शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा : नाईक

By admin | Updated: April 21, 2015 01:39 IST

मडगाव : काँग्रेस पक्षाच्या चार माजी मुख्यमंत्र्यांना आता कंठ फुटू लागला असून ते भाजप सरकार सत्तेवर आल्यास तीन वर्षे पूर्ण होऊन देखील

मडगाव : काँग्रेस पक्षाच्या चार माजी मुख्यमंत्र्यांना आता कंठ फुटू लागला असून ते भाजप सरकार सत्तेवर आल्यास तीन वर्षे पूर्ण होऊन देखील कोणतीच विकासकामे करण्यास सरकारला अपयश आल्याचे सांगत सुटले आहेत. परंतु, भाजप सरकारने गेल्या तीन वर्षांत गोव्यात अनेक विकासकामे केली आहेत. काँग्रेस पक्षाने येत्या निवडणुकीपूर्वी आपला मुख्यमंत्री कोण ते जाहीर करावे, असे आव्हान भाजप प्रवक्ते दामोदर नाईक यांनी दिले आहे.मडगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दामोदर नाईक म्हणाले, भाजप सरकारने गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जी आश्वासने जाहीरनाम्यात दिली होती त्यातील ७० ते ८० टक्के कामे पूर्ण केली आहेत. भाजपने गेल्या तीन वर्षांत कालवी पूल पूर्ण केला आहे. सध्या मांडवी नदीवरील नव्या पुलाचे काम सुरू आहे. पणजी येथे १०० कोटी खर्चून पार्किंग प्लाझा बांधण्यात आला असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. अनेक ठिकाणी चारपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. खांडेपार पुलाची पायाभरणी करण्यात आली आहे.ओल्ड गोवा रस्त्याचे रुंदीकरण, लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत युवतींना लाभ, गृह आधार व दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थींच्या खात्यात दरमहा रक्कम जमा केली जात आहे. विरोधक केवळ लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच काँगे्रस पक्षाने येत्या विधानसभा निवडणुकीत आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण ते जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसच्या नेत्यांना दिले आहे. (प्रतिनिधी)