शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळयातही ७५ टक्के गोवा 'फुल्ल'

By admin | Updated: July 20, 2016 13:23 IST

विधानसभेचे आणखी एक अधिवेशन येत्या उन्हाळा आणि हिवाळया प्रमाणे आता पावसाळयातही गोव्यामध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. २० - उन्हाळा आणि हिवाळया प्रमाणे आता पावसाळयातही गोव्यामध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे. पावसाच्या मोसमात देखील गोव्यात हॉटेलांच्या 75 टक्के  खोल्या आरक्षित  आहेत. त्यामुळे गोव्याला आता वर्षाचे बाराही महिने सतर्क रहावे लागेल कारण पर्यटन मोसम वाढला आहे असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. 
 
विधानसभेचे आणखी एक अधिवेशन येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते, असे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी येथे सांगितले. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की येत्या दि. 25 पासून सुरू होत असलेले अधिवेशन हे विधानसभेचे शेवटचे अधिवेशन आहे असे म्हणता येणार नाही. नोव्हेंबरमध्ये आणखी एक आठवडाभराचे अधिवेशन व्हायला हवे असे आपले मत आहे.
 
राजकीय स्थितीविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की विरोधकांनी महायुती केली तरी आमची काहीच हरकत नाही. लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या युत्या होत असतात. मात्र अनेक विरोधी पक्ष किंवा विरोधी आमदार एकत्र आले व त्यांची महायुती झाली म्हणून लोक सरकारविरुद्ध एकत्र येणार नाहीत. विविध पक्ष व त्यांचे आमदार एकत्र येऊ शकतात पण त्यांचे समर्थक एकत्र कधी येत नाहीत. म्हणजे सरकारविरुद्ध मतांचे एकत्रिकरण झाले असे होत नसते.
 
मुख्यमंत्री म्हणाले, की गेले अनेक दिवस महायुतीबाबत चर्चा सुरू आहे. यापुढील सरकार काँग्रेसचे असेल असे प्रदेशाध्यक्ष लुईङिान फालेरो यांनी म्हटले आहे खरे पण कोणत्या राज्यात ते त्यांनी सांगितलेले नाही. त्यांनी राज्याचे नाव घेतले नाही. कदाचित ते इशान्येकडील राज्यांविषयी बोलत असतील, कारण त्या भागाच्या ते संपर्कात असतात. येत्या अधिवेशनात विरोधकांनी कितीही प्रश्न विचारावेत पण ते विषयाचा अभ्यास गंभीरपणो किती करतात किंवा त्यांच्या टीकेस किती प्रमाणात खोली असते लोकांना ठाऊक आहे.
 
सासष्टीत पाठींबा वाढला
पार्सेकर म्हणाले, की भाजप सरकारसाठी सासष्टी तालुक्यात देखील पाठींबा वाढला आहे. आपण तीन एलईडी बल्ब वितरित करण्यासाठी सासष्टीतील काही मतदारसंघांमध्ये गेलो, तिथे लोकांची मोठी गर्दी पाहिली. आपल्याला पोहचण्यास अर्ध्या तासाचा विलंब झाला तरी, लोक थांबले होते असे आढळून आले. तीन एलईडी बल्ब म्हणजे काहीच नव्हे पण लोक सोहळ्य़ावेळी प्रतीक्षा करतात यावरून सरकारची लोकप्रियता कळून येते. आम्ही प्रतिकुल परिस्थितीतही राज्य ब-यायापैकी चालवले.