शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

सहा तालुक्यांतील ८१ मुलांनी शाळेचे तोंडही पाहिले नाही! राज्यात १०० टक्के साक्षरतेची ऐशीतैशी

By किशोर कुबल | Updated: November 7, 2024 07:24 IST

प्रौढ निरक्षरही आढळले, आरटीआय विशेष

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : येत्या १९ डिसेंबर म्हणजेच गोवा मुक्तिदिनापर्यंत राज्यात शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट गाठण्याचा डंका पिटवला जात असला तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाही. राज्यातील सहा तालुक्यांमध्ये तब्बल ८१ मुलांनी अजून शाळेचे तोंडच पाहिलेले नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय अर्जातून पुढे आली आहे. समग्र शिक्षा अभियानचे उपसंचालक तथा सार्वजनिक माहिती अधिकारी मनोज सावईकर यांच्याकडून या प्रतिनिधीला आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तराप्रमाणे शाळेपासून वंचित असलेली सर्वाधिक ३४ मुले मुरगाव तालुक्यात आहेत. अर्थात बहुतांश मुले स्थलांतरित किंवा मजुरांची असली तरी शंभर टक्के साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी सरकारला आधी या मुलांना शाळेत आणावे लागेल.

सरकारचा असा दावा आहे की, सध्या राज्यात ९८ टक्के साक्षरता असून, मुक्तिदिनापर्यंत शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट गाठले जाईल. सांगे, केपे व काणकोण तालुक्यांमध्ये प्रौढ निरक्षरांची संख्या जास्त आहे. कोकणी, मराठी किंवा त्यांना हवी ती भाषा लिहायला, वाचायला शिकवून साक्षर केले जाईल.

दरम्यान, 'लोकमत' असे दिसून आले की, एकीकडे शाळेपासून वंचित मुले आढळत असताना प्रौढ निरक्षरांचे प्रमाणही कमी झालेले नाही. सरकारने प्रौढ निरक्षरांच्या मागे आपली शक्त्ती लावली आहे. तर दुसरीकडे शाळेपासून वंचित मुलेही असून, त्यांच्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. ग्रामपंचायतींनी आपापल्या क्षेत्रातील निरक्षरांची यादी शिक्षण खात्याला सादर करावी, असे सक्त निर्देश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोनेक महिन्यांपूर्वी दिले होते. स्वयंसेवकांनी सुमारे ३ हजार प्रौढ निरक्षरांना लिहायला व वाचायला शिकवून त्यांची परीक्षाही घेतली. त्यात ७०० जण उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित २,३०० जणांची परीक्षा झालेली असून, निकाल अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

शिक्षण हक्क कायद्याला हरताळ

६ ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार शिक्षण हक्क कायद्याने दिला आहे. केंद्र सरकारने संमत केलेला हा कायदा वरील वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीने शिक्षण देण्यासाठी आहे. परंतु ८१ मुले अजून शाळेत न फिरकल्याची माहिती उघड झाल्याने या कायद्याला हरताळ फासल्यासारखेच आहे. 

टॅग्स :goaगोवाRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताRight to Information actमाहिती अधिकारState Governmentराज्य सरकार