शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

गोव्यात इस्त्राईलच्या तंत्रज्ञानाने कृषी केंद्र - कृषी मंत्री विजय सरदेसाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 20:17 IST

इस्त्राईल देशातील ग्रीन २००० या कंपनीच्या सहयोगाने उच्च तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्कृष्ठ असे सेंद्रीय कृषी केंद्र कोडार येथील फार्मवर सुरु करण्यात येणार आहे.

म्हापसा : इस्त्राईल देशातील ग्रीन २००० या कंपनीच्या सहयोगाने उच्च तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्कृष्ठ असे सेंद्रीय कृषी केंद्र कोडार येथील फार्मवर सुरु करण्यात येणार आहे. पुढील वर्षी सुरु होणा-या या केंद्रातून सेंद्रीय पद्धतीने शेती कशा प्रकारे करावी याची प्रत्यक्षदर्शी माहिती शेतक-यांना तेथील फार्मवरुन देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी दिली. म्हापसा येथील धुळेर नजिक कृषी फार्मवर गोवा कृषी क्रांती प्रदर्शन व शेतक-यांसाठीच्या प्रशिक्षण सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी सरदेसाई बोलत होते. 

तीन दिवशीय प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, कृषी मंत्री विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर, उपसभापती मायकल लोबो, माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. दयानंद नार्वेकर, भारतीय कृषी संशोधन केंद्राचे संचालक एकनाथ चाकुडकर, कृषी संचालक माधव केळकर, आत्माचे प्रकल्प अधिकारी संजीव मयेकर, कृषी विभागीय अधिकारी रघुनाथ जोशी उपस्थित होते. कृषी तांत्रिक व्यवस्थापन एजन्सी (आत्मा), कृषी खाते, नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

कोडार फार्मवर सेंद्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी इस्त्राईल देशाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे सरदेसाई म्हणाले. त्यासाठी त्या कंपनी सोबत करार करण्यात आला असून या योजनेवर सुमारे ६ कोटी रुपये खर्च अपेक्षीत असल्याची माहिती यावेली दिली. भारत सरकारने सुद्धा संबंधीत कंपनीच्या सहकार्याने काम केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्राईल देशच्या दौ-यावर असताना त्यांनी पाहणी सुद्धा केली होती अशी माहिती सरदेसाई यांनी दिली. या कंपनीने राज्य सरकार समोर सादरीकरण सुद्धा केले होते. केलेले सादरीकरण आता प्रत्यक्षात दाखवून दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. 

राज्यात हवामानाच्या सुक्ष्म अभ्यासाची गरज त्यांनी व्यक्त केली. हा अभ्यास केल्यानंतर शेतक-यांनी कुठल्या ठिकाणी कशा प्रकारची लागवड घेणे शक्य होईल याची माहिती दिली जाणार असल्याचे ते म्हणाले. कृषी खात्याकडून समुदायीक शेतीचा प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आला असून कंत्राट शेतींना उत्तेजन देम्यासाठी लवकरच कायद्यात बदल केले जाणार असल्याचे कृषी क्षेत्रात गोवा हे आदर्श राज्य करण्याची गरज तसेच इतर राज्यांना आदर्श घालून देण्याची गरज सरदेसाई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यासाठी गोव्यातील हिरवळ राखून ठेवणे गरजेचे आहे. हिरवळ राखून ठेवण्यासाठी शेतक-यांनी संघटित होवून कृषी क्षेत्राला उत्तेजन देण्याची गरज असून त्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. 

टॅग्स :goaगोवा