शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
4
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
5
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
6
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टूक बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
7
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
8
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
9
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
10
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
11
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
12
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
13
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
14
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
15
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
16
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
17
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
18
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
19
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
20
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी

खंडणी मागून मिळवलेला पैसा लष्कराला नको, उद्धव यांचा राजना टोला

By admin | Updated: October 23, 2016 13:02 IST

'ऐ दिल है मुश्किल'च्या वादावरून उद्धव ठाकरे यांनी मनसेसह राज ठाकरेंना जोरदार चपराक लगावली आहे.

ऑनलाइन लोकमत पणजी, दि. 23 - 'ऐ दिल है मुश्किल'च्या वादावरून उद्धव ठाकरे यांनी मनसेसह राज ठाकरेंना जोरदार चपराक लगावली आहे. "खंडणी मागून मिळवलेला पैसा लष्कराला नको असला पाहिजे. लष्कराला स्वतःचा स्वाभिमान आहे", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

तर कालच पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या भूमिकेमूळे वादात सापडलेला "ऐ दिल है मुश्कील" चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अडथळ दूर झाला. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर काही अटींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या चित्रपटाच्या विरोधाची तलवार म्यान केली. चित्रपटाला नफा वा तोटा झाला, तरी निर्माते सैनिक कल्याण निधीमध्ये पाच कोटी रुपये देतील. पाक कलाकार असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी प्रत्येकी पाच कोटी रुपये सैनिक कल्याण निधीला द्यावेत, असे राज म्हणाले होते. या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना खंडणीचा पैसा नको म्हणत शरसंधान साधलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, "गोव्याकडे आजवर शिवसेनेचे दुर्लक्ष झाले. मात्र यापुढे चांगल्या माणसांना सोबत घेऊन आम्ही गोव्याचे राजकारण करणार आहोत". तसेच सुभाष वेलिंगकर यांच्यासोबत शिवसेना पुढील वाटचाल करणार असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वेलिंगकरांसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, "मराठी माझी माय आणि कोकणी माझी मावशी आहे. शिवसेना यापुढे केवळ निवडणुकांपूरतीच गोव्यात येणार नाही. आताही शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी मी येथे आलोय. येथील चांगल्या माणसांना सोबत घेऊन आम्ही गोव्यात पुढे जाणार आहोत. सुभाष वेलिंगकर यांच्याशी शनिवारी चर्चा झाली. शिवसेना त्यांच्यासोबत पुढील वाटचाल करणार आहे. मात्र जागावाटपावबाबत दिवाळीनंतर बैठकीत चर्चा होईल. यावेळी गोव्यातील सत्ताधारी भाजपालाही शिवसेना पक्षप्रमुखांनी फटकारले. समान विचारांची माणसे गोव्यात असल्याने त्यांच्या कामात आडकाठी नको म्हणून आम्ही गोव्यातील राजकारणापासून दूर होतो. पण गोव्यातील जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांबाबत नाराजी आहे. मातृभाषेचा प्रश्न हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. असे ठाकरे म्हणाले. तसेच महाराष्ट्राबाहेर शिवसेना आणि भाजपा नेहमीच स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आली आहे. गोव्यात शिवसेना-भाजपा युती नसल्याने युती तुटण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.