शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

केजरीवालांना मोठा दिलासा; सुनावणीस उपस्थित राहण्याचा समन्स हायकोर्टने केला रद्द

By वासुदेव.पागी | Updated: February 6, 2024 14:57 IST

२०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंग प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर रहावे लागणार नाही.

पणजीः निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फार मोठा दिलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्याचा म्हापसा न्यायालयाचा समन्स खंडपीठाने रद्दबातल ठरविला आहे.

२०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंग प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर रहावे लागणार नाही. कारण सुनावणीसाठी हजर राहण्याच्या म्हापसा न्यायालयाच्या समन्सला केजरीवाल यांनी खंडपीठात आव्हान दिले होते. या प्रकरणात खंडपीठात सुनावणी होऊन खंडपीठाने निवाडाही सुनावला आहे. केजरीवाल यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश दिलेला म्हापसा न्यायालयाचा निवाडा खंडपीठाने रद्दबातल ठरविला आहे. केजरीवाल यांना यामुळे फार मोठा दिलासा मिळाला आहे. कारण वारंवार त्यांना न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले जात होते.

२०१७ साली म्हापसा येथे झालेल्या आम आदमी पार्टीच्या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी काही आक्षेपार्ह विधाने केल्याने आचार संहिता भंग झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाने म्हापसा पोलीस स्थानकात नोंदविली होती. या प्रकरणात म्हापसा पोलिसांनी केजरीवाल यांच्या विरुद्ध खटला चालविला होता. त्यासाठीच त्यांना म्हापसा न्यायालयात उपस्थित राहण्याचे समन्स बजावले जात होते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालgoaगोवा