शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

Coronavirus : सरकार आर्थिक अडचणीत, सध्या पॅकेज अशक्य : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 19:28 IST

अनेक उद्योग- व्यवसाय अडचणीत आहेत याची सरकारला कल्पना आहे व सरकार स्थिती समजून घेते पण सध्याच्या टप्प्यावर तरी आम्ही कुणाला पॅकेज देऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पणजी : सरकार आर्थिक अडचणीतून जात आहे व त्यामुळे सध्या राज्यातील कोणत्याही व्यवसाय धंद्यासाठी सरकार पॅकेज देऊ शकणार नाही असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. अनेक उद्योग- व्यवसाय अडचणीत आहेत याची सरकारला कल्पना आहे व सरकार स्थिती समजून घेते पण सध्याच्या टप्प्यावर तरी आम्ही कुणाला पॅकेज देऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.सावंत यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. राज्यातील विविध व्यवसायातील घटक मला फोन करतात, तसेच मेलद्वारे व अन्य प्रकारेही संदेश पाठवतात. सरकारने पॅकेज द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. सध्या सगळेच अडचणीत आहेत हे प्रत्येकाने समजून घ्यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. जे लोक भाडय़ाच्या घरात राहतात, त्यांच्याकडून कुणी एका महिन्याचे भाडे सध्या घेऊ नये असे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सूचविले. अनेक मासळी व्यवसायिक वगैरे साठवून ठेवलेली मासळी आता ज्यादा दराने विकतात अशा तक्रारी येतात. आम्ही प्रसंगी चौकशी सुरू करू. कुणीच लोकांच्या स्थितीचा सध्या गैरफायदा घेऊन ज्यादा दराने मासळी विकू नये असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.खलाशांबाबत केंद्र निर्णय घेईलहजारो गोमंतकीय जहाजावर विदेशात अडकले आहेत व तिथे त्यांना निगराणीखाली ठेवले गेले आहे. त्यांना गोव्यात आणल्यास त्यांना इथे ठेवता येईल पण त्यांना गोव्यात आणण्यासाठी केंद्रीय विदेश व्यवहार मंत्रलयाची आम्हाला मान्यता हवी आहे. हा राष्ट्रीय विषय आहे, केवळ गोवेकरच नव्हे तर देशातील हजारो लोक अशा प्रकारे विदेशात अडकले आहेत. त्यांच्याविषयी काय निर्णय घ्यावा ते केंद्र सरकार ठरवील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मला सासष्टी तालुक्यातील अनेक आमदार मंगळवारी भेटले. त्यांच्यासोबत माझी बैठक झाली. मी विदेशातील गोमंतकीयांचा विषय दोनवेळा पंतप्रधानांसमोर मांडला आहे. केंद्र सरकार त्यावर विचार करत असून अजून केंद्राचा निर्णय झालेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या