शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
3
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
4
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
5
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
6
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
7
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
8
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
9
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
10
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
11
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
12
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
13
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
14
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
15
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
16
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
17
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
18
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
19
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
20
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित बियाण्यांसाठी जि.प.चा हात आखडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:30 IST

दरवर्षी जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. पण यावर्षी हे अनुदान देताना जिल्हा परिषदेने हात आखडता घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. पंचायत समित्यांपुढेही या अनुदानाचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना द्यायचा आणि कोणाला सोडायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटका । वाढीव अनुदानाची पंचायत समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दरवर्षी जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. पण यावर्षी हे अनुदान देताना जिल्हा परिषदेने हात आखडता घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. पंचायत समित्यांपुढेही या अनुदानाचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना द्यायचा आणि कोणाला सोडायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर अनुदानात वाढ करण्याची मागणी करणारा ठराव गडचिरोली पंचायत समितीने आपल्या मासिक सभेत शुक्रवारी केला.यावर्षी धानासाठी प्रतिलाभार्थी ७००, तुरीसाठी १०० तर सोयाबीनसाठी १००० रुपये अनुदान डीबीटी तत्वावर दिले जात आहे. परंतू ५१ ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या गडचिरोली पंचायत समितीसाठी मोजकेच अनुदान देण्यात आले. यात धानाच्या बियाण्यासाठी १ लाख २२ हजार, सोयाबीनसाठी ४ हजार तर तुरीसाठी ८९ हजार असे अनुदान देण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले. परंतू लाभार्थी शेतकºयांची संख्या पाहता हे अनुदान मोजक्याच शेतकऱ्यांना पुरणार आहे. आतापर्यंत धानाच्या अनुदानाचा लाभ १८१ शेतकऱ्यांनी तर तुरीच्या १०० रुपये अनुदानाचा लाभ जेमतेम १० शेतकऱ्यांनी घेतला आहे.गडचिरोलीसह इतरही पंचायत समित्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात असेच अनुदान देण्यात आले आहे. वास्तविक ७० टक्के शेतकरी पंचायत समितीमार्फत मिळणाऱ्या अनुदानित बियाण्यांवर अवलंबून असतात. परंतू अनुदान कमी आणि शेतकरी जास्त अशी स्थिती झाल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागत आहे. त्यांचा विचार करून जिल्हा परिषदेने वाढीव अनुदान द्यावे, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे यांनी केली आहे.आधी शेतकºयांकडे थेट अनुदान दिले जात होते. परंतू आता डीबीटी प्रणालीमुळे काही शेतकरी फक्त बिले जोडून लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. यातून योग्य लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणे कठीण होत असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्याच्या दक्षिण भागात कापसाचा जास्त असला तरी त्या भागातील शेतकºयांना या अनुदानाचा लाभ मिळत नाही. वास्तविक कापसाचे बियाणे महाग असल्यामुळे त्यांना जास्त अनुदानाची गरज आहे. परंतू नियोजनाच्या अभावामुळे अपेक्षित अनुदानापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती