शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

१२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या गोवंश कत्तलीस सशर्त परवानगी

By admin | Updated: September 19, 2014 01:44 IST

हायकोर्टाचा निर्णय : सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा राष्ट्रीय गोरक्षा सेनेचा निर्धार

पणजी : बकरी ईदसाठी १२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या गोवंश कत्तलीस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त परवानगी दिली असून राष्ट्रीय गोरक्षा सेना त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहे. बकरी ईदसाठी राज्यात ठिकाठिकाणी बैल, तसेच अन्य गोवंश हत्येला परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका अखिल भारतीय मुस्लिम जमात संघटनेने हायकोर्टात सादर केली होती त्यास हरकत घेत गोरक्षा अभियानचे हनुमंत परब यांनी हस्तक्षेप याचिका गुदरली. या प्रकरणी गुरुवारी सुनावणीच्यावेळी अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी गोवंश हत्येसाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारला आठ दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी केली. गोवा मांस प्रकल्पात कत्तलीच्यावेळी सीसीटीव्ही कार्यरत असावा, तसेच अन्य शर्थी आहेत. सरकारवर टीकेची झोड दरम्यान, गोरक्षा अभियानने सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन सरकारने याबाबत घेतलेल्या बोटचेप्या धोरणावर कडक टीका केली. पर्रीकर सरकार अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करीत आहे, असा आरोप राष्ट्रीय गोरक्षा सेनेचे अध्यक्ष आशु मोंगिया यांनी केला. ईदच्या दिवशी कुर्बानी देणे हा मुस्लिमांचा हक्क नव्हे, असा निवाडा १९९४ साली पश्चिम बंगाल सरकार विरुद्ध आशुतोष प्रकरणात झालेला आहे. तसेच गुजरातच्या एका प्रकरणातही अशाच प्रकारचा निवाडा झालेला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. कमलेश बांदेकर म्हणाले की, सरकारने घेतलेली भूमिका धक्कादायक असून अपेक्षाभंग केलेला आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. हस्तक्षेप याचिका सादर केलेले राष्ट्रीय मुस्लिम मंचच्या गो विभागाचे मोहम्मद फैज खान म्हणाले की, इस्मालमध्ये कुर्बानी सक्तीची नाहीच उलट इतरांचे मन दुखावेल असे काही करू नका, असा संदेश कुराणातून दिला जातो. गोहत्याविरोधात आपली मोहीम चालूच राहणार असल्याचे स्पष्ट करून त्यांनी पुढे असेही सांगितले की, येत्या ६ ते १५ आॅक्टोबर या काळात देशभरातील १00 हून अधिक शहरांमध्ये गो सन्मान सोहळे साजरे करणार आहोत. पत्रकार परिषदेस जय श्रीराम केंद्राचे लक्ष्मण जोशी, हिंदू जनजागृती समितीचे सुशांत दळवी, मुंबईचे प्राणीमित्र प्रदीप पांडे, हरे राम हरे कृष्णचे प्रवीण फडते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)