शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

CoronaVirus : परराज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी कृती योजना तयार करा - दिगंबर कामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 23:23 IST

CoronaVirus : वाळपईच्या नवोदय विद्यालयाचे १३ विद्यार्थी दिल्लीत अडकले आहेत.

पणजी : देशभरात ठिकठिकाणी शिक्षणासाठी असलेल्या आणि लॉकडाउनमुळे अडकलेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे बोलून कृती योजना तयार करावी तसेच सहलीवर गेलेले काही विद्यार्थीही अडकले आहेत त्यांनाही परत आणावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. 

शनिवारी मुख्यमंत्री सावंत यांनी असे म्हटले होते की, देशात ठिकठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिका-यांची परवानगी घेऊन गोव्यात येता येईल. परंतु येथे आल्यानंतर त्यांना १४ दिवस क्वारंटाइन रहावे लागेल. यावर कामत यांनी मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे म्हटले आहे. गेले ४३ दिवस गोव्यातील विद्यार्थी परराज्यात अडकून पडलेले आहेत. 

दरम्यान, वाळपईच्या नवोदय विद्यालयाचे १३ विद्यार्थी दिल्लीत अडकले आहेत. तर विद्यार्थी देवणा घेवाण उपक्रमांतर्गत गोव्यात आलेले मंगेशपूर, दिल्लीच्या नवोदय विद्यालयाचे इयत्ता नऊवीचे १८ विद्यार्थी येथे अडकले आहेत. पुणे येथे उच्च शिक्षणासाठी गोव्यातील शेकडो विद्यार्थी आहेत. २२ मार्चच्या देशव्यापी कर्फ्युनंतर लगेच लॉकडाउन जाहीर झाल्याने या विद्यार्थ्यांना गोव्यात येता आले नाही. देशाच्या अन्य भागांमध्येही गोमंतकीय विद्यार्थी अडकलेले आहेत आणि ते मदतीची अपेक्षा करीत आहेत. 

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या