, याची सरकारला कल्पना आहे. विद्यमान सरकार कुळांचे हितरक्षण करण्यासाठी बांधील आहे व याच हेतूने लवकरच योग्य प्रकारे कूळ कायद्यात दुरुस्त्या केल्या जातील, असे राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी गुरुवारी विधानसभेत अभिभाषणावेळी जाहीर केले.कुळांच्या हक्कांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाईल, असे राज्यपाल म्हणाल्या. आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणातून राज्यपालांनी भाजपप्रणीत आघाडीची यापुढील दिशा स्पष्ट केली व सरकारची धोरणेही अधोरेखित केली. गोवा आणि गोंयकारपण हा सरकारच्या प्रत्येक धोरणाचा आत्मा असेल, असेही राज्यपालांनी नमूद केले. सर्वांना घर हा सरकारचा मंत्र असेल. राज्यातील प्रत्येकाला निवारा प्राप्त व्हावा या हेतूने सरकार धोरण तयार करील व ते अमलात आणील. पर्यटन क्षेत्रात जागतिक दर्जाच्या साधनसुविधा निर्माण केल्या जातील. वार्षिक २८ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करण्याची मोपा येथील नियोजित विमानतळाची क्षमता असेल. मोपा सुरू झाल्यानंतरही दाबोळी विमानतळ सुरूच ठेवला जाईल. राज्यासाठी परिपूर्ण असा वाहतूक आराखडा अमलात आणला जाईल. जल वाहतुकीचाही वापर केला जाईल. पर्यटक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वाहतूक सुविधा उपलब्ध केली जाईल, असे राज्यपालांनी नमूद केले. कदंब वाहतूक महामंडळाच्या पास योजनेचा ८१ हजार प्रवाशांनी लाभ घेतला. सरकारने त्यासाठी अनुदानावर ७ कोटी ८० लाख रुपये आतापर्यंत खर्च केले, अशी माहिती राज्यपालांनी दिली.रोजगार संधी निर्माण करण्यासाठी पर्यावरणपूरक असे उद्योगधंदे गोव्यात आणले जातील. अमृत मिशन व स्मार्ट सिटी या योजनांसाठी पणजी शहराची निवड झाली आहे. या योजनांखाली काही कामे मार्गी लागली असून काही प्रकल्पांची कामे २०१७-१८ मध्ये सुरू होतील. केरी-पेडणे येथे किनारपट्टी खचू नये म्हणून उपाययोजना करणे व सौंदर्यीकरण यावर सरकारने १७ कोटी रुपये खर्च केले. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने अतापर्यंत ८२ प्रकल्प मंजूर केले असून त्याद्वारे ४ हजार ६२३ कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. प्राथमिक शिक्षण कोकणी किंवा मराठीतून देणाऱ्या शळांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे ४00 रुपयांचे अर्थसाह्य देण्याची योजना सरकारने आणली. आतापर्यंत १२७ विद्यालयांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यासाठी एकूण ३ कोटी ६ लाख रुपयांचा खर्च झाला, असे राज्यपालांनी नमूद केले.दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींची संख्या १ लाख ४१ हजार ३५२ झाली असून त्यावर वार्षिक ३२० कोटींचा खर्च होत आहे. जानेवारी २०१७ पर्यंत ४८ हजार ६०० व्यक्तींना लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ मिळाला व त्यावर ४८६ कोटी रुपये खर्च झाले. गृह आधार योजनेखाली एकूण १ लाख ५१ हजार महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. त्यावर आतापर्यंत ५२० कोटींचा खर्च झाल्याचे राज्यपालांनी नमूद केले. (खास प्रतिनिधी)