शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

गोव्यात ३३३ विदेशी गुन्हे करून भुमिगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 19:05 IST

विदेशी लोक गोव्यात येतात आणि गुन्हे करून कुठे जातात याचा काही ताळतंत्र राहिलेला नाही. मागील ५ वर्षांत गोव्यात आलेल्या ५८३ विदेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 20 - विदेशी लोक गोव्यात येतात आणि गुन्हे करून कुठे जातात याचा काही ताळतंत्र राहिलेला नाही. मागील ५ वर्षांत गोव्यात आलेल्या ५८३ विदेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले होते. परंतु त्यातील ३३३ लोक अजूनही पोलिसांना सापडलेले नसल्यामुळे ते भुमिगताच्या यादीत आहेत. विदेशी लोकांनी गोव्यात जमीनी व इतर मालमत्ता बळकावल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते परंतु हे लोक गोव्यात गुन्हे करूनही त्यांचे कुणी बिघडवू शकत नाही अशी परिस्थिती आहे. विदेशी लोक गोव्यात येवून गुन्हे करूशकतात असेच नव्हे तर गुन्हे करून पोलिसांना न सापडता भुमिगतही राहू शकतात हे पोलीस खात्यानेच दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत अहे. विदेशी नोंदणी विभागाचा ताबा असलेले पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी दिलेल्या माहिती नुसार २०११ ते २०१६ या वर्षांत ५८३ विदेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंद झाले होते. त्यातील ३३३ लोक अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत. या लोकांनी आपल्या देशात पळ काढला असावा असे म्हणावे तर विदेशी विभाग नोंदणी खात्याच्या परवानगी शिवाय देशातील कोणत्याही विमानतळावरून ते जाऊ शकत नाहीत. आतापर्यंत या ३३३ लोकांपैकी एकाही माणसाला विदेशी विभागाकडून परवनगी मिळालेली नाही. त्यामुळे हे लोक विदेशात पळण्याची श्क्यताही नाही. त्यामुळे हे लोक भुमिगत झाले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. ७२ विदेशींची रवानगीअतापर्यंत पोलिसांनी विविध गुन्हे केलेल्या ७२ विदेशी नागरिकांची रवानगी त्यांच्या देशात केली असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. ज्या लोकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत आणि जी प्रकरणे निकालात काढली आहेत अशाच लोकांची रवानगी त्यांच्या देशात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रशियन आणि इंग्लंडच्या नागरिकांची संख्या सर्वाधिक अनुक्रमे १६ व १० अशी आहे.