शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खनिज उत्पादन मर्यादेच्या फेरआढाव्यासाठी प्रयत्न!

By admin | Updated: March 24, 2015 01:16 IST

पणजी : राज्यातील खनिज व्यवसाय लवकरच नव्याने सुरू होणार आहे. वार्षिक खनिज उत्पादन मर्यादेचा सर्वोच्च न्यायालयाने

पणजी : राज्यातील खनिज व्यवसाय लवकरच नव्याने सुरू होणार आहे. वार्षिक खनिज उत्पादन मर्यादेचा सर्वोच्च न्यायालयाने फेरआढावा घ्यावा म्हणून राज्य सरकार सर्व ते प्रयत्न करत आहे, असे राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सोमवारी विधानसभा अधिवेशनात केलेल्या अभिभाषणावेळी सांगितले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सोमवारी आरंभ झाला. सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील खाणींसाठी वार्षिक २० दशलक्ष टन खनिज उत्पादन मर्यादा निश्चित केली आहे. मर्यादेचे हे प्रमाण राज्यपालांच्या अभिभाषणात नमूद करण्यात आलेले नाही. तथापि, त्या संदर्भाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राज्यपाल म्हणाल्या की, वार्षिक खनिज उत्पादन मर्यादेचा फेरआढावा घेतला जावा, असा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार सामाजिक व पर्यावरणीय घटक नजरेसमोर ठेवून खनिज व्यवसायाचे नियमन करील. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या सूचनेनुसार सरकारने पाच टप्प्यांत खनिज मालाचा यापूर्वी ई-लिलाव केला आहे. राज्यपालांनी नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणावर प्रकाश टाकला. नवे आयटी धोरण संगणकीकृत प्रशासनाला अधिक प्राधान्य देईल. ‘आयटी’विषयक सेवांचे प्रमाण वाढवून रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल. झिरो टॉलरन्स टू करप्शन हे सरकारचे ब्रीद आहे. त्यामुळेच ई-निविदा प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स व अन्य पद्धतीने शासकीय कामात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे, असे सिन्हा म्हणाल्या. सरकारने गोवा गुंतवणूक धोरण आणले आहे. येत्या पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन ५० हजार रोजगार संधी निर्माण करण्याचे लक्ष्य सरकारने समोर ठेवले आहे. ज्ञानाधिष्ठित उद्योग, फार्मास्युटिकल्स, बायो-टेक्नॉलॉजी, पर्यटन, हवाई, संरक्षणविषयक, माहिती तंत्रज्ञान, कृषी आधारित, अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य दिले जाईल. सर्व शासकीय योजना आधार कार्ड क्रमांकाशी जोडल्या जातील. कृषी विकास योजनेंतर्गत २५ गावांची निवड करण्यात आली आहे. ‘कामधेनू’ योजनेंतर्गत दूध उत्पादन वाढावे म्हणून नियमितपणे गुरांचा मेळावा आयोजित केला जातो, असे राज्यपालांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)