शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

मोदी सरकारकडून अपेक्षाभंग

By admin | Updated: May 27, 2016 02:54 IST

पणजी : केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा घोर अपेक्षाभंग केला आहे. देशात पेट्रोलचे दरही कमी झाले नाही, महागाईही नियंत्रणात आली

पणजी : केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा घोर अपेक्षाभंग केला आहे. देशात पेट्रोलचे दरही कमी झाले नाही, महागाईही नियंत्रणात आली नाही व विदेशातील काळा पैसाही परत आणून तो सरकारने लोकांच्या बँक खात्यात जमा केला नाही, असे अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्र्वेदी म्हणाल्या. प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्या उपस्थितीत येथे पत्रकार परिषदेत बोलताना चतुर्वेदी म्हणाल्या की, महागाई खूपच वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आत्महत्या केल्या. मात्र, त्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवली नाही. कोणतीच उपाययोजना केली नाही. दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा आधार होता; पण या योजनेसाठी जो निधी द्यावा लागतो तो देखील मोदी सरकारने दिला नाही. तो द्यावा अशी आठवण सर्वोच्च न्यायालयाने सरकारला करून द्यावी लागली. चतुर्र्वेदी म्हणाल्या की, अलीकडे काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांवेळी जरी भाजपला यश मिळाले तरी, भाजपची मतांची टक्केवारी घटली आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आता भाजपच्या मतांचे प्रमाण बरेच कमी झाल्याचे विधानसभा निवडणूक निकाल दाखवून देतो. आसाममध्ये पंधरा वर्षे काँग्रेसचे सरकार होते, कुठचेच सरकार सहसा सलग चौथ्यांदा निवडून येत नसते. एका वर्षांत दोन कोटी रोजगार संधी निर्माण करू, अशी ग्वाही २०१४ सालच्या निवडणुकीवेळी भाजपने दिली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत केवळ १ लाख ३ हजार एवढ्याच रोजगार संधी निर्माण झाल्या. चतुर्र्वेदी म्हणाल्या की, गोव्यातील लोकही राज्य सरकारच्या अपयशाबाबत खूप बोलत असल्याचे ऐकायला येते. (प्रतिनिधी)