शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ; ०९ नोव्हेंबरपर्यंत चालणार

By समीर नाईक | Updated: October 18, 2023 17:30 IST

सदर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे.

समीर नाईक, पणजी:  राज्यात होणारी ३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उद्यापासून सुरू होत आहे. अनेक वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे राज्यात होत असल्याने राज्यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. ९ नोव्हेंबर पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.  गुरुवार १९ रोजी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे बॅडमिंटन या क्रीडा प्रकारापासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. त्यांनतर नेटबॉल, जिमनॅस्टिक, बास्केटबॉल, यासारखे क्रीडा प्रकार होणार आहे. 

२६ रोजी पंतप्रधानाच्याहस्ते अधिकृत उद्घाटन 

१९ पासून स्पर्धा सुरू होत असली तरी सदर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे भव्य स्वरुपात या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडा मंत्री गोविंद गावडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार, इतर मंत्री, आमदार व देशातील प्रसिद्ध क्रीडापटू उपस्थित राहणार आहे. 

पोलिसांच्या रजा रद्द, प्रशिक्षणार्थी पोलिसही असणार बंदोबस्तात 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पोलीसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच स्पर्धा संपेपर्यंत त्यांना रजाही देण्यात येणार नाही, याबाबतचा आदेश पोलीस अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी काढला आहे. तसेच स्पर्धेच्या बंदोबस्तासाठी दिल्ली येथे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलना बोलावण्यात आले आहे. याशिवाय केंद्राकडून अतिरिक्त कंपनी सेवेसाठी मागविण्यात आले आहे.

हजार पेक्षा जास्त गोमंतकीय खेळाडूंचा सहभाग 

या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद राज्याला मिळाले असल्याने प्रत्येक क्रीडा प्रकारात गोव्याला थेट प्रवेश मिळाला आहे, पण काही क्रीडा प्रकारासाठी राज्यात संघटना नसल्याने सुमारे ६-७ क्रीडा प्रकार वगळता सर्व क्रीडा प्रकारात गोव्याचे संघ सहभाग घेणार आहे. यातून सुमारे एक हजारपेक्षा जास्त गोमंतकीय खेळाडू सहभागी होत आहे.

७ ते ८ हजार विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांना पाहता यावी यासाठी शिक्षण खात्याकडून परिपत्रक जारी केले होते, यानुसार सुरुवातीच्या काळात सुमारे ४ हजार विद्यार्थी स्पर्धा दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थिती लावणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, पण जशी जशी स्पर्धा जवळ येत आहे, तसे तसे ही संख्या वाढू लागली असून आता जवळपास ७ ते ८ हजार विद्यार्थी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :goaगोवा