शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान गोव्यातील सर्व सरकारी नोकऱ्यांसाठी अनिवार्य करण्याची मागणी

By सूरज.नाईकपवार | Updated: January 4, 2024 16:11 IST

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

सूरज नाईकपवार, मडगाव : सर्व शासकीय भरतीसाठी कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान अनिवार्य करावे यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहिले आहे. शिक्षणतज्ज्ञांना विश्वासात घेऊन या दिशेने प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोंकणीचे केवळ ज्ञान आवश्यक असल्याची सध्याची अट भविष्यात नीज गोंयकारांना सरकारी नोकरीपासून वंचित ठेवून बिगर गोमंतकीयांना सरकारी नोकऱ्या बळकाण्यास मदत करेल, असा इशारा त्यांनी या पत्रातून दिला आहे.

कोंकणीला गोव्याची राजभाषा म्हणून मान्यता मिळाल्याची अधिसूचना तसेच सरकारी नोकरीतील गट अ, ब आणि क मधील सर्व सरकारी भरतींसाठी कोकणीचे केवळ ज्ञान गरजेचे असल्याचे बंधनकारक असल्याच्या विविध सरकारी अधिसूचनांचा आपल्या पत्रात संदर्भ दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी गट अ आणि ब पदांसाठी कोकणी केवळ ज्ञान अनिवार्य केले असल्याचे केलेले वक्तव्य नवीन नसल्याचे नमूद करुन जवळपास १० वर्षांपूर्वी सरकारने सदर निर्णयाची अधिसूचना जारी केली होती असे युरी आलेमाव यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले आहे.

आमच्या पुढच्या पिढ्यांनी आपल्या मातृभाषेचा कोकणीचा अभ्यास केला पाहिजे यासाठी आपण दीर्घकालीन योजना तयार करणे आवश्यक आहे. स्थानिक भाषेचे ज्ञान सरकारी अधिकारी आणि लोकांमध्ये संपर्क निर्माण करण्यास देखील मदत करते. मला आशा आहे की सरकार माझ्या सूचनेचा सकारात्मक विचार करेल, असे ते म्हणतात.

नवीन शैक्षणिक धोरण (NEP) देखील मातृभाषेतील शिक्षणावर भर देते हे युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान सक्तीचे केल्यास, राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीलाही या निर्णयामुळे बळ मिळेल. सरकारने दीर्घकालीन दृष्टीकोनातून संपूर्ण भरती प्रक्रियेचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्याच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. गोव्यात राहणारा कोणीही बाहेरील व्यक्ती दोन महिन्यांच्या कालावधीत साध्या संभाषणासाठी कोकणी भाषेचे व्यवहार्य ज्ञान मिळवू शकतो कारण कोकणी ही शिकण्यासाठी तुलनेने सोपी भाषा आहे. हिंदी किंवा मराठी भाषिक व्यक्ती शाळांमध्ये कोंकणी न शिकता अल्पावधीत कोंकणीमध्ये लिहिणे आणि बोलण्याचे कौशल्य स्वीकारू शकते, असे युरी आलेमाव यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणले आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत