शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सहा तालुक्यांतील ८१ मुलांनी शाळेचे तोंडही पाहिले नाही! राज्यात १०० टक्के साक्षरतेची ऐशीतैशी

By किशोर कुबल | Updated: November 7, 2024 07:24 IST

प्रौढ निरक्षरही आढळले, आरटीआय विशेष

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : येत्या १९ डिसेंबर म्हणजेच गोवा मुक्तिदिनापर्यंत राज्यात शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट गाठण्याचा डंका पिटवला जात असला तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाही. राज्यातील सहा तालुक्यांमध्ये तब्बल ८१ मुलांनी अजून शाळेचे तोंडच पाहिलेले नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय अर्जातून पुढे आली आहे. समग्र शिक्षा अभियानचे उपसंचालक तथा सार्वजनिक माहिती अधिकारी मनोज सावईकर यांच्याकडून या प्रतिनिधीला आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तराप्रमाणे शाळेपासून वंचित असलेली सर्वाधिक ३४ मुले मुरगाव तालुक्यात आहेत. अर्थात बहुतांश मुले स्थलांतरित किंवा मजुरांची असली तरी शंभर टक्के साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी सरकारला आधी या मुलांना शाळेत आणावे लागेल.

सरकारचा असा दावा आहे की, सध्या राज्यात ९८ टक्के साक्षरता असून, मुक्तिदिनापर्यंत शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट गाठले जाईल. सांगे, केपे व काणकोण तालुक्यांमध्ये प्रौढ निरक्षरांची संख्या जास्त आहे. कोकणी, मराठी किंवा त्यांना हवी ती भाषा लिहायला, वाचायला शिकवून साक्षर केले जाईल.

दरम्यान, 'लोकमत' असे दिसून आले की, एकीकडे शाळेपासून वंचित मुले आढळत असताना प्रौढ निरक्षरांचे प्रमाणही कमी झालेले नाही. सरकारने प्रौढ निरक्षरांच्या मागे आपली शक्त्ती लावली आहे. तर दुसरीकडे शाळेपासून वंचित मुलेही असून, त्यांच्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. ग्रामपंचायतींनी आपापल्या क्षेत्रातील निरक्षरांची यादी शिक्षण खात्याला सादर करावी, असे सक्त निर्देश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोनेक महिन्यांपूर्वी दिले होते. स्वयंसेवकांनी सुमारे ३ हजार प्रौढ निरक्षरांना लिहायला व वाचायला शिकवून त्यांची परीक्षाही घेतली. त्यात ७०० जण उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित २,३०० जणांची परीक्षा झालेली असून, निकाल अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

शिक्षण हक्क कायद्याला हरताळ

६ ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार शिक्षण हक्क कायद्याने दिला आहे. केंद्र सरकारने संमत केलेला हा कायदा वरील वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीने शिक्षण देण्यासाठी आहे. परंतु ८१ मुले अजून शाळेत न फिरकल्याची माहिती उघड झाल्याने या कायद्याला हरताळ फासल्यासारखेच आहे. 

टॅग्स :goaगोवाRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताRight to Information actमाहिती अधिकारState Governmentराज्य सरकार