शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

बिहारमधील बदलाची पूर्वकल्पना आली होती: राजेंद्र आर्लेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2024 11:17 IST

'लोकमत'च्या प्रतिनिधीने गोव्याहून आर्लेकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : बिहारमध्ये जे राजकीय बदल झाले, त्याची पूर्वकल्पना मला आली होती, असे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सोमवारी सांगितले. विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी आपले कायम चांगले संबंध राहिले आहेत, असेही आर्लेकर यांनी नमूद केले.

'लोकमत'च्या प्रतिनिधीने गोव्याहून आर्लेकर यांच्याशी काल फोनवरून संपर्क साधला. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा रविवारी सकाळी राजीनामा दिला. सायंकाळी भाजपच्या साथीने त्यांचा संसार पुन्हा सुरू झाला. सायंकाळी नव्याने शपथविधी झाला. नितीशकुमार पुन्हा नवव्यांदा मुख्यमंत्री झाले. आपल्याला या घडामोडींची चाहूल लागली होती काय? असे विचारले असता, आर्लेकर हसले. 'एखादी गोष्ट तयार होते तेव्हा कुठून तरी वास हा येतच असतो. तसा वास मला आला होता. त्या अर्थाने मला पूर्वकल्पना आली होती, एवढेच मी म्हणतो. मला कुणी येऊन काही सांगितले नव्हते. संभाव्य घडामोडींची चाहूल मला लागली,' असे आर्लेकर म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी माझे पूर्वीपासूनच चांगले संबंध राहिले. आमच्यात कधी संघर्ष झाला नाही, वितुष्ट आले नाही, असे राज्यपाल आर्लेकर म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण