शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

मुंबई-औरंगाबादचे तरुण पोलीस भरतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:23 IST

राज्यात इतर जिल्ह्यांच्या पोलीस दलाच्या तुलनेत सर्वाधिक असुरक्षित आणि आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस दलात भरती होण्यासाठी हजारो बेरोजगार एका पायावर तयार आहेत.

ठळक मुद्देबेरोजगारीच्या तीव्रतेची झलक : उघड्यावर राहून देणार शारीरिक व लेखी चाचणी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : राज्यात इतर जिल्ह्यांच्या पोलीस दलाच्या तुलनेत सर्वाधिक असुरक्षित आणि आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस दलात भरती होण्यासाठी हजारो बेरोजगार एका पायावर तयार आहेत. केवळ विदर्भातील जिल्ह्यांमधूनच नाही तर चक्क मुंबई, औरंगाबाद, अहमदनगरपासूनच्या युवकांनी या भरतीसाठी गडचिरोली गाठले आहे. बेरोजगारीच्या वनव्यापुढे नक्षलवाद्यांची दहशत काहीच नाही, अशी भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.अवघ्या १२९ पदांसाठी तब्बल २८ हजार १७० बेरोजगारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे पोलीस भरतीसाठी बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता असली तरी अनेक युवक पदवीधर, पदव्युत्तर पदवीधारक, डीएड्, बीएड् झालेलेसुद्धा आहेत. शुक्रवार दि.९ पासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक क्षमता चाचणीला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी आपला शारीरिक चाचणीसाठी नंबर लागेल म्हणून अनेक युवक कालपासूनच गडचिरोलीत आले होते. पण आज त्यांचा नंबर लागला नाही. उद्याही लागेल की नाही माहीत नाही. पुन्हा शारीरिक क्षमता चाचणीत उत्तीर्ण झाल्यास लेखी चाचणीपर्यंत थांबावे लागणार आहे. एवढे दिवस हॉटेल, लॉजवर थांबण्याचा खर्च परवडणार नाही. त्यामुळे अनेक युवकांनी चक्क पोलीस मुख्यालयाच्या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखालीच आश्रय घेतल्याचे दिसून आले. पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात मैदानालगत मोठे शेड आहे, पण तिथे थांबण्यास पोलिसांनी नकार दिल्यामुळे झाडाखालीच अंग टेकण्याशिवाय पर्याय नसल्याचे या युवकांनी सांगितले.पहिल्या दिवशी एक हजार युवकांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्याचे नियोजन केले होते. मात्र ९४ युवक गैरहजर होते. उपस्थित ९०६ जणांपैकी उंचीत ४० जण, छातीत ४२ जण तर उंच उडी, १०० मीटर दौड, १००० मीटर दौड, गोळाफेक आणि लांब उडी या मैदानी चाचण्यांत ४१ जण अपात्र ठरले. त्यामुळे एकूण ७१६ जण पहिल्या दिवशीच्या चाचणीत पात्र ठरले आहेत.पहाटे ५ वाजतापासून सुरूवातदुपारच्या वेळी ऊन वाढत असल्यामुळे आणि शक्य तितक्या लवकर शारीरिक क्षमता चाचणी आटोपावी म्हणून पहाटे ५ वाजतापासूनच शारीरिक क्षमता चाचणीला सुरूवात केल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांनी सांगितले. तरीही पहिल्या दिवशी ९०६ जणांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यासाठी ३ वाजले. शनिवारपासून दररोज दिड हजार युवकांची चाचणी घेण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.उच्चशिक्षित युवकही मैदानातया भरतीसाठी गडचिरोलीत दाखल झालेला औरंगाबादच्या सागर चव्हाण हा बीएससी अंतिम वर्षाला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये जागा कमी असल्यामुळे गडचिरोलीत संधी मिळेल या आशेने आल्याचे तो म्हणाला. मुंबईचा निलेश अप्पाबाजारे हा बीए तृतीय वर्षाला शिकत आहे. अहमदनगरचा प्रवीण ढाकणे बीकॉम झाला आहे. औढा नागनाथचा शेख अजगर बीए, डीएड् झाला आहे. शिक्षक म्हणून नोकरी लागत नसल्यामुळे पोलीस विभागात प्रयत्न करतोय असे त्याने सांगितले. याशिवाय परळी वैजनाथचा नितीन प्रभू ढवारे हा बीए झालेला युवकही नशिब आजमावतो आहे. नोकरी नसल्यामुळे ऊस तोडणी करायला जातो. त्यापेक्षा पोलिसाची नोकरी चांगलीच असल्याचे तो म्हणाला.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरसदर भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शारीरिक क्षमता चाचणी घेतली जात आहे. या प्रक्रियेत ४०० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. शिवाय प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. कोणी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देत असल्यास गडचिरोली पोलीस दलाच्या भरती हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन प्रभारी अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.