अपघातात कित्येकांनी गमावला जीव केपे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ देऊळमळ येथे जाणार्या धोकादायक वळणावर आतापर्यंत कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, अद्याप या धोकादायक वळणाकडे संबंधित खात्याच्या अधिकार्यांनी डोळेझाक केल्याने या भागातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे.गेल्या शनिवारी याच धोकादायक वळणावर अंदाज न आल्याने केपे न्यायालयाजवळ राहाणार्या वैजनाथ बसवंत कावरेकर यांच्या दुचाकीला रात्री ११.१५ वाजता अपघात झाल्याने त्यांला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना हॉस्पिसिओत नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाल्याचे केपे पोलिसांनी सांगितले.बर्याच वर्षांपासून हे वळण अत्यंत धोकादायक म्हणून ओळखले जात असले तरी या वळणावर सूचना फलक तसेच वाहनचालकांच्या सुरक्षेविषयी कोणतेच उपाय हाती न घेतल्याने दिवसेंदिवस छोट-मोठे अपघात घडत असल्याची माहिती मिळाली आहे.या वळणावर पूर्वी आंब्याचे झाड होते व यामुळे वाहनचालकांना कुडचडे ते केपे या मुख्य रस्त्यावरून येणार्या वाहनांचा अंदाज येत नसे. गेल्या वर्षी आंब्याचे झाड काढून टाकले होते. या वळणाचे रुंदीकरण केले असून रुंदीकरण करण्यात आलेली जागा खड्डेमय आहे. तसेच वळणाच्या मधोमध एक धोकादायक खड्डा आहे. तो गेल्या वर्षी संबंधित खात्याने बुजवला. मात्र, रुंदीकरण करण्यात आलेल्या वळणाचे डांबरीकरण करण्यात न आल्याने पूर्वीपेक्षा आता हे वळण धोकादायक बनल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.कुडचडे ते केपे या मुख्य रस्त्यावरून देऊळमळ येथे जाणार्या रस्त्यावर वर्षभरापूर्वी गतिरोधक असल्याचे सूचना फलक लावले आहेत. मात्र, आतापर्यंत कुठेच हे गतिरोधक वाहनचालकांच्या दृष्टीस न पडल्याने या भागातील लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.या वळणाचे त्वरित डांबरीकरण करून आवश्यक त्या उपाययोजना संबंधित खात्याने हाती घ्याव्यात, अशी मागणी लोकांनी केली आहे. (प्रतिनिधी)ढँङ्म३ङ्म : 0605-टअफ-04कॅप्शन: देऊळमळ येथे जाणार्या रस्त्यावरील अर्धवट स्थितीत करण्यात आलेले रुंदीकरण काम. (छाया: श्यामकांत नाईक)
केपे येथे धोकादायक वळणाचा त्रास
By admin | Updated: May 7, 2014 00:57 IST