शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उंडीर प्रकल्पाला विरोध नाही!

By admin | Updated: May 19, 2017 02:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कफोंडा : मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मलनिस्सारण प्रकल्पाच्या एसटीपी प्लांटला आमच्याकडून होणाऱ्या विरोधाबाबत लोकांची

लोकमत न्यूज नेटवर्कफोंडा : मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मलनिस्सारण प्रकल्पाच्या एसटीपी प्लांटला आमच्याकडून होणाऱ्या विरोधाबाबत लोकांची दिशाभूल करणारी वक्तव्ये थांबवावी, असे आवाहन उंडीर-बांदोडा येथील ग्रामस्थांनी केले आहे. ग्रामस्थांतर्फे त्यांच्या गावात होऊ घातलेल्या एसटीपी प्लांटला विरोध केला जात आहे. त्यामागे सबळ कारण आहे. विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी संघटनाही स्थापन केलेली आहे. या संघटनेचे निमंत्रक या नात्याने गुरुदास नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर हे ग्रामस्थांच्या विरोधाबाबत गोमंतकीयांची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.आम्ही उंडीरवासीय प्रकल्पाच्या एसटीपी प्लांटला जरूर विरोध करतो; कारण मंत्री किंवा गोवा मलनिस्सारण आणि साधनसुविधा विकास महामंडळाने ग्रामस्थांना विश्वासात न घेताच या ठिकाणी प्लांट बांधण्याचा घाट घातला. पंचायतीनेही विचार व अभ्यास न करता ना हरकत दाखला महामंडळाला दिला. हे करताना सर्व्हे नंबरचा उल्लेख करणेही त्यांनी टाळले. त्यामुळे हे सगळे प्रकार संशयास्पद आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता करण्याच्या हालचालीमुळे ग्रामस्थ एकवटलेले आहेत. नुकतेच पाण्याच्या टाक्या वितरित करण्यासाठी मंत्री ढवळीकर उंडीर येथे आले असता, ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारल्यानंतर मंत्र्यांनी ग्रामस्थांच्या विरोधाचा मान ठेवत उंडीर येथे एसटीपी प्लांट बांधण्यात येणार नाही, अशी ग्वाही दिली होती. असे असतानाही सध्या मंत्री आमच्या विरोधात विविध ठिकाणी कार्यक्रमात बोलताना लोकांची दिशाभूल करत असल्याचे वाचनात येत आहे.खुद्द मंत्र्यांनी १६ एप्रिल रोजी उंडीर येथे बोलताना एसटीपी प्लांटसाठी सीमेर-आगापूर येथे किंवा अन्य ठिकाणी जागा निश्चित करण्याची ग्वाही दिली होती. तरीही ते बेताल वक्तव्ये करताना आढळतात. यापुढे लोकांची दिशाभूल करण्याची वक्तव्ये मंत्र्यांनी करू नयेत, असे पत्रकात म्हटले आहे.दरम्यान, प्रकल्प पूर्णत्वाची शाश्वती नाही. एसटीपी प्लांटबाबत निश्चित धोरण नाही. प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्चून पाईपलाईन टाकण्याचे काम जोरात चालू आहे. एसटीपी प्लांटवरून जर गोंधळ झाला आणि काम बंद पडले, तर जनतेच्या पैशांची नासाडी होणार नाही कशावरून, असा प्रश्नही गुरुदास नाईक यांनी उपस्थित केला आहे.