शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळयातही ७५ टक्के गोवा 'फुल्ल'

By admin | Updated: July 20, 2016 13:23 IST

विधानसभेचे आणखी एक अधिवेशन येत्या उन्हाळा आणि हिवाळया प्रमाणे आता पावसाळयातही गोव्यामध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. २० - उन्हाळा आणि हिवाळया प्रमाणे आता पावसाळयातही गोव्यामध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे. पावसाच्या मोसमात देखील गोव्यात हॉटेलांच्या 75 टक्के  खोल्या आरक्षित  आहेत. त्यामुळे गोव्याला आता वर्षाचे बाराही महिने सतर्क रहावे लागेल कारण पर्यटन मोसम वाढला आहे असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. 
 
विधानसभेचे आणखी एक अधिवेशन येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते, असे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी येथे सांगितले. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की येत्या दि. 25 पासून सुरू होत असलेले अधिवेशन हे विधानसभेचे शेवटचे अधिवेशन आहे असे म्हणता येणार नाही. नोव्हेंबरमध्ये आणखी एक आठवडाभराचे अधिवेशन व्हायला हवे असे आपले मत आहे.
 
राजकीय स्थितीविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की विरोधकांनी महायुती केली तरी आमची काहीच हरकत नाही. लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या युत्या होत असतात. मात्र अनेक विरोधी पक्ष किंवा विरोधी आमदार एकत्र आले व त्यांची महायुती झाली म्हणून लोक सरकारविरुद्ध एकत्र येणार नाहीत. विविध पक्ष व त्यांचे आमदार एकत्र येऊ शकतात पण त्यांचे समर्थक एकत्र कधी येत नाहीत. म्हणजे सरकारविरुद्ध मतांचे एकत्रिकरण झाले असे होत नसते.
 
मुख्यमंत्री म्हणाले, की गेले अनेक दिवस महायुतीबाबत चर्चा सुरू आहे. यापुढील सरकार काँग्रेसचे असेल असे प्रदेशाध्यक्ष लुईङिान फालेरो यांनी म्हटले आहे खरे पण कोणत्या राज्यात ते त्यांनी सांगितलेले नाही. त्यांनी राज्याचे नाव घेतले नाही. कदाचित ते इशान्येकडील राज्यांविषयी बोलत असतील, कारण त्या भागाच्या ते संपर्कात असतात. येत्या अधिवेशनात विरोधकांनी कितीही प्रश्न विचारावेत पण ते विषयाचा अभ्यास गंभीरपणो किती करतात किंवा त्यांच्या टीकेस किती प्रमाणात खोली असते लोकांना ठाऊक आहे.
 
सासष्टीत पाठींबा वाढला
पार्सेकर म्हणाले, की भाजप सरकारसाठी सासष्टी तालुक्यात देखील पाठींबा वाढला आहे. आपण तीन एलईडी बल्ब वितरित करण्यासाठी सासष्टीतील काही मतदारसंघांमध्ये गेलो, तिथे लोकांची मोठी गर्दी पाहिली. आपल्याला पोहचण्यास अर्ध्या तासाचा विलंब झाला तरी, लोक थांबले होते असे आढळून आले. तीन एलईडी बल्ब म्हणजे काहीच नव्हे पण लोक सोहळ्य़ावेळी प्रतीक्षा करतात यावरून सरकारची लोकप्रियता कळून येते. आम्ही प्रतिकुल परिस्थितीतही राज्य ब-यायापैकी चालवले.