शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गोव्यातील भाजपा सरकारही आता दबावमुक्त

By admin | Updated: May 21, 2014 02:01 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अतिशय भक्कम असे सरकार चालविण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता लाभली आहे.

पणजी : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भक्कम असे सरकार अधिकारावर येत असल्यामुळे गोवा सरकारही आता दबावमुक्त झाले आहे. आता कोणत्याच प्रश्नावरून सरकारवर विरोधकांचाही दबाव येणार नाही आणि सत्ताधारी आघाडीचेही घटक सरकारला कोणत्याच विषयाबाबत आव्हान देऊ शकणार नाहीत. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अतिशय भक्कम असे सरकार चालविण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता लाभली आहे. काँग्रेसचे काही आमदार पर्रीकर सरकारबाबत आता सहानुभूती दाखवत असले तरी, सरकारला या आमदारांची गरजच नाही, अशी स्थिती आली आहे. आमदार माविन गुदिन्हो किंवा बाबूश मोन्सेरात यांच्या पाठिंब्याची किंवा सहानुभूतीची आता भाजपला गरज राहिलेली नाही. नुवेचे आमदार मिकी पाशेको यांना यापूर्वी मंत्रिपद देण्याची ग्वाही भाजपने दिली होती, असे सांगितले जाते; पण आता सरकार एवढे भक्कम बनले आहे की पाशेको यांना मंत्रिमंडळात घेण्याचा सरकार विचारही करणार नाही, असे काही भाजप पदाधिकार्‍यांना वाटते. दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे बहुतेक आमदार सध्या अविश्वासू बनले आहेत. ते पक्षाचे काम स्वत: पुढे नेण्यासही उत्सुक नाहीत. लोकसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाची साधी बैठकदेखील झाली नाही. पराभवाची कारणमिमांसा करण्याचीही गरज आमदारांना वाटत नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस हेच गोव्यात पक्षाचे काम वाढवतील व पक्ष बळकट करतील, असा विश्वास अजूनही पक्षाचे केंद्रीय निरीक्षक दिग्विजय सिंग यांना वाटतो. काँग्रेसचे एकही आमदार यापूर्वीच मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी शत्रूत्व घेण्याचे टाळत होते. एकट्या आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा यास अपवाद होता. आता तर राज्य सरकार खूपच भक्कम बनले असल्याने काँग्रेसचे कुणीच आमदार सार्वजनिक प्रश्नाच्या अनुषंगाने सरकारविरुद्ध आवाज उठवणार नाहीत, याची कल्पना दिग्विजय सिंग यांनाही आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. जॉन फर्नांडिस यांना लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या काही आमदारांनी सहकार्य केले नाही याची कल्पनाही सिंग यांना गोव्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांकडून आली आहे. जॉन दिल्लीत असून ते बुधवारी पुन्हा दिग्विजय सिंग यांना भेटणार आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी पक्षाने गोव्यात जो निधी पाठवला होता, त्या निधीच्या व्यवहारांमध्ये स्वत: फर्नांडिस यांनी कुठेच हस्तक्षेप केला नाही. आपल्यावर भविष्यात कोणताच आरोप यायला नको म्हणून ते स्वत: अशा व्यवहारांपासून दूर राहिले. काँग्रेसचे यापूर्वीचे काही प्रदेशाध्यक्ष मात्र पक्षाच्या आर्थिक व्यवहारांमध्येच जास्त रस घेत होते. काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचार कामावेळी पक्षनिधी योग्य प्रकारे वापरला काय, याचीही चौकशी यापुढील दिवसांत अखिल भारतीय काँग्रेसच्या स्तरावरून होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. (खास प्रतिनिधी)