शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आरटीआय विशेष: ७५,७५७ लहान व्यावसायिकांना मिळाले पाच हजाराचे पॅकेज

By किशोर कुबल | Updated: November 21, 2024 13:23 IST

कोविड काळात धंदा बंद राहिल्याने बसला होता फटका: तब्बल ३७ कोटी ८७ लाख ८५ हजार रुपये वितरित

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कोविड महामारीच्या काळात व्यवसाय बंद ठेवावा लागल्याने फटका बसलेल्या विक्रेत्यांना सरकारने पाच हजार रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजचा ७५,७५७ जणांनी लाभ घेतला असून, ३७ कोटी ८७ लाख ८५ हजार रुपये वितरित झालेले आहेत.

समाज कल्याण खात्याकडून आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. फळ, भाजी विक्रेते, मासळी विक्रेते, तसेच फुले व इतर वस्तू विकणारे, जत्रा, तसेच फेस्तात खाजे, लाडू, चणे विकणारे व इतर मिळून ६० प्रकारच्या लहान व्यावसायिकांना या पॅकेजचा लाभ देण्यात आला.

२०१९ ते २०२० दरम्यान कोविड महामारीच्या काळात सर्वच व्यवहार बंद राहिल्याने, तसेच धंदा बंद ठेवावा लागल्याने लोकांचे आर्थिक नुकसान झाले होते. सरकारने नंतर अशा लहान व्यावसायिकांसाठी समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून प्रत्येकी पाच हजार रुपये पॅकेज जाहीर केले होते.

सासष्टीत सर्वाधिक लाभधारक

आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरातून असे स्पष्ट झाले आहे की, सासष्टी तालुक्यात सर्वाधिक ११,६७७ विक्रेत्यांनी याचा लाभ घेतला. त्यापाठोपाठ फोंडा तालुक्यात ९,१५५ व बार्देश तालुक्यात ८,३९६ व्यावसायिकांना लाभ मिळाला.

प्रक्रिया सुलभ केल्याने वाढले लाभार्थी

दरम्यान, हे पॅकेज जाहीर झाल्यानंतर व्यावसायिकांनी सोपस्कारांविषयक कटकटींबद्दल तक्रार केल्यावर सरकारने काही गोष्टी शिथिल केल्या होत्या व पॅकेजसाठी सोपस्कार सुटसुटीत केले होते. पंचायत सचिवांची एनओसी, प्रतिज्ञापत्र सादर करणे यापासून सूट देण्यात आली व केवळ राजपत्रित अधिकाऱ्याने संबंधित व्यावसायिकाला ओळखत असल्याचे प्रमाणित केल्यास हे पॅकेज मिळू शकेल, अशी सोय केली. त्यामुळे अधिकाधिक प्रमाणात अर्ज आले.

 

टॅग्स :goaगोवाRight to Information actमाहिती अधिकार