शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना फक्त 'बीच'वर नेऊ नका!: मुख्यमंत्री; वैज्ञानिक संस्था, प्रकल्पांना भेट देण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2025 07:31 IST

साखळी सरकारी महाविद्यालय, रवींद्र भवन व शिक्षण खात्याच्या सहकार्याने साखळी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठे बदल केले जात आहेत. विद्यार्थीदशेतच कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार शिक्षण संस्थांनीदेखील आपली जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे. राज्यात अनेक दर्जेदार विज्ञान संस्था, प्रकल्प असून, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जावे. शाळा-महाविद्यालयांनी आता 'बीच'वर सहली घेऊन जाणे बंद करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

साखळी सरकारी महाविद्यालय, रवींद्र भवन व शिक्षण खात्याच्या सहकार्याने साखळी महाविद्यालयात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शरद काळे, भूषण सावईकर, दत्ताराम चिमूलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते.

राज्य सरकार शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल करत आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. देशाचे थोर शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांची वैज्ञानिक दृष्टी असामान्य होती. नवे-नवे शास्त्रज्ञ, संशोधक निर्माण होणे, यासाठी शिक्षण संस्थांनी उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. शरद काळे यांनी 'रोजच्या जीवनात विज्ञान' या विषयावर माहिती दिली.

गोव्यातील तरुणांना बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील उद्योगाशी संबंधित ज्ञान मिळावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच 'विद्यार्थी कौशल्य कार्यक्रम' अंतर्गत राष्ट्रीय शेअर बाजार आणि गोवा सरकारमध्ये सामंजस्य करार केला आहे. 'विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोपक्रमात जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना सक्षम करणे' ही यावर्षीच्या विज्ञान दिनाची थीम आहे. भारत दीर्घकाळापासून वैज्ञानिक नवोपक्रमाचे केंद्र आहे. अवकाश संशोधन, अणू तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेत उल्लेखनीय प्रगती करत आहे.

'मन की बात' ऐकाच

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली दहा वर्षे 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने नवनवीन माहिती देत असतात. ही माहिती भारतात, जगात काय चालले आहे, याचे ज्ञान विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना मिळवण्यास महत्त्वपूर्ण ठरत आहे. दुर्दैवाने शिक्षक व विद्यार्थी हा कार्यक्रम ऐकतच नाहीत. त्यामुळे यापुढे सर्व विद्यार्थी, पालकांनी तसेच शिक्षकांनी 'मन की बात' हा कार्यक्रम आवर्जून पाहावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

शिक्षकांनो तुमची जबाबदारी वाढलीय

आज विज्ञानाला खूप महत्त्व आहे. नुकत्याच झालेल्या चंद्रयान मोहिमेसाठी लागणारा डोम गोव्यात तयार झाला, याचे कुतूहल विद्यार्थ्यांना असायला हवे. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली असून विद्यार्थ्यांचे विज्ञान तंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत