शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात इस्त्राईलच्या तंत्रज्ञानाने कृषी केंद्र - कृषी मंत्री विजय सरदेसाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 20:17 IST

इस्त्राईल देशातील ग्रीन २००० या कंपनीच्या सहयोगाने उच्च तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्कृष्ठ असे सेंद्रीय कृषी केंद्र कोडार येथील फार्मवर सुरु करण्यात येणार आहे.

म्हापसा : इस्त्राईल देशातील ग्रीन २००० या कंपनीच्या सहयोगाने उच्च तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्कृष्ठ असे सेंद्रीय कृषी केंद्र कोडार येथील फार्मवर सुरु करण्यात येणार आहे. पुढील वर्षी सुरु होणा-या या केंद्रातून सेंद्रीय पद्धतीने शेती कशा प्रकारे करावी याची प्रत्यक्षदर्शी माहिती शेतक-यांना तेथील फार्मवरुन देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी दिली. म्हापसा येथील धुळेर नजिक कृषी फार्मवर गोवा कृषी क्रांती प्रदर्शन व शेतक-यांसाठीच्या प्रशिक्षण सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी सरदेसाई बोलत होते. 

तीन दिवशीय प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, कृषी मंत्री विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर, उपसभापती मायकल लोबो, माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. दयानंद नार्वेकर, भारतीय कृषी संशोधन केंद्राचे संचालक एकनाथ चाकुडकर, कृषी संचालक माधव केळकर, आत्माचे प्रकल्प अधिकारी संजीव मयेकर, कृषी विभागीय अधिकारी रघुनाथ जोशी उपस्थित होते. कृषी तांत्रिक व्यवस्थापन एजन्सी (आत्मा), कृषी खाते, नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

कोडार फार्मवर सेंद्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी इस्त्राईल देशाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे सरदेसाई म्हणाले. त्यासाठी त्या कंपनी सोबत करार करण्यात आला असून या योजनेवर सुमारे ६ कोटी रुपये खर्च अपेक्षीत असल्याची माहिती यावेली दिली. भारत सरकारने सुद्धा संबंधीत कंपनीच्या सहकार्याने काम केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्राईल देशच्या दौ-यावर असताना त्यांनी पाहणी सुद्धा केली होती अशी माहिती सरदेसाई यांनी दिली. या कंपनीने राज्य सरकार समोर सादरीकरण सुद्धा केले होते. केलेले सादरीकरण आता प्रत्यक्षात दाखवून दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. 

राज्यात हवामानाच्या सुक्ष्म अभ्यासाची गरज त्यांनी व्यक्त केली. हा अभ्यास केल्यानंतर शेतक-यांनी कुठल्या ठिकाणी कशा प्रकारची लागवड घेणे शक्य होईल याची माहिती दिली जाणार असल्याचे ते म्हणाले. कृषी खात्याकडून समुदायीक शेतीचा प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आला असून कंत्राट शेतींना उत्तेजन देम्यासाठी लवकरच कायद्यात बदल केले जाणार असल्याचे कृषी क्षेत्रात गोवा हे आदर्श राज्य करण्याची गरज तसेच इतर राज्यांना आदर्श घालून देण्याची गरज सरदेसाई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यासाठी गोव्यातील हिरवळ राखून ठेवणे गरजेचे आहे. हिरवळ राखून ठेवण्यासाठी शेतक-यांनी संघटित होवून कृषी क्षेत्राला उत्तेजन देण्याची गरज असून त्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. 

टॅग्स :goaगोवा