शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयनंतर थेट कॉलेजमध्ये!

By admin | Updated: May 10, 2015 00:59 IST

पणजी : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधून आता विविध कौशल्य विकसित करणारे नवे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. आठवीत

पणजी : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधून आता विविध कौशल्य विकसित करणारे नवे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. आठवीत उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना दोन वर्षे आयटीआयमध्ये शिक्षण घेऊन थेट अकरावीत प्रवेश घेण्याची किंवा दहावीत उत्तीर्ण झालेल्या मुलांना थेट कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची संधी त्यामुळे मिळणार आहे. क्राफ्टमन ट्रेनिंग खात्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांनी शनिवारी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.कारखाने व बाष्पक निरीक्षकालय हे खातेही मंत्री ढवळीकर यांच्याकडे आहे. ते सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांची तिथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. एका परिषदेतही भाग घेतला. मंत्री ढवळीकर यांनी सांगितले की, गोव्यातील आयटीआय क्षेत्राचा पूर्ण नकाशाच आता बदलणार आहे. सगळा अभ्यासक्रम तयार झाला असून त्याची अंमलबजावणी आता सुरू होईल. प्रत्येक मुला-मुलींच्या कौशल्यानुसार त्यांना शिक्षण मिळावे, अशी सोय केली जाणार आहे. यासाठी सर्व ते साहाय्य करण्याचे आश्वासन आपल्याला केंद्रीय मंत्री रुडी यांनी दिले आहे.मंत्री ढवळीकर म्हणाले की, आता राज्यातील आयटीआयमध्ये आठवी उत्तीर्ण मुलांनी प्रवेश घेतला, तर दोन वर्षांनी त्यांना दहावी (एसएससी) उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळेल. या प्रमाणपत्राच्या आधारे मुले मग हायर सेकंडरीत अकरावीत प्रवेश घेऊ शकतील. त्याचप्रमाणे दहावी शिकून मग कॉलेजला न पोहोचणारी मुलेदेखील दहावीनंतर दोन वर्षे आयटीआयमध्ये शिकली, तर त्यांना बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळेल. या प्रमाणपत्राच्या आधारे मुले मग महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकतील. (खास प्रतिनिधी)