शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

सर्व प्रशासन ठप्प

By admin | Updated: March 13, 2015 00:55 IST

पणजी : राज्यातील पन्नास जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये सर्वच मंत्री व सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी तळ ठोकला आहे.

पणजी : राज्यातील पन्नास जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये सर्वच मंत्री व सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी तळ ठोकला आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारात खूप व्यस्त आहेत. राज्य प्रशासनावर याचा परिणाम झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. जि.पं. मतदारसंघांना सरकारी छावण्यांचेच रूप प्राप्त झाले आहे. मंत्र्यांना आता पर्वरी येथील मंत्रालयात येण्यासही वेळ नाही. मुख्यमंत्री पार्सेकर व अन्य एक-दोन मंत्री वगळता अन्य कुणी आता जास्त वेळ मंत्रालयात बसत नाहीत. लाल दिव्याच्या गाड्या आता जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्येच फिरत आहेत. प्रशासनावर गेले पंधरा दिवस मंत्रिमंडळाचे लक्ष नाही ही गोष्ट अनेक कामचुकार सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदारही सध्या जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्येच तळ ठोकून आहेत. काही मंत्री व आमदार फक्त रात्री झोपण्यापुरतेच घरी जातात. बाकी सगळा वेळ ते जिल्हा पंचायत मतदारसंघातच फिरत आहेत. विधानसभेचीच निवडणूक असल्याप्रमाणे मंत्री मतदारांच्या घरोघर जाऊन आपल्या उमेदवारांसाठी मते मागत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासन ठप्प झाल्याप्रमाणे स्थिती असून गेल्या महिन्याभरात मंत्रिमंडळ बैठकीत एकही धोरणात्मक किंवा मोठा असा निर्णय झालेला नाही. फक्त काही कंत्राटी पद्धतीवरील नियुक्त्या करणे व अधिकाऱ्यांना सेवावाढ देणे एवढेच निर्णय झाले आहेत; कारण मंत्र्यांना सध्या मोठे विषय घेऊन बसण्यासाठी वेळच नाही. पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, ग्रामीण विकास यंत्रणा मंत्री मिकी पाशेको, उद्योगमंत्री महादेव नाईक, पंचायतमंत्री दयानंद मांद्रेकर, वनमंत्री एलिना साल्ढाणा, सहकारमंत्री दीपक ढवळीकर, क्रीडामंत्री रमेश तवडकर, मजूरमंत्री आवेर्तान फुर्र्तादो यांनी तर स्वत:च्या मतदारसंघांमध्ये प्रचार कार्यासाठी झोकूनच दिले आहे. परुळेकर, महादेव नाईक, एलिना, फुर्र्तादो यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने जिल्हा पंचायत निवडणुकांचे निकाल खूप महत्त्वाचे आहेत. (खास प्रतिनिधी)