शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वीज तारेच्या स्पर्शाने युवक व नीलगाय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 23:25 IST

वैरागड-आरमोरी मार्गावर असलेल्या वैरागडपासून चार किमी अंतरावरील पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाणाºया वन तलावात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावून ठेवलेल्या जीवंत विद्युत तारेला स्पर्श ....

ठळक मुद्देवैरागड येथील घटना : वन्यजीवांच्या शिकारीसाठी लावला होता करंट

ऑनलाईन लोकमतवैरागड : वैरागड-आरमोरी मार्गावर असलेल्या वैरागडपासून चार किमी अंतरावरील पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाणाºया वन तलावात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावून ठेवलेल्या जीवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने एक युवक व निलगाय ठार झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ९ वाजता घडली.सुभाष दिलीप गावतुरे (३०) रा. चिचोली, ता. धानोरा असे मृतकाचे नाव आहे. मृतक सुभाष गावतुरे व एकल विद्यालयात काम करणारे इतर पाच कर्मचारी बैठकीसाठी धानोरावरून वैरागड मार्गे ब्रह्मपुरी येथे दुचाकीने जात होते. सुभाषला शौचास लागल्याने तो तलावात शौचास गेला होता. यावेळी त्याचा सोबती शिवरतन वट्टी हा दुचाकीजवळ थांबला होता. सुभाषला तलावात निलगाय मरण पावली असल्याची दिसली. त्याला कुतूहल वाटल्याने निलगाय बघण्यासाठी सुभाषने त्याचा मित्र वट्टी याला फोन करून मृत पावलेली निलगाय बघण्यासाठी येण्यास सांगितले व सुभाष हा पुढे निघून गेला. मृत पावलेल्या प्राण्याजवळ पोहोचताच सुभाषला विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने सुभाष हा तडफडू लागला. काही वेळातच सुभाषचा मृत्यू झाला. त्याच्या मागेच निलगाय पाहण्यासाठी गेलेल्या शिवरतनच्या ही बाब लक्षात आली. शिवरतनने याबाबतची माहिती इतर मित्रांना फोनवरून दिली. इतरत्र तारा विखुरल्या असल्याने शिवरतनचाही नाईलाज झाला. तरीही समयसूचकता दाखवत वीज तारा दूर केल्या. सुभाषला पाणी पाजले. मात्र तोपर्यंत सुभाष हा गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच वैरागड येथील विद्युत कंपनीचे कनिष्ठ अभियंता भोवरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून विद्युत पुरवठा बंद केला. वासाळा बिटाचे क्षेत्र सहायक के. बी. उसेंडी. वनरक्षक एच. जी. झोडगे, श्रीकांत सेलोटे, बोपचे, आरमोरी पोलीस निरिक्षक महेश पाटील, वैरागडचे बिट जमादार जे. एस. शेंडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह आरमोरी येथे पाठविण्यात आला आहे. शिकाºयांनी लाकडाच्या खुंट्या गाडून विद्युत तारा लावल्या होत्या. वन विभागाच्या अंदाजानुसार निलगाय सुध्दा सकाळी ८ वाजताच्या ठार झाली असावी.ज्या ठिकाणी पाण्याचा साठा असतो, अशा ठिकाणी विद्युत तारा लावून अवैध शिकारीचे अघोरी कृत्य केले जाते. उन्हाळभर या ठिकाणी पाण्याचा साठा असतो. अशा जलस्त्रोताजवळ छुपे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची योजना तयार केली जात आहे. वीज तार लावणाºयांची माहिती देणाºयास बक्षीस देऊन शिकाऱ्यांच्या मुस्क्या आवळल्या जातील..- पी. एम. गोडबोले,उपवनसंरक्षक वन विभाग, वडसा