शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोवा फॉरवर्डचे २0 उमेदवार सप्टेंबर अखेरपर्यंत जाहीर

By admin | Updated: August 19, 2016 02:12 IST

पणजी : गोवा फॉरवर्ड पक्ष आपले २0 उमेदवार सप्टेंबरअखेरपर्यंत जाहीर करणार आहे. काँग्रेसबरोबर युतीचा पर्याय पक्षाने खुला ठेवला

पणजी : गोवा फॉरवर्ड पक्ष आपले २0 उमेदवार सप्टेंबरअखेरपर्यंत जाहीर करणार आहे. काँग्रेसबरोबर युतीचा पर्याय पक्षाने खुला ठेवला असून प्रमुख १२ प्रश्न घेऊन पक्ष जनतेच्या दरबारात जाणार आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर तिंबले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाला अधिमान्यता दिल्यानंतर ही पहिलीच पत्रकार परिषद होती. तिंबलो म्हणाले की, सरकार जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर असंवेदनशील बनले आहे. विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीची हत्या केली. आमच्या आमदारांनी अनेक विषय मांडण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना बोलू दिले नाही. रेड कॅटेगरीतील उद्योगांना पायघड्या घालून पर्यावरणाची हानी केली जात आहे. नद्यांचे राष्ट्रीयीकरण करून सरकार मच्छीमारांचा उदरनिर्वाह तसेच मत्स्यसंपत्ती नष्ट करायला निघाले आहे. कॅसिनो तसेच अमली पदार्थांना प्रोत्साहन दिले जात आहे. उद्योगधंद्यांमध्ये भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ हा घाऊक भू-रुपांतराचा अड्डा बनला आहे. वीज दर प्रचंड वाढविले आहेत. किनारा सफाई तसेच कचरा व्यवस्थापनात घोटाळे करण्यात आले आहेत. सरकार राज्याला कर्जाच्या खाईत लोटत असून १८ हजार कोटींचे कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. शिक्षण माध्यमप्रश्नी राजकारण केले जात आहे. आणखी एक समिती स्थापन करून पुन्हा घोळ घातला आहे. सर्व मंत्रालयांमध्ये घोटाळे झाले आहेत. खाणी पूर्ण वेगाने सुरू होऊ शकलेल्या नाहीत. प्रादेशिक आराखड्याच्या प्रश्नावर जनतेची थट्टा चालवली आहे. हे १२ विषय घेऊन आम्ही आगामी निवडणुकीत जनतेच्या दरबारात जाऊ, असे तिंबले यांनी सांगितले. पक्षाचे मुख्य प्रवक्ते प्रशांत नाईक म्हणाले, की हे सरकार व्हीप काढून अविश्वास ठराव जिंकते, पण आगामी निवडणुकीत जनतेच्या दरबारात साम, दाम, दंड भेद वापरला तरी जिंकू शकणार नाही. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला विरोध करताना अदानी, अंबानी यांच्याकडे नद्या गहाण टाकायला सरकार निघाले आहे, असा आरोप त्यांनी केला. मच्छीमारांचा उदरनिर्वाह नष्ट होईल तसेच अंतर्गत जलवाहतुकीवरही निर्बंध येतील, असे ते म्हणाले. याबाबत वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला. पुढील दाराने राष्ट्रीयीकरण आणि मागील दाराने खासगीकरण असा हा डाव असल्याचा आरोप तिंबले यांनी केला. प्रवक्ते तन्वीर खतिब म्हणाले की, आगामी निवडणुकीसाठी पक्षाने रोड मॅप तयार केला असून सत्तेवर आल्यास पाव, मासळी व नारळ लोकांना सवलतीच्या दरात दिले जातील. (प्रतिनिधी)