शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

राज्यात ४० नव्या शाळांना परवानगी शक्य

By admin | Updated: March 19, 2017 02:08 IST

पणजी : राज्यात ४० नव्या प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण खात्याकडे विविध शैक्षणिक संस्थांचे अर्ज आले आहेत. त्या अर्जांची

पणजी : राज्यात ४० नव्या प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण खात्याकडे विविध शैक्षणिक संस्थांचे अर्ज आले आहेत. त्या अर्जांची दखल घेऊन शिक्षण खात्याने सर्व भाग शिक्षणाधिकाऱ्यांना शक्याशक्यता तपासून पाहण्याची सूचना केली आहे. येत्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाग शिक्षणाधिकाऱ्यांचे अहवाल आल्यानंतर शिक्षण खाते या ४० शाळांसाठी परवानगीच्या अर्जांबाबत निर्णय घेणार आहे. शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी शनिवारी ‘लोकमत’ला सांगितले, की चौदा मराठी, तेरा कोकणी, सात इंग्लिश व काही उर्दू मिळून एकूण चाळीस शाळा विविध तालुक्यांमध्ये सुरू करण्यासाठी अर्ज आले. आम्ही या अर्जांचा अभ्यास केला व भाग शिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल मागितले आहेत. कुठे सरकारी शाळा अगोदरच आहे व कुठे शाळांची संख्या कमी पडते किंवा कुठे नव्या शाळांची गरज नाही, हे सगळे भाग शिक्षणाधिकारी तपासून पाहतील. दोन शाळांमधील अंतरही पाहिले जाईल. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आम्ही योग्य तो निर्णय घेऊ व मग तिसऱ्या आठवड्यात सर्व अर्जदार संस्थांना आमचा निर्णय कळवू.दरम्यान, सर्व शिक्षा अभियानावर या वेळी एकूण ४३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यापैकी ३३ कोटी रुपये केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केले आहेत. बारा कोटींचा खर्च राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानावर केला जाणार आहे. शिक्षकांच्या शिक्षणासाठी कार्यक्रम राबविण्यावर दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. माध्यान्ह आहाराची जोडणी आता इंटिग्रेटेड वॉइस रिस्पॉन्स सिस्टमशी केली जाणार आहे. या नव्या पद्धतीमुळे कोणत्या विद्यालयात किती विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार म्हणून किती प्रमाणात कोणते पदार्थ दिले गेले ते या पद्धतीमुळे शिक्षण खात्याला आणि केंद्रीय शिक्षा मंत्रालयालाही कळून येणार आहे. तिसवाडी तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर शिक्षण खात्याने हे काम सुरू केले आहे. माध्यान्ह आहार योजनेसाठी ८१ मदतनीस केंद्राने मंजूर केले आहेत.(खास प्रतिनिधी)