शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

वीज नियम आयोगाशी करार का नाही? भाजपा आमदाराकडून सरकारला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 20:36 IST

केंद्रीय वीज नियमन आयोगाशी (जेईआरसी)गोवा सरकारने करार का केला नाही असा खडा सवाल आमदार निलेश काब्राल यांनी सरकारला घरचा अाहेर दिला. करार न केल्यामुळे जेआरसीचे प्रतिनिधीत्व गोव्याला मिळाले नसल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. 

पणजी: केंद्रीय वीज नियमन आयोगाशी (जेईआरसी)गोवा सरकारने करार का केला नाही असा खडा सवाल आमदार निलेश काब्राल यांनी सरकारला घरचा अाहेर दिला. करार न केल्यामुळे जेआरसीचे प्रतिनिधीत्व गोव्याला मिळाले नसल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.  गोवा सरकारने जेआरसीशी करार न केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली. करार केव्हा केला जाईल असा प्रश्न त्यांनी वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांना केला. परंतु या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे न दिता. मंत्र्यांनी गोव्यात स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा विचार असल्याचे वगैरे सांगितले. त्यावर समाधान न झालेले काब्राल यांनी मंत्र्यांकडून  आपल्या प्रश्नाचे सरळ उत्तर देण्यासाठी आग्रह धरला. गोव्याचा स्वतंत्र आयोग ज्यावेळी  स्थापन होईल तेव्हा होवो दे, परंतु तो पर्यंत गोव्याला आयोगाचे प्रतिनिधीत्व नको आहे काय असा त्यांचा प्रश्न होता. त्यावेळी मुखयमंत्री मनोहर पर्रीकर  यांनी  हस्तक्षेप करून तांत्रिक अडचणी त्यांना सांगितल्या. आयोगाशी करार केला तर स्वतंत्र आयोगाच्या स्थापनेला तो अडथळा ठरू शकतो का हे पडताळून पाहिले जाईल.  कायदेशीर बाजू पडताळून पाहून कराराच्या बाबतीत विचार केला जाईल असे सांगितले. वीज दरांच्या बाबतीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोळशाचा मुद्दा उपस्थित करण्याची संधी सोडली नाही. ‘आम्ही गोव्यात कोळशाला विरोध करीत आहोत आणि आम्हाला वीजही स्वस्त हवी आहे. कोळसा नको असेल तर हरित ऊजेर्चा पर्याय स्वीकारावा लागेल, परंतु ही वीज खूप महाग पडणार आहे. त्यामुळे पुन्हा वीज महागली म्हणून सरकारवरच खापर फोडले जाईल’ असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा