शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘जैका’ची कामे देण्यास ४ वर्षांचा विलंब

By admin | Updated: August 4, 2015 02:37 IST

पणजी : ‘जैका’ची कामे देण्यास ४ वर्षांचा विलंब झाला. २००६ पासून २०१० पर्यंत काहीच कामे झाली नाहीत. वन खात्याचे ना हरकत दाखले मुदतही संपल्याने नवीन द्यावे लागले,

पणजी : ‘जैका’ची कामे देण्यास ४ वर्षांचा विलंब झाला. २००६ पासून २०१० पर्यंत काहीच कामे झाली नाहीत. वन खात्याचे ना हरकत दाखले मुदतही संपल्याने नवीन द्यावे लागले, असे बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले. मात्र, लुईस बर्जर लाच प्रकरणाबाबत व तत्संसंबधी होत असलेल्या आरोपांवर कोणतेही भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. बांधकाम खात्याच्या अनुदान मागण्यांवर चर्चेत आमदार माविन गुदिन्हो मंत्र्यावर तुटून पडले. ‘जैका’च्या कामात आजही भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर कोणतेही उत्तर देण्याचे ढवळीकर यांनी टाळले. ढवळीकर म्हणाले, ‘जैका’च्या कोणत्याही कामात व्यत्यय आलेला नाही. कामे देण्यास ४ वर्षांचा विलंब झाल्याने साहजिकच खर्च वाढला. पूर्वीच्या सरकारमधील बांधकाममंत्र्यांनी जी कामे लाटली त्यातील ४० कोटी रुपये खर्च कमी करून घेतला आणि तिजोरीत त्याचा फायदा केला. पाण्याचा महसूल ८४ कोटींवरून १२० कोटी रुपयांवर पोचला आहे. पाणी गळतीचे प्रमाण ४० टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे ते म्हणाले. पाण्याचे दर वाढले असले तरी त्याचा मर्यादित पाणी वापर करणाऱ्या मध्यमवर्गीयांना कोणताही फटका बसणार नाही. याची काळजी सरकारने घेतली असल्याचा दावा ढवळीकर यांनी केला. अन्य राज्यांच्या तुलनेत येथे दर कमी आहेत. १५ क्युबिक मीटरपर्यंत केवळ अडीच रुपये दर आहे. जास्त पाणी वापरल्यास जास्त बिल भरावे लागेल. जुवारी पुलाच्या पायाभरणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले जाणार आहे. १९ डिसेंबर ही तारीख तूर्त निश्चित असली तरी त्यांना त्याआधी आणणे शक्य असेल तर मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत, असे ढवळीकर म्हणाले. आमदार सुभाष फळदेसाई यांनी आक्रमक होत सांगेतील लोकांची मंत्र्यांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप केला. साळावलीच्या पाण्यात मॅगनिजचे प्रमाण लक्षणीय आढळले याबाबत ढवळीकर म्हणाले की, १०० एमएलडीचा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अत्याधुनिक फिल्टरिंगचे ५२ कोटीचे काम हाती घेतले जाईल. (प्रतिनिधी)