शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गोव्यात बायोगॅसवर चालणारी बस विनावापर, अग्निशामक दलाकडून अद्याप सुरक्षाविषयक दाखला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 15:57 IST

पणजी - कदंब महामंडळाने मोठा गाजावाजा करुन रस्त्यावर आणलेल्या स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीच्या तीनपैकी बायोगॅसवर चालणारी एक बस विनावापर पडून आहेत. गेल्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी बायोगॅसवर चालणारी एक आणि बायो इथॅनॉलवर चालणाऱ्या दोन बसगाड्यांचा शुभारंभ केला होता. बायोगॅसवर चालणारी बस कदंबच्या पर्वरी आगारात पडून आहे.सुत्रांनी दिलेल्या ...

पणजी - कदंब महामंडळाने मोठा गाजावाजा करुन रस्त्यावर आणलेल्या स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीच्या तीनपैकी बायोगॅसवर चालणारी एक बस विनावापर पडून आहेत. गेल्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी बायोगॅसवर चालणारी एक आणि बायो इथॅनॉलवर चालणाऱ्या दोन बसगाड्यांचा शुभारंभ केला होता. बायोगॅसवर चालणारी बस कदंबच्या पर्वरी आगारात पडून आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशामक दलाकडून सुरक्षाविषयक दाखला न मिळाल्याने ही बस बंद आहे. महामंडळाने बायोगॅस प्रकल्पासाठी कंपनीला जागा दिलेली आहे परंतु स्वीडनच्या या कंपनीने ज्या संस्थेशी हातमिळवणी केली आहे. त्या संस्थेने परवान्यासाठी आवश्यक ते दस्तऐवज अग्निशमक दलाला सादर केलेले नाहीत. बस बंद असल्याने इंजिन खराब होऊ नये याकरिता रोज ही बस काही वेळ चालू करुन नंतर बंद केली जाते.

इथेनॉलवर चालणाऱ्या अन्य दोन बसगाड्या मात्र पणजी-मडगांव आणि पणजी-वास्को शटल सेवेसाठी तैनात करण्यात आल्या परंतु यातील पणजी-वास्को मार्गावरील बसची एसी गेला महिनाभर बंद आहे. तांत्रिकी कारणामुळे एसी बंद असल्याचे सांगण्यात येते. पणजी-मडगांव मार्गावरील बसमधील एसीबाबतही प्रवाशांच्या तक्रारी आहेत. लोक या बसगाड्यांमधून म्हणूनच प्रवास टाळत आहेत. या बसगाड्यांची बांधणीच अशी आहे की खिडक्या उघडता येत नाहीत. पूर्ण काचेचे आच्छादन असल्याने एसीची गरज भासते.सुत्रांनी दिलेल्या अन्य माहितीनुसार या बसगाड्या दिवशी १८0 ते १८५ किलोमीटर इतकेच अंतर धावत आहेत. कदंब महामंडळाच्या इतर बसगाड्या दिवशी ३00 किलोमीटर धावतात. गोव्यातील रस्ते अरुंद असल्याने या मोठ्या बसगाड्यांसाठी तीही एक समस्या आहे.स्कॅनिया कंपनीच्या या बसगाड्या प्रायोगिक तत्त्वावर कदंब महामंडळाने घेतल्या होत्या. प्रयोग यशस्वी झाल्यास आणखी ५0 गाड्या खरेदी केल्या जाणार होत्या. सध्या या बसगाड्यांना लागणारे इथेनॉल नागपूरहून आणले जाते. प्रवासखर्च परवडत नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार २0 रुपये लिटर दर अपेक्षित होता परंतु वाहतूक खर्च वाढल्याने हे इंधन ५0 ते ५५ रुपये प्रति लिटर पडते. प्रती लिटर १.१ किलोमिटर मायलेज या बसगाड्या देतात. तूर्त इथेनॉल इंधनाचा व चालकाचा खर्च कंपनी उचलत आहेत, कदंबचा वाहकच तेवढा या बसगाड्यांवर असतो.

अशी आहे व्यवस्थापूर्णपणे वातानुकुलीत असलेली ही बस ३७ आसनी असून इंजिन मागील बाजूस आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आणि जीपीएस सिस्टम असल्याने बस नेमकी कुठे आहे हे ट्रॅक केले जाऊ शकते. या बसचे खास वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांगांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढण्या-उतरण्यासाठी सोयीचे व्हावे याकरिता अशी व्यवस्था आहे की बसचे फ्लोरिंग खाली घेता येते. गतिरोधक आला किंवा रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले असल्यास फ्लोरिंग एक फूट वर घेता येते.

केवळ प्रयोगासाठी : कार्लुस आल्मेदाकदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दिलेल्या माहितीनुसार या बसगाड्या केवळ प्रयोगासाठी आणल्या होत्या. त्यांच्या कार्यक्षमतेचा आढावा अजून घ्यायचा आहे. या बसगाड्या पुढे चालू ठेवाव्यात की नाही हे आढावा घेतल्यानंतरच ठरविले जाईल. याच कंपनीच्या बायो इथॅनॉलवर चालणाºया बसेस सध्या नागपूर महापालिकेच्या ताफ्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. बायोगॅसचा इंधन म्हणून वापर होत असल्याने या बसगाड्या प्रवाशांचा किती भार वाहू शकतात, इंजिन गरम होते का या सर्व गोष्टी तपासाव्या लागतील.

टॅग्स :goaगोवा