शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

आज चलो चांदर; कोळसा विरोधी आंदोलन अधिक तीव्र होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 14:12 IST

रात्री चांदर फटकासमोर निदर्शने

मडगाव: गोव्यात सुरू असलेले कोळसा विरोधी आंदोलन आज  रविवारी रात्रीपासून अधिक तीव्र होणार असून रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करण्यासाठी आज रात्री मोठ्या प्रमाणावर आंदोलक चांदर - गिर्दोळी फटकाकडे जमणार आहेत..या आंदोलनाला काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड  या दोन्ही पक्षांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

आज रात्री 10.30 वाजता दुपदरीकरणाला विरोध करणाऱ्या सर्व आंदोलकांनी चांदर येथे जमावे असे आवाहन गोयांत कोळसो नाका या संघटनेने केले आहे. गोवा अदानी, जिंदाल आणि वेदांता या कंपन्यांना आंदण देण्याचे राज्य सरकारचे कारस्थान मोडून काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

आज रात्री ख्रिस्ती लोकांचा ' ऑल सेन्ट्स डे' हा पवित्र दिवस असल्याने आज मध्यरात्री चांदरचे रेल्वे फाटक 

बंद ठेवून काम करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली परवानगी मागे घ्यावी यासाठी सरकारला जवळ असलेल्या चर्चिल आलेमाव आणि अन्य आमदारांनी केली होती. मात्र शुक्रवारी रात्री पर्यंत ही परवानगी मागे न घेतल्याने हे नियोजित आंदोलन होणार हे आता निश्चित झाले आहे. रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हे काम चालू ठेवण्याचे दक्षिण पश्चिम रेल्वेने ठरवीले आहे.

गोयांत कोळसो नाका या संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गोवा सरकार लोकांची गरजेची मागणी फेटाळून लावत असल्याबद्दल खेद व्यक्त करताना सरकारची ही मनमानी  लोक चालू देणार नाही असे म्हटले आहे. या संघटनेचे सह निमंत्रक अभिजित प्रभुदेसाई यांनी शनिवारी दक्षिण पश्चिम रेल्वेला एक निवेदन देऊन अजूनही या प्रकल्पाच्या अभयारण्य परिसरातील कामाला परवानगी मिळालेली नाही. जर ही परवानगी मिळाली नाही तर अन्य मार्गाचा विस्तार कुचकामाचा ठरणार असून करदात्यांचे फार मोठे नुकसान होईल याकडे लक्ष वेधून आजच्या विस्ताराचे काम तूर्त बंद ठेवावे अशी मागणी केली.

मागच्या रविवारी नेसाय येथे असेच काम करताना आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर तिथे जमा होऊन आपला विरोध दर्शविला होता.

दरम्यान आजच्या तसेच यापुढेही या आंदोलनाला गोवा फॉरवर्डचा सक्रीय पाठिंबा असेल असे या पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे गोव्यातील पर्यावरण बिघडून जाणार त्यामुळे अदानी, जिंदाल आणि वेदांता या तीन कंपन्यांना गोवा आंदण द्यायचे कारस्थान उधळून लावू असे ते म्हणाले.

कडक पोलीस बंदोबस्तआज रात्री होणाऱ्या या आंदोलनाच्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त आंदोलन स्थळावर ठेवण्यात येईल असे संकेत दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी सांगितले.  सरकारच्या कामात कोणताही व्यत्यय येणार नाही याची सर्व काळजी आम्ही घेऊ असे सिंग यांनी सांगितले