शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST

आरमोरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता, न्यायावर ...

आरमोरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता, न्यायावर आधारित भारत निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे प्रतिपादन आरमोरी तालुक्यातील देऊळगाव, वासाळा, वैरागड व सिर्सी येथे आयोजित शिवसंपर्क अभियानादरम्यान शिवसेनेचे आरमाेरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केले.

कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, ज्येष्ठ नेते चंद्रशेखर मने, युवासेनेचे माजी जिल्हाध्यक्ष चंदू बेहेरे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती सागर मने, नगरसेवक माणिक भोयर, कावडु सहारे, भूषण सातव, पुंजीराम मेश्राम, लहानु पिलारे, पांडुरंग बावनकर, विलास गोंधोळे आदी उपस्थित होते.

शिवसेना हा तळागाळातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य जनतेला न्याय मिळवून देणारा पक्ष असून जनतेच्या न्याय हक्कासाठी रात्रीचा दिवस करून राबणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गावागावात शाखा निर्माण करून घराघरात शिवसैनिक निर्माण करावे व शिवसेना मजबूत करावी, असे आवाहन चंदेल यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैरागड येथील रूचित बोधनकर, कवीश्वर खोब्रागडे बादल गिरीपुंजे सचिन लांजीकर, वैष्णव लांजेवार रामदास डोंगरवार मंगेश सरकार हीतेश कुळसंगे, अंकित बोधनकर, समीर तागडे व शिवशाही ग्रुपच्या सदस्यांनी सहकार्य केले। तशेच सिर्सी परिसरातील काशीनाथ बोबाटे गुरुजी, सुरेशजी फुकटे, नवघडे, रमेश मुरमुरवार, किशोर बोटगीलवर, दिवाकर रोहनकार, अरुण दुमाणे, भष्कर मेश्राम, जयंत फुलबांधे, सागर नावघडे कार्यक्रमाला उपस्थित होते.

250721\img-20210724-wa0030.jpg

शिवसंपर्क अभियानात उपस्थित कार्यकर्ते