शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

पावसाळयातही ७५ टक्के गोवा 'फुल्ल'

By admin | Updated: July 20, 2016 13:23 IST

विधानसभेचे आणखी एक अधिवेशन येत्या उन्हाळा आणि हिवाळया प्रमाणे आता पावसाळयातही गोव्यामध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. २० - उन्हाळा आणि हिवाळया प्रमाणे आता पावसाळयातही गोव्यामध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे. पावसाच्या मोसमात देखील गोव्यात हॉटेलांच्या 75 टक्के  खोल्या आरक्षित  आहेत. त्यामुळे गोव्याला आता वर्षाचे बाराही महिने सतर्क रहावे लागेल कारण पर्यटन मोसम वाढला आहे असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. 
 
विधानसभेचे आणखी एक अधिवेशन येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते, असे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी येथे सांगितले. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की येत्या दि. 25 पासून सुरू होत असलेले अधिवेशन हे विधानसभेचे शेवटचे अधिवेशन आहे असे म्हणता येणार नाही. नोव्हेंबरमध्ये आणखी एक आठवडाभराचे अधिवेशन व्हायला हवे असे आपले मत आहे.
 
राजकीय स्थितीविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की विरोधकांनी महायुती केली तरी आमची काहीच हरकत नाही. लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या युत्या होत असतात. मात्र अनेक विरोधी पक्ष किंवा विरोधी आमदार एकत्र आले व त्यांची महायुती झाली म्हणून लोक सरकारविरुद्ध एकत्र येणार नाहीत. विविध पक्ष व त्यांचे आमदार एकत्र येऊ शकतात पण त्यांचे समर्थक एकत्र कधी येत नाहीत. म्हणजे सरकारविरुद्ध मतांचे एकत्रिकरण झाले असे होत नसते.
 
मुख्यमंत्री म्हणाले, की गेले अनेक दिवस महायुतीबाबत चर्चा सुरू आहे. यापुढील सरकार काँग्रेसचे असेल असे प्रदेशाध्यक्ष लुईङिान फालेरो यांनी म्हटले आहे खरे पण कोणत्या राज्यात ते त्यांनी सांगितलेले नाही. त्यांनी राज्याचे नाव घेतले नाही. कदाचित ते इशान्येकडील राज्यांविषयी बोलत असतील, कारण त्या भागाच्या ते संपर्कात असतात. येत्या अधिवेशनात विरोधकांनी कितीही प्रश्न विचारावेत पण ते विषयाचा अभ्यास गंभीरपणो किती करतात किंवा त्यांच्या टीकेस किती प्रमाणात खोली असते लोकांना ठाऊक आहे.
 
सासष्टीत पाठींबा वाढला
पार्सेकर म्हणाले, की भाजप सरकारसाठी सासष्टी तालुक्यात देखील पाठींबा वाढला आहे. आपण तीन एलईडी बल्ब वितरित करण्यासाठी सासष्टीतील काही मतदारसंघांमध्ये गेलो, तिथे लोकांची मोठी गर्दी पाहिली. आपल्याला पोहचण्यास अर्ध्या तासाचा विलंब झाला तरी, लोक थांबले होते असे आढळून आले. तीन एलईडी बल्ब म्हणजे काहीच नव्हे पण लोक सोहळ्य़ावेळी प्रतीक्षा करतात यावरून सरकारची लोकप्रियता कळून येते. आम्ही प्रतिकुल परिस्थितीतही राज्य ब-यायापैकी चालवले.