शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

बिहारमधील बदलाची पूर्वकल्पना आली होती: राजेंद्र आर्लेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2024 11:17 IST

'लोकमत'च्या प्रतिनिधीने गोव्याहून आर्लेकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : बिहारमध्ये जे राजकीय बदल झाले, त्याची पूर्वकल्पना मला आली होती, असे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सोमवारी सांगितले. विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी आपले कायम चांगले संबंध राहिले आहेत, असेही आर्लेकर यांनी नमूद केले.

'लोकमत'च्या प्रतिनिधीने गोव्याहून आर्लेकर यांच्याशी काल फोनवरून संपर्क साधला. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा रविवारी सकाळी राजीनामा दिला. सायंकाळी भाजपच्या साथीने त्यांचा संसार पुन्हा सुरू झाला. सायंकाळी नव्याने शपथविधी झाला. नितीशकुमार पुन्हा नवव्यांदा मुख्यमंत्री झाले. आपल्याला या घडामोडींची चाहूल लागली होती काय? असे विचारले असता, आर्लेकर हसले. 'एखादी गोष्ट तयार होते तेव्हा कुठून तरी वास हा येतच असतो. तसा वास मला आला होता. त्या अर्थाने मला पूर्वकल्पना आली होती, एवढेच मी म्हणतो. मला कुणी येऊन काही सांगितले नव्हते. संभाव्य घडामोडींची चाहूल मला लागली,' असे आर्लेकर म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी माझे पूर्वीपासूनच चांगले संबंध राहिले. आमच्यात कधी संघर्ष झाला नाही, वितुष्ट आले नाही, असे राज्यपाल आर्लेकर म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण