शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

आयटीआयनंतर थेट कॉलेजमध्ये!

By admin | Updated: May 10, 2015 00:59 IST

पणजी : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधून आता विविध कौशल्य विकसित करणारे नवे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. आठवीत

पणजी : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधून आता विविध कौशल्य विकसित करणारे नवे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. आठवीत उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना दोन वर्षे आयटीआयमध्ये शिक्षण घेऊन थेट अकरावीत प्रवेश घेण्याची किंवा दहावीत उत्तीर्ण झालेल्या मुलांना थेट कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची संधी त्यामुळे मिळणार आहे. क्राफ्टमन ट्रेनिंग खात्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांनी शनिवारी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.कारखाने व बाष्पक निरीक्षकालय हे खातेही मंत्री ढवळीकर यांच्याकडे आहे. ते सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांची तिथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. एका परिषदेतही भाग घेतला. मंत्री ढवळीकर यांनी सांगितले की, गोव्यातील आयटीआय क्षेत्राचा पूर्ण नकाशाच आता बदलणार आहे. सगळा अभ्यासक्रम तयार झाला असून त्याची अंमलबजावणी आता सुरू होईल. प्रत्येक मुला-मुलींच्या कौशल्यानुसार त्यांना शिक्षण मिळावे, अशी सोय केली जाणार आहे. यासाठी सर्व ते साहाय्य करण्याचे आश्वासन आपल्याला केंद्रीय मंत्री रुडी यांनी दिले आहे.मंत्री ढवळीकर म्हणाले की, आता राज्यातील आयटीआयमध्ये आठवी उत्तीर्ण मुलांनी प्रवेश घेतला, तर दोन वर्षांनी त्यांना दहावी (एसएससी) उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळेल. या प्रमाणपत्राच्या आधारे मुले मग हायर सेकंडरीत अकरावीत प्रवेश घेऊ शकतील. त्याचप्रमाणे दहावी शिकून मग कॉलेजला न पोहोचणारी मुलेदेखील दहावीनंतर दोन वर्षे आयटीआयमध्ये शिकली, तर त्यांना बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळेल. या प्रमाणपत्राच्या आधारे मुले मग महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकतील. (खास प्रतिनिधी)