शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

मोदी सरकारकडून अपेक्षाभंग

By admin | Updated: May 27, 2016 02:54 IST

पणजी : केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा घोर अपेक्षाभंग केला आहे. देशात पेट्रोलचे दरही कमी झाले नाही, महागाईही नियंत्रणात आली

पणजी : केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा घोर अपेक्षाभंग केला आहे. देशात पेट्रोलचे दरही कमी झाले नाही, महागाईही नियंत्रणात आली नाही व विदेशातील काळा पैसाही परत आणून तो सरकारने लोकांच्या बँक खात्यात जमा केला नाही, असे अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्र्वेदी म्हणाल्या. प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्या उपस्थितीत येथे पत्रकार परिषदेत बोलताना चतुर्वेदी म्हणाल्या की, महागाई खूपच वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आत्महत्या केल्या. मात्र, त्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवली नाही. कोणतीच उपाययोजना केली नाही. दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा आधार होता; पण या योजनेसाठी जो निधी द्यावा लागतो तो देखील मोदी सरकारने दिला नाही. तो द्यावा अशी आठवण सर्वोच्च न्यायालयाने सरकारला करून द्यावी लागली. चतुर्र्वेदी म्हणाल्या की, अलीकडे काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांवेळी जरी भाजपला यश मिळाले तरी, भाजपची मतांची टक्केवारी घटली आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आता भाजपच्या मतांचे प्रमाण बरेच कमी झाल्याचे विधानसभा निवडणूक निकाल दाखवून देतो. आसाममध्ये पंधरा वर्षे काँग्रेसचे सरकार होते, कुठचेच सरकार सहसा सलग चौथ्यांदा निवडून येत नसते. एका वर्षांत दोन कोटी रोजगार संधी निर्माण करू, अशी ग्वाही २०१४ सालच्या निवडणुकीवेळी भाजपने दिली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत केवळ १ लाख ३ हजार एवढ्याच रोजगार संधी निर्माण झाल्या. चतुर्र्वेदी म्हणाल्या की, गोव्यातील लोकही राज्य सरकारच्या अपयशाबाबत खूप बोलत असल्याचे ऐकायला येते. (प्रतिनिधी)