शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

कृत्रिम मत्स्यदुष्काळ संपला

By admin | Updated: May 15, 2015 01:20 IST

मडगाव : मालवण व गोव्यातील मच्छीमारांमध्ये चार दिवस चाललेल्या वादावर गुरुवारी (दि. १४) मच्छीमारांच्या समन्वय बैठकीत अखेर तोडगा

मडगाव : मालवण व गोव्यातील मच्छीमारांमध्ये चार दिवस चाललेल्या वादावर गुरुवारी (दि. १४) मच्छीमारांच्या समन्वय बैठकीत अखेर तोडगा काढण्यात आला. मच्छीमार मंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी या प्रकरणी मध्यस्थी केली. समन्वय समितीच्या बैठकीत मासळी व्यवहार सुरळीत होण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेण्याचे ठरल्याने मासळीच्या कृत्रिम दुष्काळाच्या वादावर पडदा पडला.दुपारी दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात फुर्तादो, आमदार बेंजामिन सिल्वा, दोन्ही भागांतील मच्छीमारांचे प्रतिनिधी व वरिष्ठ पोलिसांच्या उपस्थितीत समन्वय समितीची बैठक झाली. गोव्याच्या मच्छीमारांनी महाराष्ट्रातील समुद्रात १२ नॉटिकल माईल्सच्या आत येऊन मासेमारी करू नये, जर अशी एखादी बोट आढळल्यास ती स्थानिक प्रशासनाच्या ताब्यात दिली जाईल. त्यानंतर बोटमालकांना बोलावून घेण्यात येईल. जी बोट पकडण्यात येईल त्या बोटीच्या मालकाला गोव्यातील बोटमालक संघटनेने आपसात निर्णय घेऊन दंड आकारावा, अशी मागणी महाराष्ट्रातील मच्छीमारांनी केली. वेळ्ळीचे आमदार बेंजामीन सिल्वा, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक श्ोखर प्रभुदेसाई पोलीस उपअधीक्षक मोहन नाईक, मालवणचे पोलीस उपअधीक्षक विजय खरात, पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले, पोलीस उपनिरीक्षक मनोहर पाटील, मच्छीमार खात्याचे परवाना अधिकारी सुरेंद्र गावकर, साहाय्यक व्यवस्थापक अधिकारी रवींद्र मालवणकर, वेंगुर्ला बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, भाजपा मालवण तालुका अध्यक्ष विष्णू मोंडकर, रवीकिरण तोरस्कर, महेश सावजी, रोझरी मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जॉन नोरोन्हा, दिलीप घारे उपस्थित होते. तसेच बेतूल, वास्को व पणजी येथील मच्छीमार संघटनांचे व मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष उपस्थित होते. मालवणच्या मच्छीमारांच्या म्हणण्याप्रमाणे गोव्याच्या मच्छीमार बोटी मालवण येथे समुद्रात महाराष्ट्र सरकारने मच्छीमारांना ठरवून दिलेल्या क्षेत्रात येऊन मासेमारी करीत आहेत. मालवणमध्ये सुमारे २१ हजार मच्छीमारांची कुटुंबे याच व्यवसायावर जगत आहेत. पारंपरिक मच्छीमारांसाठी १२ नॉटिकल माईल्स राखून ठेवली आहे. पर्ससिन नेट बोटी १२ नॉटिकल्स माईल्सच्या बाहेर जाऊन मासेमारी करतात. गोव्यात व कर्नाटकात मासळी संपल्याने गोवा व कर्नाटकातील बोटी महाराष्ट्रात येऊन मासेमारी करीत असल्यामुळे सिंधुदुर्गातील मच्छीमारांना मासळी मिळत नाही. अशा गैरप्रकारांमुळे मालवण व परिसरातील मच्छीमारांना त्रास सहन करावे लागत असल्याचा आरोप या बैठकीत महाराष्ट्रातील मच्छीमारांनी केला.गोव्यातील बोटींनी पारंपरिक मच्छीमारांचे क्षेत्र आबाधित ठेवून कुठेही मासेमारी करावी, असे मालवण येथील मच्छीमारांनी सूचवले. महाराष्ट्रात ४८ हजार मॅट्रीक टन मासळीची कपात झाल्याचा दावा महाराष्ट्रातील मच्छीमारांनी केला. याला महाराष्ट्रातील मच्छीमार खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. मालवणला जी घटना घडली ती अमानवीय होती. गोव्यातील बोटीवर हल्ला करण्याचा अधिकार मालवणच्या मच्छीमारांना नव्हता. शिवाय खलाशांना मारहाण करून बोटीची नासधूस करणे हे गैर असल्याचे फुर्तादो यांनी या वेळी सांगितले. समन्वय बैठकीबद्दल समाधानी असल्याचे मालवण भाजपाचे तालुका अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी सांगितले. रविकिरण तोरस्कर यांनी या वेळी मालवण व गोव्यातील मच्छीमारांच्या झालेल्या भांडणामुळे यापुढे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही समन्वय बैठक होती, असे सांगितले. मच्छीमारांमध्ये सौहर्दाच्या वातावरणासाठी ही बैठक यशस्वी ठरल्याचे मत मच्छीमारांच्या प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केले. अशा प्रकारच्या घटनाची पुनरावृत्ती होऊ नये याची महाराष्ट्र व गोव्यातील बोटमालकांनी खबरदारी घ्यावी व अशा घटना घडल्यास महाराष्ट्राच्या किनारी पोलिसांच्या १0९३ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्राचे पोलीस उपाधीक्षक विजय खरात यांनी केले.