शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

तुम्हाला कर्जमाफी, शेतमालाला भाव नको का?

By admin | Updated: June 4, 2017 00:38 IST

कधी नव्हे ते पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले आहेत.

मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्ककधी नव्हे ते पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे राज्य सरकारही हादरून गेले आणि शेतकऱ्यांच्या संपानंतर दोन दिवसांतच सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी संपातून माघार घेतली असली तरी अनेक ठिकाणी ‘संपूर्ण कर्जमाफी द्या आणि घोषणा न करता प्रत्यक्ष कृती करा,’ असे म्हणत आंदोलनाची धग कायम ठेवली आहे. मात्र राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन एकीकडे आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी दुसरीकडे, असा विरोधाभास पहायला मिळत आहे. हा विरोधाभास कोड्यात टाकणाराच नाही तर अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे.जे शेतकरी या आंदोलनात उतरले आहे ते केवळ स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी नाही, तर संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ते लढत आहेत. घाम गाळून पिकविलेला शेतमाल असो की अमृतासमान दूध असो, ते रस्त्यावर फेकून आपला संताप व्यक्त करताना त्यांना कोणताही आनंद मिळत नाही. पण सरळ मार्गाने केलेल्या आपल्या मागण्यांची दखल सरकार घेत नाही हे लक्षात आल्यानेच शेतकऱ्यांना हे पाऊल उचलावे लागले. अनेक शेतकरी उत्स्फूर्तपणे यात सहभागी झाले. या आंदोलनाचा जो काही लाभ मिळणार तो फक्त आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनाच मिळणार नाही तर तो राज्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना मिळणार आहे. मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत तमाम शेतकऱ्यांच्या व्यथा कमी-जास्त प्रमाणात सारख्यात आहेत. पण तरीही गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी जणूकाही त्या आंदोलनाशी आपला काहीही संंबंध नाही अशा अविर्भावात आहेत. त्यांचे सर्व व्यवहार ‘आॅल ईज वेल’ सुरू आहेत. याचा अर्थ गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नको का? त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव नको का? आम्ही आंदोलन केले नाही, आम्हाला त्याला लाभही नको, असे कोणी शेतकरी म्हणणार आहे का? अर्थातच नाही. मिळणारा लाभ कोणीही सोडणार नाही. पण त्यासाठी रस्त्यावर उतरण्यास कोणीही तयार नाही.धान उत्पादकांच्या या जिल्ह्यात शेतकरी खूप जास्त कर्ज घेत नाही. त्यामुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रमाणही या जिल्ह्यात कमी आहे. याचा अर्थ स्थानिक शेतकऱ्यांना कोणतीच झळ पोहोचत नाही असे अजिबात नाही. उत्पादन खर्चापेक्षा दीड पट अधिक भाव देऊ, असे आश्वासन देऊन सत्तेत येणाऱ्यांनी दीड पट सोडा, तीन वर्षात धानाचे हमीभाव अत्यल्प वाढवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. इतर शेतमालाचीही तीच गत आहे. तरीही या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रक्त अजून खवळलेले नाही.शेतकऱ्यांच्या या आंदोलनात सुदैवाने कोणतेही राजकीय पक्ष प्रत्यक्षपणे उतरले नाहीत. अप्रत्यक्षपणे काही ठिकाणी विरोधी पक्षवाल्यांनी निश्चितच आंदोलनाला पाठबळ दिला असेल. मात्र गडचिरोलीत तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यास कोणी पुढाकार घेताना दिसत नाही. यावरून या जिल्ह्यात विरोधी पक्ष किती निष्क्रिय आहे हे दिसून येते. आम्ही कर्जमाफी दिली होती, आता तुम्हीही द्या, असे म्हणत विरोधक खुलेआमपणे या रस्त्यावर उतरून आंदोलन पेटवू शकले असते. शेतकरी संघटना तर जिल्ह्यात केव्हाच संपली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी दिशाहीन झाले आहेत. राज्याच्या शेवटच्या टोकावरील या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. आज कधी नव्हे ते शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. कोणत्याही कर्मचारी संघटनांच्या आंदोलनापेक्षा राज्यातील हे शेतकऱ्यांचे आंदोलन मोठे आहे. त्यामुळेच त्याचे परिणाम तातडीने दिसत आहे. उद्या या आंदोलनाचा जो काही फायदा होईल त्यात आपलाही खारीचा वाटा आहे, असे अभिमानाने सांगता यावे याची काळजी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.