शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पर्यटन सुरू होताच ८१ व्यक्तींना बुडताना वाचवण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 21:30 IST

उत्तर गोव्यातील कळंगुट, सिकेरी, आश्वे, केरी सर्वाधिक घटना

- सदगुरू पाटीलपणजी : राज्यात पर्यटन मोसम सुरू होताच, समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक किंवा स्थानिक लोक बुडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. मात्र गेल्या दोन आठवड्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या ६० घटनांवेळी एकूण ८१ व्यक्तींना वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले. यात बहुतांश पर्यटक आहेत.उत्तर गोव्यातील कळंगुट, सिकेरी, आश्वे, केरी आदी किनाऱ्यांवर अनेक घटना घडल्या. तसेच दक्षिण गोव्यातील पाळोळे आदी किनाऱ्यांवर गेल्या दोन आठवड्यांमध्ये साठ घटना घडल्याचे जीवरक्षकांचे म्हणणे आहे. एक-दोघांना आत्महत्त्या करताना वाचविले गेले. बार्देश तालुक्यातील जगप्रसिद्ध किनाऱ्यांपासून दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांपर्यंत सर्वत्र एकूण लाखो पर्यटक गेल्या दोन आठवड्यांत येऊन गेले. रुपेरी वाळूचे गोव्यातील किनारे पर्यटकांना मोहात पाडतात. येथील फेसाळत्या लाटांशी खेळण्याचा मोह पर्यटक आवरत नाहीत. काहीजण तर मद्य पिऊन पाण्यात उतरतात व मग मृत्यूच्या दाढेत ओढले जातात. नाताळ सण व नववर्ष साजरे करण्यासाठी लाखो पर्यटक गोव्यात येऊन गेले. अजूनही काही देशी पर्यटक गोव्यात आहेत. गेल्या दोन आठवड्यात एक-दोघांचा बुडून मृत्यूही झाला.दि. १ जानेवारीपासून ३५ व्यक्तींना किनाऱ्यांवर वाचविले गेले. काहीजणांना किनाऱ्यांवर आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली. अशा चार व्यक्तींना वाचविले गेले. रुग्णवाहिका वगैरे बोलावून त्यांना वैद्यकीय मदत पुरविली गेली. पस्तीस देशी पर्यटकांना बुडताना वाचविले गेले. हरवलेल्या मुलांचाही छडा किनाऱ्यांवर लागला. दि. ३१ डिसेंबर ते दि. ३ जानेवारीपर्यंत एक ते पाच वर्षांची काही मुले किनाऱ्यांवर सापडली. तीन घटनांमध्ये हरवलेल्या मुलांची पुन्हा पालकांशी भेट झाली, असा जीवरक्षकांच्या दृष्टी यंत्रणेचा दावा आहे. दरम्यान, कळंगुट, कांदोळी, वागातोर केळशी अशा समुद्रात आज सोमवारी चार घटना घडल्या. सतराजणांचा गट कळंगुट येथे पोहत होता. त्यापैकी सोळा ते वीस वयोगटातील तिघेजण समुद्रात वाहून जाऊ लागले. त्यांना जीवरक्षकांनी वाचविले. तसेच वागातोर येथे बारा वर्षांहून कमी वयाच्या दोघा मुलांना बुडताना वाचविले गेले.