शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

मिठबावकर कुटुंबीयांना न्याय देण्याचा निर्धार

By admin | Updated: December 7, 2015 01:42 IST

पेडणे: गावडेवाडा-मोरजी येथील नीलेश श्रीकांत मिठबावकर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढाई लढून

पेडणे: गावडेवाडा-मोरजी येथील नीलेश श्रीकांत मिठबावकर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढाई लढून कुळाच्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी दि. ६ रोजी विविध सामाजिक संघटनांनी मिठबावकर कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन सविस्तर चर्चा केली. दि. २६ नोव्हेंबर रोजी नीलेश मिठबावकर यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या करण्याची घटना घडली होती. त्यांना २ वर्षांची आणि ३ वर्षांची अशा दोन मुली आहेत. नीलेश मिठबावकर व कुटुंबीय ज्या जागेत राहात होते ती जागा कुळ मूंडकार म्हणून नोंद आहे. हीच जागा बार्देश येथील एका मंत्र्याने विकत घेतली. जागा विकत घेताना कुळांना विश्वासात न घेताच लाड नामक मूळ भाटकाराने या मुंडकारांना सेटल न करताच पूर्ण जागा घरासह विकत घेतली आहे. ज्या मूळ घरात नीलेश मिठबावकर राहात होते, त्या घराच्या बाजूला त्यांनी एक छोटेखानी खोली व दुकानवजा बांधकाम केले होते. या बांधकामात जी खोली होती, ती खोली बिगर गोमंतकीयांना भाडेपट्टीवर दिली होती तर दुकान थाटून लहान लहान वस्तू विकून नीलेश आणि त्यांची पत्नी संसाराचा गाडा चालवत होते. मंत्र्यांच्या मुलाने दोन वर्षांपूर्वी सीआरझेड विभागाकडे तक्रार करून हे बांधकाम मोडून टाकले होते. त्या दिवसापासून नीलेश तणावाखाली होता. त्यातून त्याला दारूचे व्यसनही जडले. छोट्या मुलींना दूध आणायलाही पैसे नव्हते. पत्नी रोजंदारी करून कमवायची. त्यातच मन:स्थिती ठीक नसल्याचे २६ नोव्हेंबर रोजी नीलेशने आत्महत्या केली होती. ६ रोजी नीलेश मिठबांवकर कुटुंबीयांची पेडणे स्वाभिमान संघटनेचे अ‍ॅड. प्रसाद शहापूरकर, रोहिदास आरोलकर, विष्णू आजगावकर, गोवा प्रदेश कॉग्रेस उपाध्यक्ष बाबी बागकर, मांद्रे गट अध्यक्ष नारायण रेडकर आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे आदींनी भेट घेऊन त्यांची विचारपूस करून कायदेशीर लढा उभारून मिठबांवकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या कुटुंबीयांची आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांना सहानुभूती देण्याबरोबर न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे. गोवा प्रदेश कॉग्रेस उपाध्यक्ष बाबी बागकर यांनी प्रतिक्रिया देताना मिठबावकर कुटुंबीयावर जर अन्याय झाला असेल तर सरकारने त्यात लक्ष घालून सोडवला पाहिजे. या जमीन प्रकरणाविषयी ४ वर्षांपूर्वी मुंडकार तसेच जमीन घेणाऱ्या मंत्र्यांसोबत चर्चा झाली होती. मंत्र्यांनी त्यांच्या मागण्याही मान्य केल्या होत्या. मात्र मध्यस्थी करणाऱ्याने घोळ घातल्याने ही बोलणी फिस्कटली होती. आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे म्हणाले की, गेली शेकडो वर्षे किनारी भागात राहणाऱ्या स्थानिकांनाच बेघर करण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून मिठबावकर कुटुंबीयांवरील अन्याय व त्यांच्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी जरी रस्त्यावर यावे लागले तरीही आमची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले. पेडणे स्वाभिमानी संघटनेचे अ‍ॅड. प्रसाद शहापूरकर म्हणाले की या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करून कायदेशीर पद्धतीने लढाई लढण्यात येईल. मांद्रे गट कॉग्रेस नारायण रेडकर यांनीही मिठबाकर कुटुंबीयांना पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)