शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील भाजपा सरकारही आता दबावमुक्त

By admin | Updated: May 21, 2014 02:01 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अतिशय भक्कम असे सरकार चालविण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता लाभली आहे.

पणजी : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भक्कम असे सरकार अधिकारावर येत असल्यामुळे गोवा सरकारही आता दबावमुक्त झाले आहे. आता कोणत्याच प्रश्नावरून सरकारवर विरोधकांचाही दबाव येणार नाही आणि सत्ताधारी आघाडीचेही घटक सरकारला कोणत्याच विषयाबाबत आव्हान देऊ शकणार नाहीत. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अतिशय भक्कम असे सरकार चालविण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता लाभली आहे. काँग्रेसचे काही आमदार पर्रीकर सरकारबाबत आता सहानुभूती दाखवत असले तरी, सरकारला या आमदारांची गरजच नाही, अशी स्थिती आली आहे. आमदार माविन गुदिन्हो किंवा बाबूश मोन्सेरात यांच्या पाठिंब्याची किंवा सहानुभूतीची आता भाजपला गरज राहिलेली नाही. नुवेचे आमदार मिकी पाशेको यांना यापूर्वी मंत्रिपद देण्याची ग्वाही भाजपने दिली होती, असे सांगितले जाते; पण आता सरकार एवढे भक्कम बनले आहे की पाशेको यांना मंत्रिमंडळात घेण्याचा सरकार विचारही करणार नाही, असे काही भाजप पदाधिकार्‍यांना वाटते. दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे बहुतेक आमदार सध्या अविश्वासू बनले आहेत. ते पक्षाचे काम स्वत: पुढे नेण्यासही उत्सुक नाहीत. लोकसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाची साधी बैठकदेखील झाली नाही. पराभवाची कारणमिमांसा करण्याचीही गरज आमदारांना वाटत नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस हेच गोव्यात पक्षाचे काम वाढवतील व पक्ष बळकट करतील, असा विश्वास अजूनही पक्षाचे केंद्रीय निरीक्षक दिग्विजय सिंग यांना वाटतो. काँग्रेसचे एकही आमदार यापूर्वीच मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी शत्रूत्व घेण्याचे टाळत होते. एकट्या आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा यास अपवाद होता. आता तर राज्य सरकार खूपच भक्कम बनले असल्याने काँग्रेसचे कुणीच आमदार सार्वजनिक प्रश्नाच्या अनुषंगाने सरकारविरुद्ध आवाज उठवणार नाहीत, याची कल्पना दिग्विजय सिंग यांनाही आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. जॉन फर्नांडिस यांना लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या काही आमदारांनी सहकार्य केले नाही याची कल्पनाही सिंग यांना गोव्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांकडून आली आहे. जॉन दिल्लीत असून ते बुधवारी पुन्हा दिग्विजय सिंग यांना भेटणार आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी पक्षाने गोव्यात जो निधी पाठवला होता, त्या निधीच्या व्यवहारांमध्ये स्वत: फर्नांडिस यांनी कुठेच हस्तक्षेप केला नाही. आपल्यावर भविष्यात कोणताच आरोप यायला नको म्हणून ते स्वत: अशा व्यवहारांपासून दूर राहिले. काँग्रेसचे यापूर्वीचे काही प्रदेशाध्यक्ष मात्र पक्षाच्या आर्थिक व्यवहारांमध्येच जास्त रस घेत होते. काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचार कामावेळी पक्षनिधी योग्य प्रकारे वापरला काय, याचीही चौकशी यापुढील दिवसांत अखिल भारतीय काँग्रेसच्या स्तरावरून होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. (खास प्रतिनिधी)