शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मासळीची निर्यात आधी बंद करा : काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 18:30 IST

गोव्यातून होणारी मासळीची निर्यात आधी बंद करा आणि नंतरच आयातबंदीचा आदेश काढा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

पणजी : गोव्यातून होणारी मासळीची निर्यात आधी बंद करा आणि नंतरच आयातबंदीचा आदेश काढा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. निर्यात बंद न केल्यास राज्यात मासळीची भीषण टंचाई निर्माण होईल, अशी भीती पक्षातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. 

पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संकल्प आमोणकर यांनी मासळीची आयात बंद करावी, अशी पक्षाचे सुरवातीपासून मागणी होती. परंतु त्याचबरोबर निर्यातीवरही आधी बंदी आणली पाहिजे. आज आयातबंदीचा आदेश काढला जाणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशी यंत्रणा सरकारकडे आहे का? असा सवाल त्यांनी केला. आमोणकर म्हणाले की,‘खाजगी किं वा मालवाहू वाहनांमधून परराज्यातून मासळी आणली जाऊ शकते. आंतरराज्य बसगाड्या, रेल्वेमधूनही मासळी आणली जात आहे. हे प्रकार बंद करण्यासाठी काय पावले उचलली आहेत हे जनतेसाठी स्पष्ट व्हायला हवे.’

आमोणकर पुढे म्हणाले की, ‘गोव्यात मिळणारी मासळी गोवेकरांनाच मिळाली पाहिजे. या मासळीची निर्यात होता कामा नये. कारण सरकार मच्छिमारांना व्यवसायासाठी सबसिडीच्या स्वरुपात वर्षाकाठी १00 कोटी रुपये देते. गोमंतकीयांना मासळी माफक दरात उपलब्ध व्हायला हवी. जी मासळी गोवेकर खात नाहीत ती मासळी मासळी निर्यात करण्यास हरकत नाही.’

फॉर्मेलिन वादाच्या बाबतीत ते म्हणाले की, ‘ आरोग्यमंत्री विश्वजित राणे, नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई आणि मडगांवच्या घाऊक मासळी बाजारातील माफिया इब्राहिम मौलाना या तिघांनी नाटक रचले असून मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असेच चालले आहे. इब्राहिम मौलाना याच्याविरुध्द अजून गुन्हा का नोंदविला नाही याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्र्यांनी द्यायला हवे.’

    मच्छिमारीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी 

या सर्व वादात मच्छिमारीमंत्री विनोद पालयेंकर मौन बाळगून आहेत. ते कोणाच्या दबावाखाली येऊन गप्प आहेत, असा सवाल आमोणकर यांनी केला असून खाते चालवायाला जमत नसेल तर पालयेंकर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाजुला व्हावे, अशी मागणी केली आहे. मासळीशी संबंधित विषय असतानाही पालयेंकर काहीही बोलायला तयार नाहीत, हे काय दर्शविते, असा सवालही त्यांनी केला.