शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : विदेशात समुद्रात अडकलेल्या खलाशाना सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय एजन्सींना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 19:53 IST

या गंभीर प्रश्नात आता आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ शिपिंगने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: विदेशी भूमीवर समुद्रातच अडकून पडलेल्या गोव्यातील खलाशांना परत मायभूमीत आणण्यासाठी भारत सरकारकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील खलाशी संघटनेने आता आंतरराष्ट्रीय एजन्सीचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. या गंभीर प्रश्नात आता आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ शिपिंगने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

विदेशी समुद्रात हजारो भारतीय खलाशाबरोबर सुमारे 7 हजार गोवेकरही अडकून पडले आहेत. इंडोनेशिया, फिलिपिन्स सारख्या देशांनी आपल्या खलाशाना सुखरूपपणे मायदेशात हलविले  तरी भारत सरकारने अजून काहीच पाऊले उचललेली नाहीत. याच पार्श्वभूमीवर अडकलेल्या एका खलाशाचे रोममध्ये निधन झाल्याने गोव्यात खलाशांच्या कुटुंबीयांचा धीर सुटू लागला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही आंतरराष्ट्रीय शिपिंग चेंबरच्या महा सचिवांना पत्र लिहून या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली आहे, त्याशिवाय आयटीएफचे सचिव व आयएलओच्या महानिरीक्षकांकडे  हा प्रश्न मांडल्याची माहीती  गोवा सीमेन संघटनेचे कॅ. वेंझी व्हिएगस यांनी सांगितले.

सध्या कोचीच्या बंदरात एम व्ही मारावेला ही बोट असून त्यात सुमारे 70  तर मुंबईला असलेल्या कर्णिका या बोटीत सुमारे 100 गोवेकर खलाशी अडकलेले आहेत. भारतात पोचूनही त्यांना खाली उतरता आलेले नाही. आम्ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडेही ही समस्या मांडली आहे. या खलाशाना क्वारान्टीन करण्यासाठी पाहिजे तर कोचीकडे खलाशाना घेऊन पोहोचलेल्या मारावेला या तसेच सध्या मुंबईत असलेल्या कर्णिका या दोन जहाजांचा वापर करता शक्य आहे. या दोन्ही जहाजावर किमान 5000 खलाशांची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

सध्या कित्येक खलाशांची प्रकृती चांगली आहे मात्र त्यानाही प्रादुर्भाव झालेल्या खलाशांच्या बरोबर राहावे लागते त्यामुळे त्यांचीही प्रकृती चिंताजनक होण्याची भीती आहे . त्यासाठीच वेगाने हालचाली करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी गोवा फॉरवर्ड पक्षाने या प्रश्नात राज्यपालांनी लक्ष घालावे आणि त्या त्या देशातील भारतीय दूतावसाना सतर्क करीत मदत आराखडा तयार करावा अशी मागणी केली होती. गरज पडल्यास मुरगाव बंदर यासाठी निर्देशित बंदर म्हणून जाहीर करून याच बंदरावर त्यांना क्वारंटाइन करून ठेवण्याची सोय करावी अशी मागणी केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या