शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

झिंगानूर परिसर समस्याग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:14 IST

सिरोंचा तालुक्यातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया झिंगानूर परिसरात भ्रमणध्वनी सेवेचा अभाव, वीज समस्या, रस्त्यांची दुर्दशा, बससेवेचा अभाव यासह विविध समस्या आहेत.

ठळक मुद्देविकासापासून वंचित : मूलभूत समस्यांसह दुर्गम भागात बससेवेचाही अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया झिंगानूर परिसरात भ्रमणध्वनी सेवेचा अभाव, वीज समस्या, रस्त्यांची दुर्दशा, बससेवेचा अभाव यासह विविध समस्या आहेत. परंतु सदर समस्या सोडविण्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. रस्त्यांअभावी या भागातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.झिंगानूर परिसरातील लोव्वा, कल्लेड येथे अद्यापही वीज पोहोचली नाही. त्यामुळे नागरिकांना विजेची प्रतीक्षा आहे. अनेकदा प्रशासनाकडे विजेसाठी मागणी करण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले. बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव आहे. परंतु याकडे दुर्लक्षच होत आहे. झिंगानूर ते सिरोंचा पर्यंतचे अंतर ६५ किमी आहे. तर जिल्हा मुख्यालय २५० किमीवर आहे. या भागात ८५ टक्के आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. झिंगानूर माल, झिंगानूर चेक नं.१, चेक नं.२, मंगीगुडम, वडदेली, येडसिली, लोव्वा, कल्लेड कर्जेली, रमेशगुडम, किष्टय्यापल्ली, कोर्लाचेक, कोर्ला माल, पुल्लीगुडम, कोपेला, सिरकोंडा, गांगनूर, कोत्तागुडम, पातागुडम, रायीगुडम, पेडलाया, अमडेली, येनालाया यासह लहान, मोठ्या गावांचा समावेश आहे. या भागात पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. तर काही ठिकाणी १२ वीपर्यंत शिक्षणाचीही सोय नाही. त्यामुळे या भागातील विकास केव्हा होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. झिंगानूर परिसर मूलभूत सोयीसुविधांअभावी समस्याग्रस्त आहे. या भागातील लोकप्रतिनिधी समस्यांचा पाठपुरावा करण्याकडे कानाडोळा करीत असल्याने परिसराचा विकास खुंटला आहे.भ्रमणध्वनी सेवा कुचकामीझिंगानूर परिसरात नेहमीच भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत होते. इंटरनेट सेवेचाही अभाव अनेकदा असतो. त्यामुळे या भागातील इंटरनेट स्पिड वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अनेकदा दुसºयाशी संपर्क साधताना अडचणी येतात. शिवाय येथे खासगी भ्रमणध्वनी कंपन्यांचाही अभाव आहे.बससेवा बंद झाल्याने नागरिकांची अडचणसिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये बससेवा होती. जवळपास १९८० पासून प्रमुख ठिकाणी बस नियमित यायची. परंतु काही वर्षांपासून या भागातील बससेवा बंद झाली आहे. विशेष म्हणजे सिरोंचा, आसरअल्ली, कोपेला, झिंगानूर, कल्लेड, देलचलीपेठा या मार्गे बससेवा अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु दुर्गम भागातील गावात अद्यापही बस पोहोचली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. ज्या नागरिकांकडे वाहतुकीची साधने उपलब्ध आहेत, असे नागरिक सोयीने येतात. परंतु ज्यांच्याकडे सुविधा उपलब्ध नाही, अशांची मोठ्या प्रमाणावर पायपीट होत आहे.