शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

काश्मीरवरील सिनेमामुळे दिग्दर्शकाचा अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2024 08:35 IST

एका संवेदनशील विषयावर गोव्याचा दिग्दर्शक चांगला चित्रपट काढू शकला, दिग्दर्शकाचे कौशल्य व गुण देशाला कळून आले.

विश्वजित राणे, आरोग्यमंत्री

भारतातील एकसंधता आणि निष्ठा हा प्रत्येक भारतीयासाठी कायम महत्त्वाचा कमिटमेन्ट राहिला आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वच राज्यांतील लोक वावरत आहेत, तेच आमचे शक्तिस्थान आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील ३७० कलम मागे घेण्याचा निर्णय घेतला. देशाच्या चांगल्या भविष्याबाबत असलेल्या कमिटमेन्टचा एक महत्त्वाचा भाग म्हणून हे कलम मागे घेतले गेले.

जम्मू व काश्मीरला ३७० कलम विशेष दर्जा देत होते. पंतप्रधान मोदी यांनी कलम मागे घेण्याचा जो निर्णय घेतला, तो अतिशय योग्य होता हे नंतर एका न्यायालयीन निवाड्याद्वारेही स्पष्ट झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने मोदी सरकारचा तो निर्णय ११ डिसेंबर २०२३ रोजी उचलून (अपहेल्ड) धरला आहे. सर्व राज्ये समान आहेत. पूर्वीच्या जम्मू-काश्मीरपासून वेगळे करून लडाखचा भाग हा केंद्रशासित प्रदेश केला गेला. मोदी सरकारचा हा निर्णयही न्यायालयाने उचलून धरला आहे. काश्मीरला आता भारतीय घटनेतील सर्व तरतुदी लागू होत आहेत. 

३७० कलम मागे घेण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला देशभरातून मोठा पाठिंबा लाभला. गोव्याचे एक युवा दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी 'आर्टिकल ३७०' हा चित्रपट काढला आहे, ही गोष्ट गोव्यासाठी खूप आनंदाची व मोठ्या अभिमानाची आहे. सत्य घटनांवर आधारित हा सिनेमा आहे. आदित्य गोव्याच्या पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेल्या वाळपई विधानसभा मतदारसंघातील उसगाव या गावाचे नागरिक आहेत. जांभळे हे मराठी थिएटरशीही संलग्न आहेत आणि त्यांना२०१६ साली ६४ व्या राष्ट्रीय फिल्म अॅवर्डसमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी (गोल्डन लोट्स) राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. या दिग्दर्शकाचे खूप कौतुक करावे लागेल.

लोकांना योग्य ती माहिती मिळण्याबाबत ३७० कलम नावाचा हा चित्रपट उपयुक्त ठरेल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. हा सिनेमा पाहण्याची संधी गोव्यासह देशातील लोक घेत आहेत. पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणेच या चित्रपटाला देशभरातून खूप प्रसिद्धी, शाबासकी, पाठिंबा व कौतुक मिळत आहे. पणजीत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग नुकतेच करण्यात आले, त्यावेळी दिग्दर्शकाचाही सत्कार करण्यात आला, दीड हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही हा चित्रपट दाखविण्यात आला. 

यापुढे आणखी आठ हजार लोकांना हा सिनेमा दाखवला जाईल. आर्टिकल ३७० हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहावा अशा प्रकारे जागृती करण्याची विनंती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करण्यात आली आहे. हा सिनेमा काढण्याच्या धैर्याबाबत गुणी दिग्दर्शकाला प्रोत्साहनच द्यायला हवे. कलम ३७० हटविण्याचे महत्त्व नेमके काय आहे हे सिनेमातून दाखविले गेले आहे. या चित्रपटात यामी गौतम, प्रियामणी, अरुण गोविल या कलाकारांनी काम केले आहे. आर्मी अधिकारी, इंटेलिजन्स एजन्ट्स, राजकारणी व दहशतवादाला पाठिंबा देणारे घटक यांच्या भूमिका विविध कलाकारांनी साकारल्या आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासातील काश्मीरचे स्थान आणि काश्मीरशी निगडीत इतिहास, ३७० कलमाशी निगडीत घटना हे सगळे गोमंतकीयांनाही या चित्रपटातून अधिक चांगल्या प्रकारे कळेल.

चित्रपट हे अत्यंत प्रभावी असे माध्यम आहे. मला खूप आनंद होतोय की एका संवेदनशील विषयावर गोव्याचा दिग्दर्शक चांगला चित्रपट काढू शकला, दिग्दर्शकाचे कौशल्य व गुण देशाला कळून आले. या चित्रपटातून योग्य तो संदेश गेला आहे. सिनेमाच्या निर्मितीमागील सर्व कष्टाळू घटकांना शाबासकी द्यावीच लागेल.

 

टॅग्स :goaगोवाArticle 370कलम 370