शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

मुंबई-औरंगाबादचे तरुण पोलीस भरतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:23 IST

राज्यात इतर जिल्ह्यांच्या पोलीस दलाच्या तुलनेत सर्वाधिक असुरक्षित आणि आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस दलात भरती होण्यासाठी हजारो बेरोजगार एका पायावर तयार आहेत.

ठळक मुद्देबेरोजगारीच्या तीव्रतेची झलक : उघड्यावर राहून देणार शारीरिक व लेखी चाचणी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : राज्यात इतर जिल्ह्यांच्या पोलीस दलाच्या तुलनेत सर्वाधिक असुरक्षित आणि आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस दलात भरती होण्यासाठी हजारो बेरोजगार एका पायावर तयार आहेत. केवळ विदर्भातील जिल्ह्यांमधूनच नाही तर चक्क मुंबई, औरंगाबाद, अहमदनगरपासूनच्या युवकांनी या भरतीसाठी गडचिरोली गाठले आहे. बेरोजगारीच्या वनव्यापुढे नक्षलवाद्यांची दहशत काहीच नाही, अशी भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.अवघ्या १२९ पदांसाठी तब्बल २८ हजार १७० बेरोजगारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे पोलीस भरतीसाठी बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता असली तरी अनेक युवक पदवीधर, पदव्युत्तर पदवीधारक, डीएड्, बीएड् झालेलेसुद्धा आहेत. शुक्रवार दि.९ पासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक क्षमता चाचणीला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी आपला शारीरिक चाचणीसाठी नंबर लागेल म्हणून अनेक युवक कालपासूनच गडचिरोलीत आले होते. पण आज त्यांचा नंबर लागला नाही. उद्याही लागेल की नाही माहीत नाही. पुन्हा शारीरिक क्षमता चाचणीत उत्तीर्ण झाल्यास लेखी चाचणीपर्यंत थांबावे लागणार आहे. एवढे दिवस हॉटेल, लॉजवर थांबण्याचा खर्च परवडणार नाही. त्यामुळे अनेक युवकांनी चक्क पोलीस मुख्यालयाच्या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखालीच आश्रय घेतल्याचे दिसून आले. पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात मैदानालगत मोठे शेड आहे, पण तिथे थांबण्यास पोलिसांनी नकार दिल्यामुळे झाडाखालीच अंग टेकण्याशिवाय पर्याय नसल्याचे या युवकांनी सांगितले.पहिल्या दिवशी एक हजार युवकांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्याचे नियोजन केले होते. मात्र ९४ युवक गैरहजर होते. उपस्थित ९०६ जणांपैकी उंचीत ४० जण, छातीत ४२ जण तर उंच उडी, १०० मीटर दौड, १००० मीटर दौड, गोळाफेक आणि लांब उडी या मैदानी चाचण्यांत ४१ जण अपात्र ठरले. त्यामुळे एकूण ७१६ जण पहिल्या दिवशीच्या चाचणीत पात्र ठरले आहेत.पहाटे ५ वाजतापासून सुरूवातदुपारच्या वेळी ऊन वाढत असल्यामुळे आणि शक्य तितक्या लवकर शारीरिक क्षमता चाचणी आटोपावी म्हणून पहाटे ५ वाजतापासूनच शारीरिक क्षमता चाचणीला सुरूवात केल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांनी सांगितले. तरीही पहिल्या दिवशी ९०६ जणांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यासाठी ३ वाजले. शनिवारपासून दररोज दिड हजार युवकांची चाचणी घेण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.उच्चशिक्षित युवकही मैदानातया भरतीसाठी गडचिरोलीत दाखल झालेला औरंगाबादच्या सागर चव्हाण हा बीएससी अंतिम वर्षाला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये जागा कमी असल्यामुळे गडचिरोलीत संधी मिळेल या आशेने आल्याचे तो म्हणाला. मुंबईचा निलेश अप्पाबाजारे हा बीए तृतीय वर्षाला शिकत आहे. अहमदनगरचा प्रवीण ढाकणे बीकॉम झाला आहे. औढा नागनाथचा शेख अजगर बीए, डीएड् झाला आहे. शिक्षक म्हणून नोकरी लागत नसल्यामुळे पोलीस विभागात प्रयत्न करतोय असे त्याने सांगितले. याशिवाय परळी वैजनाथचा नितीन प्रभू ढवारे हा बीए झालेला युवकही नशिब आजमावतो आहे. नोकरी नसल्यामुळे ऊस तोडणी करायला जातो. त्यापेक्षा पोलिसाची नोकरी चांगलीच असल्याचे तो म्हणाला.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरसदर भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शारीरिक क्षमता चाचणी घेतली जात आहे. या प्रक्रियेत ४०० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. शिवाय प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. कोणी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देत असल्यास गडचिरोली पोलीस दलाच्या भरती हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन प्रभारी अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.