शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
4
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
5
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
6
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
7
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
8
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
9
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
10
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
11
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
13
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
14
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
15
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
16
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
17
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
18
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
19
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
20
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड

कृत्रिम मत्स्यदुष्काळ संपला

By admin | Updated: May 15, 2015 01:20 IST

मडगाव : मालवण व गोव्यातील मच्छीमारांमध्ये चार दिवस चाललेल्या वादावर गुरुवारी (दि. १४) मच्छीमारांच्या समन्वय बैठकीत अखेर तोडगा

मडगाव : मालवण व गोव्यातील मच्छीमारांमध्ये चार दिवस चाललेल्या वादावर गुरुवारी (दि. १४) मच्छीमारांच्या समन्वय बैठकीत अखेर तोडगा काढण्यात आला. मच्छीमार मंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी या प्रकरणी मध्यस्थी केली. समन्वय समितीच्या बैठकीत मासळी व्यवहार सुरळीत होण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेण्याचे ठरल्याने मासळीच्या कृत्रिम दुष्काळाच्या वादावर पडदा पडला.दुपारी दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात फुर्तादो, आमदार बेंजामिन सिल्वा, दोन्ही भागांतील मच्छीमारांचे प्रतिनिधी व वरिष्ठ पोलिसांच्या उपस्थितीत समन्वय समितीची बैठक झाली. गोव्याच्या मच्छीमारांनी महाराष्ट्रातील समुद्रात १२ नॉटिकल माईल्सच्या आत येऊन मासेमारी करू नये, जर अशी एखादी बोट आढळल्यास ती स्थानिक प्रशासनाच्या ताब्यात दिली जाईल. त्यानंतर बोटमालकांना बोलावून घेण्यात येईल. जी बोट पकडण्यात येईल त्या बोटीच्या मालकाला गोव्यातील बोटमालक संघटनेने आपसात निर्णय घेऊन दंड आकारावा, अशी मागणी महाराष्ट्रातील मच्छीमारांनी केली. वेळ्ळीचे आमदार बेंजामीन सिल्वा, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक श्ोखर प्रभुदेसाई पोलीस उपअधीक्षक मोहन नाईक, मालवणचे पोलीस उपअधीक्षक विजय खरात, पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले, पोलीस उपनिरीक्षक मनोहर पाटील, मच्छीमार खात्याचे परवाना अधिकारी सुरेंद्र गावकर, साहाय्यक व्यवस्थापक अधिकारी रवींद्र मालवणकर, वेंगुर्ला बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, भाजपा मालवण तालुका अध्यक्ष विष्णू मोंडकर, रवीकिरण तोरस्कर, महेश सावजी, रोझरी मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जॉन नोरोन्हा, दिलीप घारे उपस्थित होते. तसेच बेतूल, वास्को व पणजी येथील मच्छीमार संघटनांचे व मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष उपस्थित होते. मालवणच्या मच्छीमारांच्या म्हणण्याप्रमाणे गोव्याच्या मच्छीमार बोटी मालवण येथे समुद्रात महाराष्ट्र सरकारने मच्छीमारांना ठरवून दिलेल्या क्षेत्रात येऊन मासेमारी करीत आहेत. मालवणमध्ये सुमारे २१ हजार मच्छीमारांची कुटुंबे याच व्यवसायावर जगत आहेत. पारंपरिक मच्छीमारांसाठी १२ नॉटिकल माईल्स राखून ठेवली आहे. पर्ससिन नेट बोटी १२ नॉटिकल्स माईल्सच्या बाहेर जाऊन मासेमारी करतात. गोव्यात व कर्नाटकात मासळी संपल्याने गोवा व कर्नाटकातील बोटी महाराष्ट्रात येऊन मासेमारी करीत असल्यामुळे सिंधुदुर्गातील मच्छीमारांना मासळी मिळत नाही. अशा गैरप्रकारांमुळे मालवण व परिसरातील मच्छीमारांना त्रास सहन करावे लागत असल्याचा आरोप या बैठकीत महाराष्ट्रातील मच्छीमारांनी केला.गोव्यातील बोटींनी पारंपरिक मच्छीमारांचे क्षेत्र आबाधित ठेवून कुठेही मासेमारी करावी, असे मालवण येथील मच्छीमारांनी सूचवले. महाराष्ट्रात ४८ हजार मॅट्रीक टन मासळीची कपात झाल्याचा दावा महाराष्ट्रातील मच्छीमारांनी केला. याला महाराष्ट्रातील मच्छीमार खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. मालवणला जी घटना घडली ती अमानवीय होती. गोव्यातील बोटीवर हल्ला करण्याचा अधिकार मालवणच्या मच्छीमारांना नव्हता. शिवाय खलाशांना मारहाण करून बोटीची नासधूस करणे हे गैर असल्याचे फुर्तादो यांनी या वेळी सांगितले. समन्वय बैठकीबद्दल समाधानी असल्याचे मालवण भाजपाचे तालुका अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी सांगितले. रविकिरण तोरस्कर यांनी या वेळी मालवण व गोव्यातील मच्छीमारांच्या झालेल्या भांडणामुळे यापुढे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही समन्वय बैठक होती, असे सांगितले. मच्छीमारांमध्ये सौहर्दाच्या वातावरणासाठी ही बैठक यशस्वी ठरल्याचे मत मच्छीमारांच्या प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केले. अशा प्रकारच्या घटनाची पुनरावृत्ती होऊ नये याची महाराष्ट्र व गोव्यातील बोटमालकांनी खबरदारी घ्यावी व अशा घटना घडल्यास महाराष्ट्राच्या किनारी पोलिसांच्या १0९३ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्राचे पोलीस उपाधीक्षक विजय खरात यांनी केले.