शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

पणजीनंतर आता रायबंदरवासिय स्मार्ट सिटीच्या कामाने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2024 4:06 PM

रायबंदरवासियांना आता या स्मार्ट सिटीच्या खोदकामाचा कंटाळा आला असून काही जणांनी येथे घातलेले कठडे काढले आहेत.

नारायण गावस, पणजी:स्मार्ट सिटीच्या कामाने पणजी लोक गेली अनेक वर्षे त्रास सहन करत आहेत. आता रायबंदरमध्ये स्मार्ट सिटीचे काम सुरु असल्याने या भागातील नागरिक या कामाने त्रस्त झाले आहेत. गेले वर्ष होत आले या भागातील सांडपाण्याची पाईपलाईन ाघालण्यासाठी खाेदकाम सुरु आहे. त्यामुळे येथे ठिकठिकाणी कठडे घालण्यात आले असून मोठ्या वाहनांना बंदी घातली आहे. रायबंदरवासियांना आता या स्मार्ट सिटीच्या खोदकामाचा कंटाळा आला असून काही जणांनी येथे घातलेले कठडे काढले आहेत.

कठडे घालण्यात आल्याने गाड्या घरी नेताना त्रास होत आहे. तसेच बाहेर जाताना धुरळाचा सामना करावा लागतो. घरात सर्वत्र मातीचा धूरळ परसला आहे. गेले वर्ष होत आले या ठिकाणी खोदकाम सुरु आहे. पण काम संथगतीने सुरु असल्याने सर्वांना त्रास हाेत आहे. असे आता रायबंदरवासिय लोक म्हणतात. लवकरात लवकर हे काम पूर्ण करुन रस्ता सुरळीत करावा अशी मागणी आता आता रायबंदरवासियांकडून केली जात आहे.

रायबंदराचे रहिवाशी मायकल डायस म्हणाले, गेले अनेक महिने सुरु असलेल्या या कामाचा आम्हाला आता कटाळा आला आहे. घरामध्ये सर्वत्र धूरळ पसरली आहे. अगोदरच रस्ता अरुंद त्यात हे बांधकाम असल्याने आता दुचाकी नेतानाही त्रास होता आहे. आम्हाला मोठ्या गाड्या घरी आणता येत नाही. ठिकठिकाणी कठडे घातले आहेत. धूरळावर वेळेत पाणी मारले जात नाही. तसेच स्मार्ट सिटीचे अधिकारी लक्ष घालत नसल्याने याचा फटका आम्हाला बसला आहे.

ॲड. आयरिश रॉड्रिग्ज म्हणाले, रायबंदर येथील रस्ते खोदण्याचे काम वर्षभरापासून सुरू आहे. कधीही न संपणाऱ्या अनियोजित आणि अत्यंत निकृष्ट दर्जाच्या स्मार्ट सिटी कामांमुळे अडकलेल्या रहिवाशांसह धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झाले असून आरोग्य आणि सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आमच्या रहिवाशांच्या आरोग्याशी तडजोड केली जात असल्याने ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सध्या सुरू असलेल्या कामांचे भवितव्य काय असेल हे कोणालाच माहीत नसताना सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या तथाकथित विकासकामांच्या गुणवत्तेची हमी स्वत: अधिकारी देऊ शकत नाही, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे.

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटी