शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नाफ्था प्रकरणी शिपिंग सचिवांमार्फत चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 19:20 IST

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर विरोधी नेते दिगंबर कामत यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

पणजी : वास्कोतील नाफ्थाच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते आमदार दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. नाफ्था वाहतूक रस्तामार्गे केली जाणार नाही. तसेच या एकूण प्रकरणात शिपिंग सचिवांमार्फत चौकशी करण्याचे आणि एमपीटी चेअरमनविरुद्ध १५ दिवसांत एफआयआर नोंदवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर विरोधी नेते दिगंबर कामत यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले की, नाफ्था सडा येथील गणेश बेंझोप्लास्टमध्ये साठविण्यात आल्याने तेथील लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वास्कोतील काँग्रेस कार्यकर्ते या प्रश्नावर गेले काही दिवस जोरदार निदर्शने करत आहेत. लोकांची मागणी आहे की त्या ठिकाणी नाफ्था साठवणे धोकादायक असून जीवितहानी होऊ शकते तसेच रस्तामार्गेनाफ्थाची वाहतूक केल्यास कोणतीही दुर्घटना घडू शकते. त्यामुळे नाफ्था जहाजातून समुद्रमार्गेच अन्यत्र हलवावा.

दुसरी मागणी अशी आहे की, सरकारने हे प्रकरण चौकशीसाठी डीजी, शिपिंगकडे देऊ केले आहे, ते अयोग्य आहे. कारण हे जहाज मुरगाव बंदरात आणण्यास डीजी, शिपिंग कारणीभूत आहे, त्यामुळे चौकशीला न्याय मिळणार नाही. हे जहाज कोचीहून गोव्यात कोणी आणले? वाटेत अनेक बंदरे असतांना तेथे का गेले नाही? मुरगाव बंदरात जहाज दुरुस्तीची कोणतीही सोय नाही. त्यामुळे दुरुस्तीसाठी ते आणले ही सबब पटण्यासारखी नाही. या एकूण प्रकरणाची चौकशी आवश्यक आहे.'

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर म्हणाले की, आम्ही सहा कलमी मागण्या निवेदनाद्वारे सरकारकडे मांडलेल्या आहेत. एमपीटी चेअरमन ई. रमेश कुमार यांच्याविरुद्ध या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात यावा अशी आमची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी यावर पंधरा दिवसात योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

या जहाजाचा गोव्याच्या समुद्र हद्दीतील प्रवेश संशयास्पद आहे. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. संरक्षण गुप्तचर यंत्रणा किंवा राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा यांच्यामार्फत ही चौकशी होणे आवश्यक आहे. वास्कोत दाट लोकसंख्या असल्याने गणेश बॅन्जोप्लास्टमध्ये साठवलेला हा धोकादायक ठरणार आहे. अ श्रेणीच्या जहाजातूनच तो सुरक्षितरित्या अन्यत्र हलवावा, रस्ता मार्गाचा वापर करू नये. मंत्री मिलिंद नाईक यांनी मुख्य सचिव परिमल राय यांचे त्या जहाजाशी लागेबांधे असल्याचा आरोप केला आहे त्याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे आमोणकर म्हणाले.

शिष्टमंडळात महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, एनएसयूआयचे प्रमुख जनार्दन भांडारी,  प्रदेश सचिव नारायण रेडकर, सुदीन नाईक आदी उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवा