शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

कृत्रिम मत्स्यदुष्काळ संपला

By admin | Updated: May 15, 2015 01:20 IST

मडगाव : मालवण व गोव्यातील मच्छीमारांमध्ये चार दिवस चाललेल्या वादावर गुरुवारी (दि. १४) मच्छीमारांच्या समन्वय बैठकीत अखेर तोडगा

मडगाव : मालवण व गोव्यातील मच्छीमारांमध्ये चार दिवस चाललेल्या वादावर गुरुवारी (दि. १४) मच्छीमारांच्या समन्वय बैठकीत अखेर तोडगा काढण्यात आला. मच्छीमार मंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी या प्रकरणी मध्यस्थी केली. समन्वय समितीच्या बैठकीत मासळी व्यवहार सुरळीत होण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेण्याचे ठरल्याने मासळीच्या कृत्रिम दुष्काळाच्या वादावर पडदा पडला.दुपारी दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात फुर्तादो, आमदार बेंजामिन सिल्वा, दोन्ही भागांतील मच्छीमारांचे प्रतिनिधी व वरिष्ठ पोलिसांच्या उपस्थितीत समन्वय समितीची बैठक झाली. गोव्याच्या मच्छीमारांनी महाराष्ट्रातील समुद्रात १२ नॉटिकल माईल्सच्या आत येऊन मासेमारी करू नये, जर अशी एखादी बोट आढळल्यास ती स्थानिक प्रशासनाच्या ताब्यात दिली जाईल. त्यानंतर बोटमालकांना बोलावून घेण्यात येईल. जी बोट पकडण्यात येईल त्या बोटीच्या मालकाला गोव्यातील बोटमालक संघटनेने आपसात निर्णय घेऊन दंड आकारावा, अशी मागणी महाराष्ट्रातील मच्छीमारांनी केली. वेळ्ळीचे आमदार बेंजामीन सिल्वा, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक श्ोखर प्रभुदेसाई पोलीस उपअधीक्षक मोहन नाईक, मालवणचे पोलीस उपअधीक्षक विजय खरात, पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले, पोलीस उपनिरीक्षक मनोहर पाटील, मच्छीमार खात्याचे परवाना अधिकारी सुरेंद्र गावकर, साहाय्यक व्यवस्थापक अधिकारी रवींद्र मालवणकर, वेंगुर्ला बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, भाजपा मालवण तालुका अध्यक्ष विष्णू मोंडकर, रवीकिरण तोरस्कर, महेश सावजी, रोझरी मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जॉन नोरोन्हा, दिलीप घारे उपस्थित होते. तसेच बेतूल, वास्को व पणजी येथील मच्छीमार संघटनांचे व मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष उपस्थित होते. मालवणच्या मच्छीमारांच्या म्हणण्याप्रमाणे गोव्याच्या मच्छीमार बोटी मालवण येथे समुद्रात महाराष्ट्र सरकारने मच्छीमारांना ठरवून दिलेल्या क्षेत्रात येऊन मासेमारी करीत आहेत. मालवणमध्ये सुमारे २१ हजार मच्छीमारांची कुटुंबे याच व्यवसायावर जगत आहेत. पारंपरिक मच्छीमारांसाठी १२ नॉटिकल माईल्स राखून ठेवली आहे. पर्ससिन नेट बोटी १२ नॉटिकल्स माईल्सच्या बाहेर जाऊन मासेमारी करतात. गोव्यात व कर्नाटकात मासळी संपल्याने गोवा व कर्नाटकातील बोटी महाराष्ट्रात येऊन मासेमारी करीत असल्यामुळे सिंधुदुर्गातील मच्छीमारांना मासळी मिळत नाही. अशा गैरप्रकारांमुळे मालवण व परिसरातील मच्छीमारांना त्रास सहन करावे लागत असल्याचा आरोप या बैठकीत महाराष्ट्रातील मच्छीमारांनी केला.गोव्यातील बोटींनी पारंपरिक मच्छीमारांचे क्षेत्र आबाधित ठेवून कुठेही मासेमारी करावी, असे मालवण येथील मच्छीमारांनी सूचवले. महाराष्ट्रात ४८ हजार मॅट्रीक टन मासळीची कपात झाल्याचा दावा महाराष्ट्रातील मच्छीमारांनी केला. याला महाराष्ट्रातील मच्छीमार खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. मालवणला जी घटना घडली ती अमानवीय होती. गोव्यातील बोटीवर हल्ला करण्याचा अधिकार मालवणच्या मच्छीमारांना नव्हता. शिवाय खलाशांना मारहाण करून बोटीची नासधूस करणे हे गैर असल्याचे फुर्तादो यांनी या वेळी सांगितले. समन्वय बैठकीबद्दल समाधानी असल्याचे मालवण भाजपाचे तालुका अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी सांगितले. रविकिरण तोरस्कर यांनी या वेळी मालवण व गोव्यातील मच्छीमारांच्या झालेल्या भांडणामुळे यापुढे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही समन्वय बैठक होती, असे सांगितले. मच्छीमारांमध्ये सौहर्दाच्या वातावरणासाठी ही बैठक यशस्वी ठरल्याचे मत मच्छीमारांच्या प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केले. अशा प्रकारच्या घटनाची पुनरावृत्ती होऊ नये याची महाराष्ट्र व गोव्यातील बोटमालकांनी खबरदारी घ्यावी व अशा घटना घडल्यास महाराष्ट्राच्या किनारी पोलिसांच्या १0९३ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्राचे पोलीस उपाधीक्षक विजय खरात यांनी केले.