शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

अनुदानित बियाण्यांसाठी जि.प.चा हात आखडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:30 IST

दरवर्षी जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. पण यावर्षी हे अनुदान देताना जिल्हा परिषदेने हात आखडता घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. पंचायत समित्यांपुढेही या अनुदानाचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना द्यायचा आणि कोणाला सोडायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटका । वाढीव अनुदानाची पंचायत समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दरवर्षी जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. पण यावर्षी हे अनुदान देताना जिल्हा परिषदेने हात आखडता घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. पंचायत समित्यांपुढेही या अनुदानाचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना द्यायचा आणि कोणाला सोडायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर अनुदानात वाढ करण्याची मागणी करणारा ठराव गडचिरोली पंचायत समितीने आपल्या मासिक सभेत शुक्रवारी केला.यावर्षी धानासाठी प्रतिलाभार्थी ७००, तुरीसाठी १०० तर सोयाबीनसाठी १००० रुपये अनुदान डीबीटी तत्वावर दिले जात आहे. परंतू ५१ ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या गडचिरोली पंचायत समितीसाठी मोजकेच अनुदान देण्यात आले. यात धानाच्या बियाण्यासाठी १ लाख २२ हजार, सोयाबीनसाठी ४ हजार तर तुरीसाठी ८९ हजार असे अनुदान देण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले. परंतू लाभार्थी शेतकºयांची संख्या पाहता हे अनुदान मोजक्याच शेतकऱ्यांना पुरणार आहे. आतापर्यंत धानाच्या अनुदानाचा लाभ १८१ शेतकऱ्यांनी तर तुरीच्या १०० रुपये अनुदानाचा लाभ जेमतेम १० शेतकऱ्यांनी घेतला आहे.गडचिरोलीसह इतरही पंचायत समित्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात असेच अनुदान देण्यात आले आहे. वास्तविक ७० टक्के शेतकरी पंचायत समितीमार्फत मिळणाऱ्या अनुदानित बियाण्यांवर अवलंबून असतात. परंतू अनुदान कमी आणि शेतकरी जास्त अशी स्थिती झाल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागत आहे. त्यांचा विचार करून जिल्हा परिषदेने वाढीव अनुदान द्यावे, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे यांनी केली आहे.आधी शेतकºयांकडे थेट अनुदान दिले जात होते. परंतू आता डीबीटी प्रणालीमुळे काही शेतकरी फक्त बिले जोडून लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. यातून योग्य लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणे कठीण होत असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्याच्या दक्षिण भागात कापसाचा जास्त असला तरी त्या भागातील शेतकºयांना या अनुदानाचा लाभ मिळत नाही. वास्तविक कापसाचे बियाणे महाग असल्यामुळे त्यांना जास्त अनुदानाची गरज आहे. परंतू नियोजनाच्या अभावामुळे अपेक्षित अनुदानापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती