शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

भर वस्तीतून राष्ट्रीय महामार्गावरील काम करण्यास भोम ग्रामस्थांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2023 16:38 IST

सरपंचाच्या कृतीचा केला निषेध, भोमची वाहतूक कोंडी सोडवायची असल्यास बायपास हा पर्याय आहे. जो सरकारला आम्ही वेळोवेळी सुचवला आहे.

अजय बुवा 

फोंडा - वाहतुकीची कोंडी होते म्हणून सरकारने भोम येथून नव्या रस्त्याची व उड्डाणपूल चे सोपस्कार करण्यासाठी हालचाली केल्या होत्या परंतु सुरुवातीपासूनच ग्रामस्थांनी याला विरोध दर्शविला आहे. गुरुवारी या संदर्भात सरपंचांनी पुढील सोपस्कार केल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्यांच्या सदर कृतीचा निषेध केला.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नवीन रस्त्या संबधीत जे काही आराखडे समोर येत आहेत ते दिशाभूल करणारे आहेत. मुळात आराखडा 2014 चा असताना जमीन अधिसूचित करण्याची प्रक्रिया मात्र आठ वर्षानंतर होत आहे.सदर  प्रकरण हे गोंधळात टाकणारे आहे .लोकांनी सातत्याने या संदर्भात विरोध केला आहे व तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे आपले आक्षेप नोंदवलेले आहेत. तरीसुद्धा लोकांनी नाकारलेले आराखडे घेऊन प्रशासन पुढे येत आहे. ते आम्ही कदापी मान्य करणार नाही. सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी यासंदर्भात व्यवस्थित अभ्यास करायला हवा होता. परिणामी आमच्था लोकांची नाराजी  त्यांनी सुध्दा ओढवून घेतलेली आहे.

भोमची वाहतूक कोंडी सोडवायची असल्यास बायपास हा पर्याय आहे. जो सरकारला आम्ही वेळोवेळी सुचवला आहे. यावेळी एक गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार एका बांधकाम व्यवसायिकाने येथे प्लॉट्स निर्माण केले आहेत. सदर प्लॉट्स च्या ठिकाणी जाण्यास रस्ता नाही. सदरचे प्लॉट्स हे बेकायदेशीर आहेत .त्या प्लॉटच्या ठिकाणी जाण्याकरता रस्ता नाही तेव्हा भर वस्तीतील लोकांना तिथून हाकलून लावून नवीन रस्त्याच्या नावाखाली त्या बांधकाम व्यावसायिकाचे हित जपण्यासाठी सरकार काम करत आहे. ह्या संदर्भात आम्ही  न्यायालयात दाद मागणार असून कशाही परिस्थितीत हा रस्ता भर वस्तीतून करू दिला जाणार नाही.