शहरं
Join us  
Trending Stories
1
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
3
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
4
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
5
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
6
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
7
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
8
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
10
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
11
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
12
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
13
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
14
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
15
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
16
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
17
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
18
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
19
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
20
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया

वाघांचे मृत्यू; गोव्याची अब्रू गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 06:17 IST

शांत आणि सुशिक्षित गोवा म्हणून या राज्याची देशभर ख्याती आहे,

पणजी : शांत आणि सुशिक्षित गोवा म्हणून या राज्याची देशभर ख्याती आहे, पण चक्क म्हादई अभयारण्यातच चार पट्टेरी वाघ मृत्युमुखी पडल्याने गोव्याची अब्रू चव्हाट्यावर टांगली गेल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे. वाघांच्या मृत्यूच्या घटनेची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली व सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.गोव्यातील जंगलांमध्ये पट्टेरी वाघ आहेत की नाही याविषयी काही वर्षांपूर्वी वाद होता, पण वन खात्याने लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये पाच वाघ टीपले गेले. त्यानंतर गोव्यात व्याघ्र प्रकल्प राबविला जावा अशा प्रकारच्या सूचना येऊ लागल्या. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी असताना २०१६ साली राज्य वन्यप्राणी मंडळाच्या बैठकीत व्याघ्र प्रकल्पाविषयीचा प्रस्तावही चर्चेस आला होता. नंतर पर्रीकर आजारी पडले व हा प्रस्तावही बारगळला.गेल्या आठवड्यात सत्तरी तालुक्यातील ठाणे पंचायत क्षेत्रात म्हणजेच म्हादई अभयारण्यातील गोळावली गावात मेलेल्या अवस्थेत वाघ सापडला. चार वर्षांचा तो वाघ विषबाधेमुळे मेल्याचा प्राथमिक निष्कर्ष वन खात्याने काढला. या प्रकरणी सखोल चौकशी करा, असा आदेश मग मुख्यमंत्री सावंत यांनी वन खात्याला दिला. त्या वाघाचे काही अवयव काढून चाचणीसाठी वन खात्याने हैद्राबाद व देहरादून येथील प्रयोगशाळांना पाठवले आहेत.या वाघाची नखे अगोदरच गायब झालेली असल्याचे खात्याला आढळून आले. तथापि, खात्याची चौकशी सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी वन खात्याला त्याच जागेत आणखी एक पट्टेरी वाघ मेलेल्या अवस्थेत आढळल्याने वन खात्यात आणि एकूणच सरकारी पातळीवर खळबळ उडाली आहे.