शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

गोवा फॉरवर्डचे २0 उमेदवार सप्टेंबर अखेरपर्यंत जाहीर

By admin | Updated: August 19, 2016 02:12 IST

पणजी : गोवा फॉरवर्ड पक्ष आपले २0 उमेदवार सप्टेंबरअखेरपर्यंत जाहीर करणार आहे. काँग्रेसबरोबर युतीचा पर्याय पक्षाने खुला ठेवला

पणजी : गोवा फॉरवर्ड पक्ष आपले २0 उमेदवार सप्टेंबरअखेरपर्यंत जाहीर करणार आहे. काँग्रेसबरोबर युतीचा पर्याय पक्षाने खुला ठेवला असून प्रमुख १२ प्रश्न घेऊन पक्ष जनतेच्या दरबारात जाणार आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर तिंबले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाला अधिमान्यता दिल्यानंतर ही पहिलीच पत्रकार परिषद होती. तिंबलो म्हणाले की, सरकार जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर असंवेदनशील बनले आहे. विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीची हत्या केली. आमच्या आमदारांनी अनेक विषय मांडण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना बोलू दिले नाही. रेड कॅटेगरीतील उद्योगांना पायघड्या घालून पर्यावरणाची हानी केली जात आहे. नद्यांचे राष्ट्रीयीकरण करून सरकार मच्छीमारांचा उदरनिर्वाह तसेच मत्स्यसंपत्ती नष्ट करायला निघाले आहे. कॅसिनो तसेच अमली पदार्थांना प्रोत्साहन दिले जात आहे. उद्योगधंद्यांमध्ये भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ हा घाऊक भू-रुपांतराचा अड्डा बनला आहे. वीज दर प्रचंड वाढविले आहेत. किनारा सफाई तसेच कचरा व्यवस्थापनात घोटाळे करण्यात आले आहेत. सरकार राज्याला कर्जाच्या खाईत लोटत असून १८ हजार कोटींचे कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. शिक्षण माध्यमप्रश्नी राजकारण केले जात आहे. आणखी एक समिती स्थापन करून पुन्हा घोळ घातला आहे. सर्व मंत्रालयांमध्ये घोटाळे झाले आहेत. खाणी पूर्ण वेगाने सुरू होऊ शकलेल्या नाहीत. प्रादेशिक आराखड्याच्या प्रश्नावर जनतेची थट्टा चालवली आहे. हे १२ विषय घेऊन आम्ही आगामी निवडणुकीत जनतेच्या दरबारात जाऊ, असे तिंबले यांनी सांगितले. पक्षाचे मुख्य प्रवक्ते प्रशांत नाईक म्हणाले, की हे सरकार व्हीप काढून अविश्वास ठराव जिंकते, पण आगामी निवडणुकीत जनतेच्या दरबारात साम, दाम, दंड भेद वापरला तरी जिंकू शकणार नाही. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला विरोध करताना अदानी, अंबानी यांच्याकडे नद्या गहाण टाकायला सरकार निघाले आहे, असा आरोप त्यांनी केला. मच्छीमारांचा उदरनिर्वाह नष्ट होईल तसेच अंतर्गत जलवाहतुकीवरही निर्बंध येतील, असे ते म्हणाले. याबाबत वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला. पुढील दाराने राष्ट्रीयीकरण आणि मागील दाराने खासगीकरण असा हा डाव असल्याचा आरोप तिंबले यांनी केला. प्रवक्ते तन्वीर खतिब म्हणाले की, आगामी निवडणुकीसाठी पक्षाने रोड मॅप तयार केला असून सत्तेवर आल्यास पाव, मासळी व नारळ लोकांना सवलतीच्या दरात दिले जातील. (प्रतिनिधी)