शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारकडून अपेक्षाभंग

By admin | Updated: May 27, 2016 02:54 IST

पणजी : केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा घोर अपेक्षाभंग केला आहे. देशात पेट्रोलचे दरही कमी झाले नाही, महागाईही नियंत्रणात आली

पणजी : केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा घोर अपेक्षाभंग केला आहे. देशात पेट्रोलचे दरही कमी झाले नाही, महागाईही नियंत्रणात आली नाही व विदेशातील काळा पैसाही परत आणून तो सरकारने लोकांच्या बँक खात्यात जमा केला नाही, असे अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्र्वेदी म्हणाल्या. प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्या उपस्थितीत येथे पत्रकार परिषदेत बोलताना चतुर्वेदी म्हणाल्या की, महागाई खूपच वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आत्महत्या केल्या. मात्र, त्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवली नाही. कोणतीच उपाययोजना केली नाही. दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा आधार होता; पण या योजनेसाठी जो निधी द्यावा लागतो तो देखील मोदी सरकारने दिला नाही. तो द्यावा अशी आठवण सर्वोच्च न्यायालयाने सरकारला करून द्यावी लागली. चतुर्र्वेदी म्हणाल्या की, अलीकडे काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांवेळी जरी भाजपला यश मिळाले तरी, भाजपची मतांची टक्केवारी घटली आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आता भाजपच्या मतांचे प्रमाण बरेच कमी झाल्याचे विधानसभा निवडणूक निकाल दाखवून देतो. आसाममध्ये पंधरा वर्षे काँग्रेसचे सरकार होते, कुठचेच सरकार सहसा सलग चौथ्यांदा निवडून येत नसते. एका वर्षांत दोन कोटी रोजगार संधी निर्माण करू, अशी ग्वाही २०१४ सालच्या निवडणुकीवेळी भाजपने दिली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत केवळ १ लाख ३ हजार एवढ्याच रोजगार संधी निर्माण झाल्या. चतुर्र्वेदी म्हणाल्या की, गोव्यातील लोकही राज्य सरकारच्या अपयशाबाबत खूप बोलत असल्याचे ऐकायला येते. (प्रतिनिधी)