शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

झिंगानूर परिसर समस्याग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:14 IST

सिरोंचा तालुक्यातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया झिंगानूर परिसरात भ्रमणध्वनी सेवेचा अभाव, वीज समस्या, रस्त्यांची दुर्दशा, बससेवेचा अभाव यासह विविध समस्या आहेत.

ठळक मुद्देविकासापासून वंचित : मूलभूत समस्यांसह दुर्गम भागात बससेवेचाही अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया झिंगानूर परिसरात भ्रमणध्वनी सेवेचा अभाव, वीज समस्या, रस्त्यांची दुर्दशा, बससेवेचा अभाव यासह विविध समस्या आहेत. परंतु सदर समस्या सोडविण्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. रस्त्यांअभावी या भागातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.झिंगानूर परिसरातील लोव्वा, कल्लेड येथे अद्यापही वीज पोहोचली नाही. त्यामुळे नागरिकांना विजेची प्रतीक्षा आहे. अनेकदा प्रशासनाकडे विजेसाठी मागणी करण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले. बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव आहे. परंतु याकडे दुर्लक्षच होत आहे. झिंगानूर ते सिरोंचा पर्यंतचे अंतर ६५ किमी आहे. तर जिल्हा मुख्यालय २५० किमीवर आहे. या भागात ८५ टक्के आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. झिंगानूर माल, झिंगानूर चेक नं.१, चेक नं.२, मंगीगुडम, वडदेली, येडसिली, लोव्वा, कल्लेड कर्जेली, रमेशगुडम, किष्टय्यापल्ली, कोर्लाचेक, कोर्ला माल, पुल्लीगुडम, कोपेला, सिरकोंडा, गांगनूर, कोत्तागुडम, पातागुडम, रायीगुडम, पेडलाया, अमडेली, येनालाया यासह लहान, मोठ्या गावांचा समावेश आहे. या भागात पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. तर काही ठिकाणी १२ वीपर्यंत शिक्षणाचीही सोय नाही. त्यामुळे या भागातील विकास केव्हा होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. झिंगानूर परिसर मूलभूत सोयीसुविधांअभावी समस्याग्रस्त आहे. या भागातील लोकप्रतिनिधी समस्यांचा पाठपुरावा करण्याकडे कानाडोळा करीत असल्याने परिसराचा विकास खुंटला आहे.भ्रमणध्वनी सेवा कुचकामीझिंगानूर परिसरात नेहमीच भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत होते. इंटरनेट सेवेचाही अभाव अनेकदा असतो. त्यामुळे या भागातील इंटरनेट स्पिड वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अनेकदा दुसºयाशी संपर्क साधताना अडचणी येतात. शिवाय येथे खासगी भ्रमणध्वनी कंपन्यांचाही अभाव आहे.बससेवा बंद झाल्याने नागरिकांची अडचणसिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये बससेवा होती. जवळपास १९८० पासून प्रमुख ठिकाणी बस नियमित यायची. परंतु काही वर्षांपासून या भागातील बससेवा बंद झाली आहे. विशेष म्हणजे सिरोंचा, आसरअल्ली, कोपेला, झिंगानूर, कल्लेड, देलचलीपेठा या मार्गे बससेवा अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु दुर्गम भागातील गावात अद्यापही बस पोहोचली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. ज्या नागरिकांकडे वाहतुकीची साधने उपलब्ध आहेत, असे नागरिक सोयीने येतात. परंतु ज्यांच्याकडे सुविधा उपलब्ध नाही, अशांची मोठ्या प्रमाणावर पायपीट होत आहे.