शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मगोपच्या सर्व समित्या विसर्जित: दीपक ढवळीकर, सरकार-सत्ताधारी आमदाराविरोधात बोलल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2024 13:16 IST

नरेश सावळ यांचा राजीनामा स्वीकारला, दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांना पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पक्षाच्या कार्यकारी समित्या, मतदारसंघ समित्या तसेच महिला, युवा व इतर आघाड्या विसर्जित करण्याचा निर्णय शनिवारी मगोपच्या मगोपच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचा ठरावही करण्यात आला. माजी आमदार नरेश सावळ यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला आहे, असे सांगण्यात आले.

समित्या विसर्जित केल्याने सर्व अधिकार आता केंद्रीय समितीकडे आले आहेत. केंद्रीय समितीचे सदस्य सोडून अन्य कोणीही सरकार किंवा सत्ताधारी आमदाराविरोधात बोलल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिला. ढवळीकर म्हणाले की, 'या समित्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला होता. तर काही समित्यांवरील पदाधिकारी पक्ष सोडून गेले आहेत. काही जण हयात नाहीत. त्यामुळे समित्या निष्क्रिय बनल्या होत्या. नरेश सावळ हेही कार्यकारी समितीवर होते. सध्या या समित्या विसर्जित केल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा त्या नव्याने गठीत केल्या जातील.'

नरेश सावळ यांनी राजीनामा सादर करताना पक्ष नेतृत्वावर जो हल्लाबोल केला होता, त्यावरही जोरदार चर्चा झाली, पत्रकारांनी विचारले असता ढवळीकर म्हणाले की, 'सावळ यांनी स्वार्थासाठी पक्ष सोडलेला आहे. ते गेले म्हणून पक्षाला काहीच फरक पडणार नाही. मगोपमध्ये आजवर अनेकजण आले आणि गेले. काहीजणांनी पक्ष विलीनही करण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष टिकून आहे.

दरम्यान, मांद्रे पोलिस स्थानकाच्या उ‌द्घाटनाच्या कार्यक्रमास डावलल्याने स्थानिक सरपंच अमित सावंत यानी केलेल्या आंदोलनास पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य राघोबा गावडे यांनी पाठिंबा दिल्याने व्यावर चर्चा याली मगोप भाजपसोबत सत्तेत असताना सरकारविरोधात चाललेल्या आंदोलनास गावडे यांनी पाठिंबा दिलाच कसा? असा प्रश्न उपस्थित झाला.

ढवळीकर यांना याबाबत 'लोकमत'ने विचारले असता माजी पंच म्हणून आपण पाठिंबा दिल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपले स्थानिक आमदाराशी आपले काहीच वैर नसल्याचेही त्यांनी सांगितल्याचे ढवळीकर म्हणाले. दरम्यान, पक्षाच्या महिला, युवा आघाड्याही लोकसभा निवडणुकीनंतर नव्याने गठीत केल्या जातील, असे ढवळीकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण