शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

उंडीर प्रकल्पाला विरोध नाही!

By admin | Updated: May 19, 2017 02:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कफोंडा : मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मलनिस्सारण प्रकल्पाच्या एसटीपी प्लांटला आमच्याकडून होणाऱ्या विरोधाबाबत लोकांची

लोकमत न्यूज नेटवर्कफोंडा : मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मलनिस्सारण प्रकल्पाच्या एसटीपी प्लांटला आमच्याकडून होणाऱ्या विरोधाबाबत लोकांची दिशाभूल करणारी वक्तव्ये थांबवावी, असे आवाहन उंडीर-बांदोडा येथील ग्रामस्थांनी केले आहे. ग्रामस्थांतर्फे त्यांच्या गावात होऊ घातलेल्या एसटीपी प्लांटला विरोध केला जात आहे. त्यामागे सबळ कारण आहे. विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी संघटनाही स्थापन केलेली आहे. या संघटनेचे निमंत्रक या नात्याने गुरुदास नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर हे ग्रामस्थांच्या विरोधाबाबत गोमंतकीयांची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.आम्ही उंडीरवासीय प्रकल्पाच्या एसटीपी प्लांटला जरूर विरोध करतो; कारण मंत्री किंवा गोवा मलनिस्सारण आणि साधनसुविधा विकास महामंडळाने ग्रामस्थांना विश्वासात न घेताच या ठिकाणी प्लांट बांधण्याचा घाट घातला. पंचायतीनेही विचार व अभ्यास न करता ना हरकत दाखला महामंडळाला दिला. हे करताना सर्व्हे नंबरचा उल्लेख करणेही त्यांनी टाळले. त्यामुळे हे सगळे प्रकार संशयास्पद आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता करण्याच्या हालचालीमुळे ग्रामस्थ एकवटलेले आहेत. नुकतेच पाण्याच्या टाक्या वितरित करण्यासाठी मंत्री ढवळीकर उंडीर येथे आले असता, ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारल्यानंतर मंत्र्यांनी ग्रामस्थांच्या विरोधाचा मान ठेवत उंडीर येथे एसटीपी प्लांट बांधण्यात येणार नाही, अशी ग्वाही दिली होती. असे असतानाही सध्या मंत्री आमच्या विरोधात विविध ठिकाणी कार्यक्रमात बोलताना लोकांची दिशाभूल करत असल्याचे वाचनात येत आहे.खुद्द मंत्र्यांनी १६ एप्रिल रोजी उंडीर येथे बोलताना एसटीपी प्लांटसाठी सीमेर-आगापूर येथे किंवा अन्य ठिकाणी जागा निश्चित करण्याची ग्वाही दिली होती. तरीही ते बेताल वक्तव्ये करताना आढळतात. यापुढे लोकांची दिशाभूल करण्याची वक्तव्ये मंत्र्यांनी करू नयेत, असे पत्रकात म्हटले आहे.दरम्यान, प्रकल्प पूर्णत्वाची शाश्वती नाही. एसटीपी प्लांटबाबत निश्चित धोरण नाही. प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्चून पाईपलाईन टाकण्याचे काम जोरात चालू आहे. एसटीपी प्लांटवरून जर गोंधळ झाला आणि काम बंद पडले, तर जनतेच्या पैशांची नासाडी होणार नाही कशावरून, असा प्रश्नही गुरुदास नाईक यांनी उपस्थित केला आहे.