शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

आठ माइनस्वीपर युद्धनौका बांधण्याचे

By admin | Updated: December 1, 2014 02:11 IST

दक्षिण कोरियासोबतचा व्यवहार रद्द केल्यानंतर इंटेग्रिटी बॉण्डचे ३ कोटीही जप्त

पणजी : नौदलासाठी माइनस्वीपर युद्धनौका खरेदीचा दक्षिण कोरियासोबतचा व्यवहार रद्द केल्यानंतर इंटेग्रिटी बॉण्डचे ३ कोटी रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. आठ माइनस्वीपर युद्धनौका गोवा शिपयार्डमध्ये बांधल्या जातील, अशी माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. दक्षिण कोरियाच्या कांग्नम कॉर्पोरेशनने केंद्रीय संरक्षण मंत्रालयासोबत २७00 कोटींच्या दोन माइन काउंटर नौकांबाबत करार केला होता. व्यवहारात वाटाघाटींसाठी एजंटांनी कंपनीचा वापर केला, या कारणास्तव हा व्यवहार रद्द करण्यात आला. पर्रीकर यांनी संरक्षणमंत्री बनल्यानंतर घेतलेला हा पहिला मोठा निर्णय होता. स्वदेशी तंत्रज्ञानावर अधिकाधिक भर दिला जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘मेक इन इंडिया’ मोेहिमेचा भाग म्हणून अधिकाधिक भारतीय तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. पर्रीकर म्हणाले की, यापूर्वी अशाच पद्धतीच्या नौका विदेशातून आणल्या जात होत्या आणि येथे मॉडिफाय केल्या जात होत्या. शक्य तेथेच विदेशी तंत्रज्ञान घेतले जाईल; कारण पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका तयार करणे शक्य नाही. उच्च तंत्रज्ञानापुरतेच विदेशी सहकार्य मर्यादित ठेवले जाईल. युद्ध आणि ऊर्जा सुरक्षा या दोन गोष्टी अशा आहेत, की या बाबतीत स्वयंपूर्णता आवश्यक आहे. कल्याणकारी उपायांना गती संरक्षण दलात वाढत्या आत्महत्यांबाबत विचारले असता, जवानांसाठी कल्याणकारी उपायांना आपण गती देणार आहे. शस्त्र खरेदीपेक्षा ते महत्त्वाचे आहे. शस्त्र हाती धरणारा जवान मजबूत असला पाहिजे, असे पर्रीकर म्हणाले. आत्महत्यांच्या कारणाची चौकशी करण्यास आपण सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल, असे मतही त्यांनी मांडले. गोव्यात नौदलाच्या जवानांसाठी ७00 ते ८00 सदनिका बांधल्या जात आहेत. हे काम संथगतीने चालू आहे. या कामाचा आढावा घेतला जाईल. जवानांमध्ये एकटेपणा तसेच कुटुंबापासून दूर राहणे ही आत्महत्येची कारणे आहेत. २0११ पासून संरक्षण दलात आत्महत्येची ४४९ प्रकरणे घडल्याचे अलीकडेच पर्रीकर यांनी संसदेत सांगितले होते. दरम्यान, खासदार सीताराम येचुरी यांनी केलेल्या आवाहनाबद्दल विचारले असता पर्रीकर म्हणाले, देशाच्या संरक्षणाला प्राधान्य देऊन देशहिताचेच निर्णय घेतले जातील. (प्रतिनिधी)