शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

लॉकडाऊनच्या नियंत्रणामुळे गोव्यातील अपघाती मृत्यूंचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 20:15 IST

यंदाच्या जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत एकूण 1387 रस्ता अपघात घडले असून त्यात 131 जणांना मृत्यू आला.

मडगाव: लॉकडाऊनमुळे गोव्यात बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी काही बाबतीत फायदाही झाला आहे. लॉकडाऊन निर्बंधामुळे गोव्यातील अपघातांचे प्रमाण तब्बल 32 टक्क्यांनी कमी झाले असून अपघाती मृत्यूंचे प्रमाणही 26 टक्क्यांनी खाली आले आहे.

यंदाच्या जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत एकूण 1387 रस्ता अपघात घडले असून त्यात 131 जणांना मृत्यू आला. मागच्या 2019 वर्षात पहिल्या सात महिन्यात हेच प्रमाण 2027 अपघातात 177 बळी असे होते. तुलनात्मक आकडेवारी पाहिल्यास अपघाताचे प्रमाण 32.02 टक्के तर मृत्यूचे प्रमाण 25.99 टक्के कमी झाल्याचे दिसून आले आहे. एप्रिल व मे महिन्यात राज्यातील वाहतूक जवळपास बंद होती त्याचाच हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे.

यंदा 131 जणांना मृत्यू आला आहे त्यात 81 दुचाकीस्वार, 10 पाठीमागे बसलेले, 22 पादचारी, 4 प्रवासी, 9 इतर वाहन चालक, 1 सायकलस्वार तर 4 इतरांचा समावेश आहे. 2019 साली 105 दुचाकीस्वार, 21 मागे बसणारे, 25 पादचारी, 18 प्रवासी, तीन वाहन चालक, 2 सायकलस्वार तर अन्य तिघांचा समावेश होता.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात