शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

युवकांनी उद्योगासाठी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:00 IST

उद्योगातून आर्थिक व सामाजिक उन्नती साधता येते. केंद्र शासनाने उद्योजकांना मदत करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन उद्योग स्थापन करावे, असे प्रतिपादन पद्मश्री मिलींद कांबळे यांनी केले.

ठळक मुद्देपद्मश्री मिलींद कांबळे यांचे प्रतिपादन : जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजकांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उद्योगातून आर्थिक व सामाजिक उन्नती साधता येते. केंद्र शासनाने उद्योजकांना मदत करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन उद्योग स्थापन करावे, असे प्रतिपादन पद्मश्री मिलींद कांबळे यांनी केले.दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिज, स्माल इंडस्ट्रिज डेव्हलमेंट, मेक इन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात उद्योजकांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आ.डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी चौधरी, जे.बी.सिंगतराव, निश्चय शेळके, गोपाल वासनिक, प्रकाश इटनकर, लिड बँकेचे व्यवस्थापक प्रमोद भोसले, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक बैस, मुकेश कुमार, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी बडे, एमआयडीसीचे व्यवस्थापक गिरी, रूपराज गौरी, पंकज बोकारे, जॉनी दासरवार, श्रीनिवास दंतुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.उद्योजकांच्या उन्नतीसाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. प्रत्येक युवकाने आता उद्योगाची कास धरावी, देशातील उद्योगाला चालना देऊन आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी २०१४ मध्ये मेक इन इंडियाच्या माध्यमातून सुरू केला आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी चालना दिली आहे. गडचिरोली या मागासवर्गीय जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी लवकर परवानगी मिळावी, यासाठी शासनाने ‘इझी आॅफ डुर्इंग बिजनेस’ ही आॅनलाईन प्रणाली सुरू केली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार व गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मध्यम मार्गाने जाऊन अनुसूचित जाती व जमातीतील युवतींनी धरणे आंदोलन करण्यापेक्षा उद्योग स्थापन करावे, देशातील ११५ आकांक्षित जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्याचा समावेश असून या जिल्ह्यात उद्योग निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे. केंद्र सरकारने २५ टक्के, राज्य सरकारने ३० टक्के अशी एकूण ५५ टक्के सबसिडी व ५ टक्के व्याज दर देण्याचे धोरण अवलंबिले आहे. याचा फायदा अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन केले.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मार्गदर्शन करताना युवकांनी लाभार्थी होण्यापेक्षा उद्योजक बनावे, व दुसऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असे आवाहन केले. संचालन सविता साधमवार यांनी केले. यशस्वीतेसाठी मेक इन गडचिरोलीचे संयोजक रमेश अधिकारी, जनार्धन साखरे, राकेश भैसारे, प्रसाद गुंफलवार यांनी सहकार्य केले.