शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

पावसाळयातही ७५ टक्के गोवा 'फुल्ल'

By admin | Updated: July 20, 2016 13:23 IST

विधानसभेचे आणखी एक अधिवेशन येत्या उन्हाळा आणि हिवाळया प्रमाणे आता पावसाळयातही गोव्यामध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. २० - उन्हाळा आणि हिवाळया प्रमाणे आता पावसाळयातही गोव्यामध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे. पावसाच्या मोसमात देखील गोव्यात हॉटेलांच्या 75 टक्के  खोल्या आरक्षित  आहेत. त्यामुळे गोव्याला आता वर्षाचे बाराही महिने सतर्क रहावे लागेल कारण पर्यटन मोसम वाढला आहे असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. 
 
विधानसभेचे आणखी एक अधिवेशन येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते, असे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी येथे सांगितले. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की येत्या दि. 25 पासून सुरू होत असलेले अधिवेशन हे विधानसभेचे शेवटचे अधिवेशन आहे असे म्हणता येणार नाही. नोव्हेंबरमध्ये आणखी एक आठवडाभराचे अधिवेशन व्हायला हवे असे आपले मत आहे.
 
राजकीय स्थितीविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की विरोधकांनी महायुती केली तरी आमची काहीच हरकत नाही. लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या युत्या होत असतात. मात्र अनेक विरोधी पक्ष किंवा विरोधी आमदार एकत्र आले व त्यांची महायुती झाली म्हणून लोक सरकारविरुद्ध एकत्र येणार नाहीत. विविध पक्ष व त्यांचे आमदार एकत्र येऊ शकतात पण त्यांचे समर्थक एकत्र कधी येत नाहीत. म्हणजे सरकारविरुद्ध मतांचे एकत्रिकरण झाले असे होत नसते.
 
मुख्यमंत्री म्हणाले, की गेले अनेक दिवस महायुतीबाबत चर्चा सुरू आहे. यापुढील सरकार काँग्रेसचे असेल असे प्रदेशाध्यक्ष लुईङिान फालेरो यांनी म्हटले आहे खरे पण कोणत्या राज्यात ते त्यांनी सांगितलेले नाही. त्यांनी राज्याचे नाव घेतले नाही. कदाचित ते इशान्येकडील राज्यांविषयी बोलत असतील, कारण त्या भागाच्या ते संपर्कात असतात. येत्या अधिवेशनात विरोधकांनी कितीही प्रश्न विचारावेत पण ते विषयाचा अभ्यास गंभीरपणो किती करतात किंवा त्यांच्या टीकेस किती प्रमाणात खोली असते लोकांना ठाऊक आहे.
 
सासष्टीत पाठींबा वाढला
पार्सेकर म्हणाले, की भाजप सरकारसाठी सासष्टी तालुक्यात देखील पाठींबा वाढला आहे. आपण तीन एलईडी बल्ब वितरित करण्यासाठी सासष्टीतील काही मतदारसंघांमध्ये गेलो, तिथे लोकांची मोठी गर्दी पाहिली. आपल्याला पोहचण्यास अर्ध्या तासाचा विलंब झाला तरी, लोक थांबले होते असे आढळून आले. तीन एलईडी बल्ब म्हणजे काहीच नव्हे पण लोक सोहळ्य़ावेळी प्रतीक्षा करतात यावरून सरकारची लोकप्रियता कळून येते. आम्ही प्रतिकुल परिस्थितीतही राज्य ब-यायापैकी चालवले.