शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

हत्तीच्या हल्ल्यात गुराखी जागीच ठार

By admin | Updated: December 26, 2014 02:09 IST

कारवारातील मुंडगोड तालुक्यातील घटना

कारवार : जंगलात गुरे राखण्यास गेलेल्या गुराख्याला जंगली हत्तीने तुडवून ठार मारल्याची घटना मुंडगोड तालुक्यात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सोनू विठू कोकरे (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोनू हे पत्नीसह म्हैशी व वासरे घेऊन चरवण्यासाठी अंदलगी जंगलात गेले होते. दुपारी ३ च्या सुमारास आपल्याला घरी पाठवून पती जंगलात मागेच राहिले, असे त्याच्या पत्नीने सांगितले. सायंकाळ झाली तरी सोनू परतले नाहीत म्हणून घरच्यांनी व गावच्या लोकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण ते काही सापडले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोधाशोध सुरू केल्यावेळी सोनू यांचा मृतदेह सापडला. सोनू यांच्या पाठीवर हत्तीने पाय दिल्याचे दिसत होते व आसपास हत्तीच्या पायांचे ठसे उठले होते. काठी, बॅटरी व त्यांच्या चप्पला इतरस्त्र पडलेल्या आढळल्या. घटनेची माहिती समजताच वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना माहिती दिली. ए.सी.एफ. बी. आर. रमेश, आर.एफ.ओ. विरेश कब्बीन, तहसीलदार अशोक गुराणी यांनी घटनास्थळी भेट दिली. वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, २४-२५ हत्तींचा कळप कातूर-मुंडगोड भागात फिरत असून आता त्यांचे दोन कळप झाले आहेत. दरम्यान, ए.सी.एफ. रमेश यांच्या म्हणण्याप्रमाणे, पुण्याच्या वाईल्ड लाईफ रिसर्च अ‍ॅण्ड कंझर्वेशन सोसायटीतर्फे गावकऱ्यांना जंगली हत्तीपासून पिकांचे कसे संरक्षण करावे, याचे प्रशिक्षण दिले जात असे. शेतकऱ्याने एकट्या-दुकट्याने पीक रक्षणासाठी रात्री जाऊ नये. किमान तिघा-चौघांनी एकत्र असावे. बरोबर चिटबील, छोटे दगड, फटाके व टॉर्च बाळगावी. प्रसंगी हत्तींवर दगड फेकावे. फटाक्यांचा अवाज करावा, अशी सूचना दिली. घराकडे परतताना पिकाच्या गंजीच्या चारी बाजूला मिरचीची तिखट पूड पसरावी. त्या वासाला हत्ती जवळ येत नाहीत, असे ते म्हणाले. मृत सोनू यांच्या घरच्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे सर्व प्रयत्न करू, असे त्यांनी या वेळी आश्वासन दिले. गेल्या आठ-दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. कातूर ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील नंदीपूर येथे १८ डिसेंबरला हनुमंत वड्डर या शेतकऱ्याचा हत्तींनी बळी घेतला होता. जंगली हत्तींपासून आपले व पिकाचे रक्षण करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)