शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

कृत्रिम मत्स्यदुष्काळ संपला

By admin | Updated: May 15, 2015 01:20 IST

मडगाव : मालवण व गोव्यातील मच्छीमारांमध्ये चार दिवस चाललेल्या वादावर गुरुवारी (दि. १४) मच्छीमारांच्या समन्वय बैठकीत अखेर तोडगा

मडगाव : मालवण व गोव्यातील मच्छीमारांमध्ये चार दिवस चाललेल्या वादावर गुरुवारी (दि. १४) मच्छीमारांच्या समन्वय बैठकीत अखेर तोडगा काढण्यात आला. मच्छीमार मंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी या प्रकरणी मध्यस्थी केली. समन्वय समितीच्या बैठकीत मासळी व्यवहार सुरळीत होण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेण्याचे ठरल्याने मासळीच्या कृत्रिम दुष्काळाच्या वादावर पडदा पडला.दुपारी दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात फुर्तादो, आमदार बेंजामिन सिल्वा, दोन्ही भागांतील मच्छीमारांचे प्रतिनिधी व वरिष्ठ पोलिसांच्या उपस्थितीत समन्वय समितीची बैठक झाली. गोव्याच्या मच्छीमारांनी महाराष्ट्रातील समुद्रात १२ नॉटिकल माईल्सच्या आत येऊन मासेमारी करू नये, जर अशी एखादी बोट आढळल्यास ती स्थानिक प्रशासनाच्या ताब्यात दिली जाईल. त्यानंतर बोटमालकांना बोलावून घेण्यात येईल. जी बोट पकडण्यात येईल त्या बोटीच्या मालकाला गोव्यातील बोटमालक संघटनेने आपसात निर्णय घेऊन दंड आकारावा, अशी मागणी महाराष्ट्रातील मच्छीमारांनी केली. वेळ्ळीचे आमदार बेंजामीन सिल्वा, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक श्ोखर प्रभुदेसाई पोलीस उपअधीक्षक मोहन नाईक, मालवणचे पोलीस उपअधीक्षक विजय खरात, पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले, पोलीस उपनिरीक्षक मनोहर पाटील, मच्छीमार खात्याचे परवाना अधिकारी सुरेंद्र गावकर, साहाय्यक व्यवस्थापक अधिकारी रवींद्र मालवणकर, वेंगुर्ला बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, भाजपा मालवण तालुका अध्यक्ष विष्णू मोंडकर, रवीकिरण तोरस्कर, महेश सावजी, रोझरी मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जॉन नोरोन्हा, दिलीप घारे उपस्थित होते. तसेच बेतूल, वास्को व पणजी येथील मच्छीमार संघटनांचे व मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष उपस्थित होते. मालवणच्या मच्छीमारांच्या म्हणण्याप्रमाणे गोव्याच्या मच्छीमार बोटी मालवण येथे समुद्रात महाराष्ट्र सरकारने मच्छीमारांना ठरवून दिलेल्या क्षेत्रात येऊन मासेमारी करीत आहेत. मालवणमध्ये सुमारे २१ हजार मच्छीमारांची कुटुंबे याच व्यवसायावर जगत आहेत. पारंपरिक मच्छीमारांसाठी १२ नॉटिकल माईल्स राखून ठेवली आहे. पर्ससिन नेट बोटी १२ नॉटिकल्स माईल्सच्या बाहेर जाऊन मासेमारी करतात. गोव्यात व कर्नाटकात मासळी संपल्याने गोवा व कर्नाटकातील बोटी महाराष्ट्रात येऊन मासेमारी करीत असल्यामुळे सिंधुदुर्गातील मच्छीमारांना मासळी मिळत नाही. अशा गैरप्रकारांमुळे मालवण व परिसरातील मच्छीमारांना त्रास सहन करावे लागत असल्याचा आरोप या बैठकीत महाराष्ट्रातील मच्छीमारांनी केला.गोव्यातील बोटींनी पारंपरिक मच्छीमारांचे क्षेत्र आबाधित ठेवून कुठेही मासेमारी करावी, असे मालवण येथील मच्छीमारांनी सूचवले. महाराष्ट्रात ४८ हजार मॅट्रीक टन मासळीची कपात झाल्याचा दावा महाराष्ट्रातील मच्छीमारांनी केला. याला महाराष्ट्रातील मच्छीमार खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. मालवणला जी घटना घडली ती अमानवीय होती. गोव्यातील बोटीवर हल्ला करण्याचा अधिकार मालवणच्या मच्छीमारांना नव्हता. शिवाय खलाशांना मारहाण करून बोटीची नासधूस करणे हे गैर असल्याचे फुर्तादो यांनी या वेळी सांगितले. समन्वय बैठकीबद्दल समाधानी असल्याचे मालवण भाजपाचे तालुका अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी सांगितले. रविकिरण तोरस्कर यांनी या वेळी मालवण व गोव्यातील मच्छीमारांच्या झालेल्या भांडणामुळे यापुढे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही समन्वय बैठक होती, असे सांगितले. मच्छीमारांमध्ये सौहर्दाच्या वातावरणासाठी ही बैठक यशस्वी ठरल्याचे मत मच्छीमारांच्या प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केले. अशा प्रकारच्या घटनाची पुनरावृत्ती होऊ नये याची महाराष्ट्र व गोव्यातील बोटमालकांनी खबरदारी घ्यावी व अशा घटना घडल्यास महाराष्ट्राच्या किनारी पोलिसांच्या १0९३ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्राचे पोलीस उपाधीक्षक विजय खरात यांनी केले.