शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : विदेशात समुद्रात अडकलेल्या खलाशाना सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय एजन्सींना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 19:53 IST

या गंभीर प्रश्नात आता आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ शिपिंगने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: विदेशी भूमीवर समुद्रातच अडकून पडलेल्या गोव्यातील खलाशांना परत मायभूमीत आणण्यासाठी भारत सरकारकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील खलाशी संघटनेने आता आंतरराष्ट्रीय एजन्सीचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. या गंभीर प्रश्नात आता आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ शिपिंगने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

विदेशी समुद्रात हजारो भारतीय खलाशाबरोबर सुमारे 7 हजार गोवेकरही अडकून पडले आहेत. इंडोनेशिया, फिलिपिन्स सारख्या देशांनी आपल्या खलाशाना सुखरूपपणे मायदेशात हलविले  तरी भारत सरकारने अजून काहीच पाऊले उचललेली नाहीत. याच पार्श्वभूमीवर अडकलेल्या एका खलाशाचे रोममध्ये निधन झाल्याने गोव्यात खलाशांच्या कुटुंबीयांचा धीर सुटू लागला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही आंतरराष्ट्रीय शिपिंग चेंबरच्या महा सचिवांना पत्र लिहून या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली आहे, त्याशिवाय आयटीएफचे सचिव व आयएलओच्या महानिरीक्षकांकडे  हा प्रश्न मांडल्याची माहीती  गोवा सीमेन संघटनेचे कॅ. वेंझी व्हिएगस यांनी सांगितले.

सध्या कोचीच्या बंदरात एम व्ही मारावेला ही बोट असून त्यात सुमारे 70  तर मुंबईला असलेल्या कर्णिका या बोटीत सुमारे 100 गोवेकर खलाशी अडकलेले आहेत. भारतात पोचूनही त्यांना खाली उतरता आलेले नाही. आम्ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडेही ही समस्या मांडली आहे. या खलाशाना क्वारान्टीन करण्यासाठी पाहिजे तर कोचीकडे खलाशाना घेऊन पोहोचलेल्या मारावेला या तसेच सध्या मुंबईत असलेल्या कर्णिका या दोन जहाजांचा वापर करता शक्य आहे. या दोन्ही जहाजावर किमान 5000 खलाशांची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

सध्या कित्येक खलाशांची प्रकृती चांगली आहे मात्र त्यानाही प्रादुर्भाव झालेल्या खलाशांच्या बरोबर राहावे लागते त्यामुळे त्यांचीही प्रकृती चिंताजनक होण्याची भीती आहे . त्यासाठीच वेगाने हालचाली करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी गोवा फॉरवर्ड पक्षाने या प्रश्नात राज्यपालांनी लक्ष घालावे आणि त्या त्या देशातील भारतीय दूतावसाना सतर्क करीत मदत आराखडा तयार करावा अशी मागणी केली होती. गरज पडल्यास मुरगाव बंदर यासाठी निर्देशित बंदर म्हणून जाहीर करून याच बंदरावर त्यांना क्वारंटाइन करून ठेवण्याची सोय करावी अशी मागणी केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या