शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

झिंगानूर परिसर समस्याग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:14 IST

सिरोंचा तालुक्यातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया झिंगानूर परिसरात भ्रमणध्वनी सेवेचा अभाव, वीज समस्या, रस्त्यांची दुर्दशा, बससेवेचा अभाव यासह विविध समस्या आहेत.

ठळक मुद्देविकासापासून वंचित : मूलभूत समस्यांसह दुर्गम भागात बससेवेचाही अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया झिंगानूर परिसरात भ्रमणध्वनी सेवेचा अभाव, वीज समस्या, रस्त्यांची दुर्दशा, बससेवेचा अभाव यासह विविध समस्या आहेत. परंतु सदर समस्या सोडविण्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. रस्त्यांअभावी या भागातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.झिंगानूर परिसरातील लोव्वा, कल्लेड येथे अद्यापही वीज पोहोचली नाही. त्यामुळे नागरिकांना विजेची प्रतीक्षा आहे. अनेकदा प्रशासनाकडे विजेसाठी मागणी करण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले. बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव आहे. परंतु याकडे दुर्लक्षच होत आहे. झिंगानूर ते सिरोंचा पर्यंतचे अंतर ६५ किमी आहे. तर जिल्हा मुख्यालय २५० किमीवर आहे. या भागात ८५ टक्के आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. झिंगानूर माल, झिंगानूर चेक नं.१, चेक नं.२, मंगीगुडम, वडदेली, येडसिली, लोव्वा, कल्लेड कर्जेली, रमेशगुडम, किष्टय्यापल्ली, कोर्लाचेक, कोर्ला माल, पुल्लीगुडम, कोपेला, सिरकोंडा, गांगनूर, कोत्तागुडम, पातागुडम, रायीगुडम, पेडलाया, अमडेली, येनालाया यासह लहान, मोठ्या गावांचा समावेश आहे. या भागात पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. तर काही ठिकाणी १२ वीपर्यंत शिक्षणाचीही सोय नाही. त्यामुळे या भागातील विकास केव्हा होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. झिंगानूर परिसर मूलभूत सोयीसुविधांअभावी समस्याग्रस्त आहे. या भागातील लोकप्रतिनिधी समस्यांचा पाठपुरावा करण्याकडे कानाडोळा करीत असल्याने परिसराचा विकास खुंटला आहे.भ्रमणध्वनी सेवा कुचकामीझिंगानूर परिसरात नेहमीच भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत होते. इंटरनेट सेवेचाही अभाव अनेकदा असतो. त्यामुळे या भागातील इंटरनेट स्पिड वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अनेकदा दुसºयाशी संपर्क साधताना अडचणी येतात. शिवाय येथे खासगी भ्रमणध्वनी कंपन्यांचाही अभाव आहे.बससेवा बंद झाल्याने नागरिकांची अडचणसिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये बससेवा होती. जवळपास १९८० पासून प्रमुख ठिकाणी बस नियमित यायची. परंतु काही वर्षांपासून या भागातील बससेवा बंद झाली आहे. विशेष म्हणजे सिरोंचा, आसरअल्ली, कोपेला, झिंगानूर, कल्लेड, देलचलीपेठा या मार्गे बससेवा अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु दुर्गम भागातील गावात अद्यापही बस पोहोचली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. ज्या नागरिकांकडे वाहतुकीची साधने उपलब्ध आहेत, असे नागरिक सोयीने येतात. परंतु ज्यांच्याकडे सुविधा उपलब्ध नाही, अशांची मोठ्या प्रमाणावर पायपीट होत आहे.